शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

प्लास्टिकबंदीला मीरा भाईंदर महापालिकेकडूनच हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:20 IST

कारवाई गुंडाळल्याने विक्रेते मोकाट, आयुक्तांच्या ‘त्या’ भूमिकेवर झाली होती टीका

मीरा रोड : गेल्यावर्षी सरकारने प्लास्टिक बंदीच्या घेतलेल्या निर्णयास मीरा भार्इंदर महापालिकेकडून हरताळ फासण्यात आला आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या, स्ट्रॉ, प्लास्टीक चमचे व कंटेनर आदींचा सर्रास वापर सुरू झाला आहे. महापालिकेनेही प्लास्टिक विरोधातील मोठा गाजावाजा करत सुरू केलेली कारवाई गुंडाळून ठेवल्याने विक्रेते मोकाट आहेत.

प्लास्टिक विक्री व वापर करणाऱ्यांच्या विरोधाचा हवाला देत जुलैच्या पहिल्या आठवड्यातच पालिकेने कारवाई गुंडाळली. प्रशासनाकडून व्यापाऱ्यांच्या बैठका घेऊन झाल्या असताना पुन्हा सत्ताधारी भाजपच्या आग्रहावरून नगरभवन येथे बोलावलेल्या बैठकीला प्लास्टिक विक्रेता व्यापारी थेट आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याच अंगावर धाऊन गेला होता.

भाजपच्या एका नगरसेविकेने तर प्लास्टिक पिशव्यांविरोधात कारवाई करणाºया पालिका कर्मचाºयानांच आरोपीच्या पिंजºयात उभे करत प्लास्टिक बंदी गुंडाळण्याचा प्रयत्न चालवला. आयुक्तांनीही दबावाखाली आठ दिवसांसाठी प्लास्टिक विरोधातील कारवाई थांबवल्याचे जाहीर केले होते. वास्तविक आयुक्तांना असा कोणता अधिकार नसताना त्यांनी घेतलेल्या या भूमिकेने शहरातून टीकेची झोड उठू लागली.

पालिकेने सप्टेंबर २०१८ पासून प्लास्टिक पिशव्या, चमचे, डीश, ग्लास, स्ट्रॉ, कंटेनर व थर्माकोलवर कारवाईला सुरूवात केल्याचा गवगवा केला. त्यातच सरकारची परवानगी नसताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नावाचा वापर करून सर्रास प्लास्टिक पिशव्या विकल्या जात असल्याचे ‘लोकमत’ ने उघड केल्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेच्या स्वच्छता निरीक्षक व मुकादमां सह भाईंदर पूर्वेच्या प्लास्टिक मार्केटमध्ये छापा घातला. परंतु उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी विक्रेत्यांकडील मोठ्या प्रमाणात साठा सोडून दिला.

त्या कारवाईत सुमारे २०० किलो प्लास्टिक जप्त करून ५५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. परंतु ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकल्यावर पालिकेने १८०० किलो प्लास्टिकचा साठा जप्त केला. त्यातच बंदी असलेले प्लास्टिक पहिल्यांदा आढळल्यास पाच हजाराचा दंड असताना पालिका केवळ दीडशे रूपयांची पावती फाडत आहे . मोहिमेचा फज्जा उडाला आहे.

बंदी असूनही प्लास्टिक पिशव्यांचा शहरात सुरू झालेला वापर हा जबाबदार महापालिकेचे बडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या हप्तेखोरीचे कारण वाटत आहे. कारण पालिकेने गेल्या काही महिन्यांपासून प्लास्टिक पिशव्यांची कारवाई बंद करून टाकल्याने वापर बिनधास्त सुरू आहे. सरकारने आयुक्त व संबंधित अधिकाºयांवर कारवाई केली पाहिजे. - प्रदीप जंगम, सामाजिक कार्यकर्ता

सध्या नालेसफाईचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याने स्वच्छता निरीक्षक आदी त्या कामात व्यस्त आहेत. कारवाई थांबलेली नाही. पण लवकरच ती व्यापक स्वरुपात केली जाईल. - डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक