शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

मीरा-भार्इंदर महापालिकेने गेल्या सहा वर्षांत ९ हजारांहून अधिक केली वृक्षतोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 18:29 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने गेल्या सहा वर्षांत सार्वजनिक विकासाआड येणारी व खासगी विकासाला बाधा ठरणारी सुमारे ९ हजार ३०० हून अधिक झाडे तोडली.

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने गेल्या सहा वर्षांत सार्वजनिक विकासाआड येणारी व खासगी विकासाला बाधा ठरणारी सुमारे ९ हजार ३०० हून अधिक झाडे तोडली. या बदल्यात पालिकेने विविध प्रकारची सुमारे ४ हजार ११८ झाडांचीच लागवड केल्याचे आरटीआय कार्यकर्ता कृष्णा गुप्ता यांनी माहिती अधिकारातून उजेडात आणले आहे. मात्र यात राज्य सरकारच्या वनमहोत्सव दरम्यान पालिकेने नेमकी किती झाडे लावली, ते मात्र प्रशासनाकडून गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.पालिकेकडून रस्ता रुंदीकरणासह विविध विकासाआड येणारी झाडे तोडल्याचे अनेकदा समोर आले आहे. तर खासगी विकासात बाधा ठरणारी झाडे देखील पालिकेच्या दुर्लक्षामुळे बिनदिक्कत तोडण्यात आली आहेत. हा बेकायदेशीर प्रकार अनेकदा समोर आला असला तरी ती झाडे तोडणा-यांवर अद्याप गुन्हे नोंदविण्यात आलेले नाहीत. तीन वर्षांपूर्वी पालिकेने बाधित वृक्षाला समूळ बाहेर काढून त्याचे इतरत्र पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कार्यवाहीला देखील सुरुवात झाली होती. क्रेनच्या सहाय्याने झाडे समूळ उखडून त्यांचे इतरत्र केले जाणारे पुनर्रोपण पालिकेला पुढे खर्चिक ठरू लागल्याने पुन्हा ती तोडण्यास सुरुवात झाली. जेवढी झाडे तोडण्यात येतील, त्याच्या पाचपट झाडे लावण्याचा निर्णय प्रशासनाकडुन घेण्यात आला. परंतु गेल्या सहा वर्षांत तोडण्यात आलेल्या सुमारे ९ हजार ३६८ झाडांपैकी आतापर्यंत सुमारे ४ हजार ११८ झाडे नव्याने लावण्यात आल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. आरटीआय कार्यकर्ता कृष्णा यांनी वृक्षतोडीची माहिती पालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाकडे मागितली होती. त्यावर प्राप्त माहितीत तोडण्यात आलेल्या झाडांची संख्या २०११-१२ मध्ये ४११०, २०१२-१३ मध्ये १४३६, २०१३-१४ मध्ये ८९८, २०१४-१५ मध्ये सुमारे १ हजार, २०१५-१६ मध्ये सुमारे ११४६ व २०१६-१७ मध्ये सुमारे ७७८ इतकी नमुद करण्यात आली आहे. यातील २०११-१२ मध्ये उत्तन घनकचरा प्रकल्पातील तब्बल २ हजार झाडे तोडण्यात आली. या बदल्यात लावण्यात आलेली झाडांची संख्या सुमारे ४ हजार ११८ इतकीच असल्याचे समोर आले आहे. यात २०१४-१५ मध्ये लागवड केलेल्या बॉटलपाम झाडांची संख्या ४५२, पेल्ट्रोफारमची १५ झाडे, गुलमोहची १८, समुद्रफळाची २७९, नारळाची २१४, बदामाची ११५ व इतर २१ अशा १ हजार ११४ झाडांचा समावेश आहे.पालिकेने २०११-१२ पासुन तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात लावण्यात आलेल्या झाडांचा तपशील थेट त्याच वर्षापासुन न देता तो २०१४-१५ पासुन दिला आहे. २०१५-१६ मध्ये १ हजार १४८ झाडे, २०१६-१७ मध्ये सुमारे १ हजार ८५६ अशा एकूण ४११८ झाडांची लागवड केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यात राज्य सरकारने गेल्या तीन दोन वर्षांत सुरू केलेल्या वनमहोत्सव अंतर्गत लागवड केलेल्या झाडांचा तपशील मात्र देण्यात आलेला नाही. दिलेल्या माहितीवरून पालिकेची वृक्षतोड मात्र जोरात तर वृक्षलागवड बेताची असल्याचे स्पष्ट झाले असून, प्रशासनाला पर्यावरणाशी कोणतेही देणेघेणे नसल्याचेही जाणवू लागल्याचा आरोप कृष्णा यांनी केला आहे.