शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
3
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
4
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
6
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
7
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
8
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
9
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
10
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
11
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
12
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
13
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
14
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
15
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
16
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
17
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
18
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
19
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
20
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?

अल्पसंख्यांक शाळांच्या अतिरिक्तांची आर्थिककोंडी , पाच हजार शिक्षकांपुढे पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 01:54 IST

अल्पसंख्यांक शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकाचे जोपर्यंत अन्य शाळेत समायोजन होणार नाही, तोपर्यंत त्यांना वेतन मिळणार नाही. यासाठी ‘विनाकाम

ठाणे : अल्पसंख्यांक शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकाचे जोपर्यंत अन्य शाळेत समायोजन होणार नाही, तोपर्यंत त्यांना वेतन मिळणार नाही. यासाठी ‘विनाकाम विनावेतन’ या तत्त्वाच्या आधारे वेतन अदा करण्यात येऊ नये, असे आदेश राज्य शासनाने जारी केले आहेत. यामुळे अल्पसंख्यांक शाळांचे अतिरिक्त शिक्षक आर्थिक संकटात सापडले आहेत. यामध्ये ठाणे व पालघर जिल्ह्यातील १०० माध्यमिक तर १०९ प्राथमिक शिक्षकांचा समावेश असून राज्यभरात सुमारे पाच हजार शिक्षकांना या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.शासनाच्या १३ जुलै च्या शासन निर्णयानुसार राज्यातील अल्पसंख्यांक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे अन्य शाळांमध्ये समायोजनची कार्यवाही करत असताना अतिरिक्त ठरलेल्या ज्या शिक्षकांचे समायोजन होणार नाही, त्यांचे समायोजन होईपर्यंत त्यांना ‘विनाकाम विनावेतन ’ या तत्त्वाच्या आधारे वेतन अदा करण्यात येऊ नये, असे आदेशित करण्यात आले आहे. या धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे राज्यातील अल्पसंख्याक शाळांमधील सुमारे पाच हजार शिक्षकांच्या कायम सेवा धोक्यात आल्या आहेत. तर पालघर व ठाणे जिल्हयातील सुमारे १०९ प्राथमिक व सुमारे शंभर माध्यमिक शिक्षकांचा समावेश असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष दिलीप तुकाराम डुंबरे यांनी सांगितले.या शिक्षकांना घेऊन डुंबरे यांनी ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी मिना यादव यांची भेट घेऊन समस्येची जाणीव करून दिलीे आहे.

 

टॅग्स :Teacherशिक्षक