शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

एमआयएमची लढत आघाडीशीच!

By admin | Updated: October 27, 2015 00:15 IST

राज्यात दोन आमदार आणि औरंगाबाद महापालिकेत मिळालेल्या यशानंतर आॅल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलीमीन (एमआयएम) ही केडीएमसी निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे

प्रशांत माने, कल्याण राज्यात दोन आमदार आणि औरंगाबाद महापालिकेत मिळालेल्या यशानंतर आॅल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलीमीन (एमआयएम) ही केडीएमसी निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे. त्यांनी कल्याण पश्चिम आणि पूर्वेकडील मुस्लिमबहुल प्रभागात आपले उमेदवार उभे केले आहेत. साधारणत: पारंपरिक मुस्लिम मतदान हे काँग्रेस तसेच राष्ट्रवादीला होत असल्याचा अनुभव असताना यंदा मात्र हे चित्र पालटण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर एमआयएम आणि आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता पाहता होणाऱ्या मतविभाजनाचा लाभ कोणाला, हे पाहणेदेखील औत्सुक्याचे आहे.कल्याणमध्ये पावणेदोन ते दोन लाखांच्या आसपास मुस्लिम समाज आहे. येथील दूधनाका, रेतीबंदर, गांधी चौक, आनंदवाडी, बैलबाजार, सिंधीगेट, अशोकनगर, नेतिवली टेकडी, आंबेडकर रोड, मच्छी बाजार, बोंबिल बाजार, घासबाजार, वल्लीपीर रोड, गोविंदवाडी, कोळीवाडा, कचोरे, अन्सारी चौक या परिसरात मुस्लिम मतदारांची संख्या अधिक आहे. दरम्यान, पहिल्यांदाच केडीएमसीची निवडणूक लढविणाऱ्या एमआयएमने गोविंदवाडी, रोहिदासवाडा, गफुरडोन चौक, कचोरे, नेतिवली टेकडी, अशोकनगर वालधुनी आणि बैलबाजार अशा सात ठिकाणी आपले उमेदवार दिले आहेत. सहा ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिले असताना अशोकनगर वालधुनी प्रभागात अन्य समाजाच्या उमेदवाराला प्राधान्य दिले आहे. गतवेळचा आढावा घेता मुस्लिमबहुल प्रभागात उभ्या राहिलेल्या उमेदवारांपैकी काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच अपक्षांना मुस्लिम मतदारांनी पसंती दिली होती. यंदा एमआयएम रिंगणात उतरली आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करून लढत आहे. अन्य पक्षांचे उमेदवार जरी आखाड्यात असले तरी थेट लढत एमआयएम आणि आघाडीत होणार आहे. मुस्लिम पारंपरिक आघाडीला साथ करतात की एमआयएमचा पर्याय स्वीकारतात, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.