शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

मीरा-भार्इंदर महापालिकेने गेल्या सहा वर्षांत ९ हजारांहून अधिक केली वृक्षतोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 18:29 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने गेल्या सहा वर्षांत सार्वजनिक विकासाआड येणारी व खासगी विकासाला बाधा ठरणारी सुमारे ९ हजार ३०० हून अधिक झाडे तोडली.

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने गेल्या सहा वर्षांत सार्वजनिक विकासाआड येणारी व खासगी विकासाला बाधा ठरणारी सुमारे ९ हजार ३०० हून अधिक झाडे तोडली. या बदल्यात पालिकेने विविध प्रकारची सुमारे ४ हजार ११८ झाडांचीच लागवड केल्याचे आरटीआय कार्यकर्ता कृष्णा गुप्ता यांनी माहिती अधिकारातून उजेडात आणले आहे. मात्र यात राज्य सरकारच्या वनमहोत्सव दरम्यान पालिकेने नेमकी किती झाडे लावली, ते मात्र प्रशासनाकडून गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.पालिकेकडून रस्ता रुंदीकरणासह विविध विकासाआड येणारी झाडे तोडल्याचे अनेकदा समोर आले आहे. तर खासगी विकासात बाधा ठरणारी झाडे देखील पालिकेच्या दुर्लक्षामुळे बिनदिक्कत तोडण्यात आली आहेत. हा बेकायदेशीर प्रकार अनेकदा समोर आला असला तरी ती झाडे तोडणा-यांवर अद्याप गुन्हे नोंदविण्यात आलेले नाहीत. तीन वर्षांपूर्वी पालिकेने बाधित वृक्षाला समूळ बाहेर काढून त्याचे इतरत्र पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कार्यवाहीला देखील सुरुवात झाली होती. क्रेनच्या सहाय्याने झाडे समूळ उखडून त्यांचे इतरत्र केले जाणारे पुनर्रोपण पालिकेला पुढे खर्चिक ठरू लागल्याने पुन्हा ती तोडण्यास सुरुवात झाली. जेवढी झाडे तोडण्यात येतील, त्याच्या पाचपट झाडे लावण्याचा निर्णय प्रशासनाकडुन घेण्यात आला. परंतु गेल्या सहा वर्षांत तोडण्यात आलेल्या सुमारे ९ हजार ३६८ झाडांपैकी आतापर्यंत सुमारे ४ हजार ११८ झाडे नव्याने लावण्यात आल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. आरटीआय कार्यकर्ता कृष्णा यांनी वृक्षतोडीची माहिती पालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाकडे मागितली होती. त्यावर प्राप्त माहितीत तोडण्यात आलेल्या झाडांची संख्या २०११-१२ मध्ये ४११०, २०१२-१३ मध्ये १४३६, २०१३-१४ मध्ये ८९८, २०१४-१५ मध्ये सुमारे १ हजार, २०१५-१६ मध्ये सुमारे ११४६ व २०१६-१७ मध्ये सुमारे ७७८ इतकी नमुद करण्यात आली आहे. यातील २०११-१२ मध्ये उत्तन घनकचरा प्रकल्पातील तब्बल २ हजार झाडे तोडण्यात आली. या बदल्यात लावण्यात आलेली झाडांची संख्या सुमारे ४ हजार ११८ इतकीच असल्याचे समोर आले आहे. यात २०१४-१५ मध्ये लागवड केलेल्या बॉटलपाम झाडांची संख्या ४५२, पेल्ट्रोफारमची १५ झाडे, गुलमोहची १८, समुद्रफळाची २७९, नारळाची २१४, बदामाची ११५ व इतर २१ अशा १ हजार ११४ झाडांचा समावेश आहे.पालिकेने २०११-१२ पासुन तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात लावण्यात आलेल्या झाडांचा तपशील थेट त्याच वर्षापासुन न देता तो २०१४-१५ पासुन दिला आहे. २०१५-१६ मध्ये १ हजार १४८ झाडे, २०१६-१७ मध्ये सुमारे १ हजार ८५६ अशा एकूण ४११८ झाडांची लागवड केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यात राज्य सरकारने गेल्या तीन दोन वर्षांत सुरू केलेल्या वनमहोत्सव अंतर्गत लागवड केलेल्या झाडांचा तपशील मात्र देण्यात आलेला नाही. दिलेल्या माहितीवरून पालिकेची वृक्षतोड मात्र जोरात तर वृक्षलागवड बेताची असल्याचे स्पष्ट झाले असून, प्रशासनाला पर्यावरणाशी कोणतेही देणेघेणे नसल्याचेही जाणवू लागल्याचा आरोप कृष्णा यांनी केला आहे.