शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

पावसाच्या तडाख्याने मीरा भाईंदर गेले पाण्यात; शहरात सरासरी ८३ मिमी पावसाची नोंद

By धीरज परब | Updated: September 16, 2022 19:16 IST

घोडबंदर मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक जवळपास ठप्प झाली होती. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड: मीरा भाईंदर शहरात गुरुवारी रात्री व शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस पडल्यामुळे शहरातील बहुसंख्य परिसर पाण्याखाली गेला होता. घोडबंदर मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक जवळपास ठप्प झाली होती . 

गुरुवारी रात्री पासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारी चांगलेच झोडपून काढले . धुंवाधार पावसा मुळे शहरातील बहुसंख्य परिसर पाण्याखाली गेलेच शिवाय घोडबंदर महामार्ग सुद्धा पाण्यात बुडाल्याने वाहतूक जवळपास ठप्प झाली होती . शहरात सकाळी १० ते दुपारी १ ह्या तीन तासात सुमारे ८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले . 

भाईंदरच्या बेकरी गल्ली , नारायण नगर , राई - मोरवा मार्ग, बाळाराम पाटील मार्ग , तलाव मार्ग  सह अनेक भागात पाणी तुंबले होते . मीरारोडच्या शांती नगर , शीतल नगर , अमिषा पार्क , कृष्ण स्थळ, गीता नगर , हटकेश , मुन्शी कम्पाऊंड , माशाचा पाडा मार्ग परिसर , ग्रीन व्हिलेज आदी अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते . 

अनेक लोकांच्या घरात तसेच दुकान - व्यवसायायिक जागेत सांडपाणी व पावसाचे पाणी शिरले . शहरातील वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले होते . सुदैवाने दुपार नंतर पावसाचा जोर ओसरल्याने लोकांना दिलासा मिळाला . 

महापालिकेच्या नाले सफाईची पुन्हा पोलखोल झालीच शिवाय शहरात मोठ्या प्रमाणात चालणारी भरणी सुद्धा पुन्हा चिंतेचा विषय असल्याचे स्पष्ट झाले . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर