शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

अंबरनाथमधून बेपत्ता झालेला अल्पवयीन मुलगा सहा वर्षांनी अहमदनगरमध्ये मिळाला

By जितेंद्र कालेकर | Updated: December 19, 2020 00:37 IST

अंबरनाथ येथील घरातून निघून गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा अहमदनगर येथून शोध घेण्यात ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला यश आले आहे. आपला मुलगा सुखरुप मिळाल्याने त्याच्या पालकांनी ठाणे पोलिसांचे आभार मानले.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कामगिरी वडिल रागावल्याने झाला होता पसार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वडिल रागावल्यामुळे अंबरनाथ येथील घरातून निघून गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा अहमदनगर येथून शोध घेण्यात ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला यश आले आहे. त्याला शुक्रवारी सुखरुपपणे पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.संजयकुमार विश्वकर्मा या १७ वर्षीय मुलाच्या अपहरणाची तक्रार २०१४ मध्ये अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे २०१७ मध्ये सोपविण्यात आला होता. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग, उपनिरीक्षक सुनिल चव्हाणके आणि पोलीस हवालदार प्रविण दिवाळे यांनी अथक मेहनत घेऊन तांत्रिक माहितीद्वारे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा तो अहमदनगर जिल्हयातील कर्जत येथील थोटेवाडी येथे मजूरीचे काम करीत असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्याच माहितीच्या आधारे चव्हाणके यांच्या पथकाने अहमदनगर येथून १६ डिसेंबर २०२० रोजी त्याला ताब्यात घेतले. त्याची व्हिडिओ कॉलिंगद्वारे उत्तरप्रदेशात कामानिमित्त गेलेल्या त्याच्या वडिलांशी या पथकाने ओळख पटवून खात्री केली. तो आपलाच मुलगा असल्याचे त्याच्या वडिलांनी या पथकाला सांगितले. क्षुल्लक कारणावरुन रागावल्याने त्याने घर सोडल्याची माहिती त्याच्या चौकशीमध्ये समोर आली. थोटेवाडी येथे त्याच्या वर्णनाशी मिळता जुळता एक मुलगा असल्याची माहिती मिळाल्यानंतर या पथकाने त्याचा शोध घेतला.* आवाज बारीक असल्यामुळे गोंधळसंजयकुमार याचा आवाज त्याच्या वयाच्या मानाने कमी होता. त्यामुळे त्याच्या फोनवरील आवाजातून तो नसावा, अशी शक्यता होती. परंतू, प्रत्यक्षात थोटेवाडी गाठल्यानंतर मात्र तो संजयकुमार असल्याची खात्री पटल्याचे कडलग यांनी सांगितले. आपला मुलगा सुखरुप मिळाल्याने त्याच्या पालकांनी ठाणे पोलिसांचे आभार मानले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं