शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अंबरनाथमधून बेपत्ता झालेला अल्पवयीन मुलगा सहा वर्षांनी अहमदनगरमध्ये मिळाला

By जितेंद्र कालेकर | Updated: December 19, 2020 00:37 IST

अंबरनाथ येथील घरातून निघून गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा अहमदनगर येथून शोध घेण्यात ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला यश आले आहे. आपला मुलगा सुखरुप मिळाल्याने त्याच्या पालकांनी ठाणे पोलिसांचे आभार मानले.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कामगिरी वडिल रागावल्याने झाला होता पसार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वडिल रागावल्यामुळे अंबरनाथ येथील घरातून निघून गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा अहमदनगर येथून शोध घेण्यात ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला यश आले आहे. त्याला शुक्रवारी सुखरुपपणे पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.संजयकुमार विश्वकर्मा या १७ वर्षीय मुलाच्या अपहरणाची तक्रार २०१४ मध्ये अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे २०१७ मध्ये सोपविण्यात आला होता. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग, उपनिरीक्षक सुनिल चव्हाणके आणि पोलीस हवालदार प्रविण दिवाळे यांनी अथक मेहनत घेऊन तांत्रिक माहितीद्वारे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा तो अहमदनगर जिल्हयातील कर्जत येथील थोटेवाडी येथे मजूरीचे काम करीत असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्याच माहितीच्या आधारे चव्हाणके यांच्या पथकाने अहमदनगर येथून १६ डिसेंबर २०२० रोजी त्याला ताब्यात घेतले. त्याची व्हिडिओ कॉलिंगद्वारे उत्तरप्रदेशात कामानिमित्त गेलेल्या त्याच्या वडिलांशी या पथकाने ओळख पटवून खात्री केली. तो आपलाच मुलगा असल्याचे त्याच्या वडिलांनी या पथकाला सांगितले. क्षुल्लक कारणावरुन रागावल्याने त्याने घर सोडल्याची माहिती त्याच्या चौकशीमध्ये समोर आली. थोटेवाडी येथे त्याच्या वर्णनाशी मिळता जुळता एक मुलगा असल्याची माहिती मिळाल्यानंतर या पथकाने त्याचा शोध घेतला.* आवाज बारीक असल्यामुळे गोंधळसंजयकुमार याचा आवाज त्याच्या वयाच्या मानाने कमी होता. त्यामुळे त्याच्या फोनवरील आवाजातून तो नसावा, अशी शक्यता होती. परंतू, प्रत्यक्षात थोटेवाडी गाठल्यानंतर मात्र तो संजयकुमार असल्याची खात्री पटल्याचे कडलग यांनी सांगितले. आपला मुलगा सुखरुप मिळाल्याने त्याच्या पालकांनी ठाणे पोलिसांचे आभार मानले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं