शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

लाखोंचे संगणक, स्मार्ट टीव्ही हाय , पण वीजच नाय; लोडशेडिंगमुळे विद्यार्थ्यांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 20:25 IST

ठाणे : जिल्हा परिषदेच्या एक हजार ३३० शाळांच्या तातडीच्या दुरुस्तीची तसेच विद्युत पुरवठा सुरळीत होण्याची गरज आहे. काही दिवसांपर्यंत ...

ठाणे : जिल्हा परिषदेच्या एक हजार ३३० शाळांच्या तातडीच्या दुरुस्तीची तसेच विद्युत पुरवठा सुरळीत होण्याची गरज आहे. काही दिवसांपर्यंत वीजबिल न भरल्यामुळे जिल्ह्यातील ४७८ शाळांतील वीजपुरवठा खंडित केला होता. ही समस्या सुटते ना सुटते तोच गावपाड्यांतील लोडशेडिंगची समस्या वाढली आहे. त्यामुळे शाळांत असलेले लाखोंचे संगणक, स्मार्ट टीव्ही विजेअभावी विद्यार्थ्यांना वापरता येत नाहीत.

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २४९ शाळांच्या वास्तू धोकादायक, मोडकळीस आल्या हाेत्या. त्यांची अलीकडेच डागडुजी सुरू केली. ग्रामीण भागातील मुलांनी शहरातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांत आता स्मार्ट टीव्ही व संगणक आहेत. मात्र, विजेअभावी त्यांचा फारसा वापर होत नसल्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी ज्ञानापासून वंचित आहेत. ठाणे जिल्हा परिषदेच्या मराठी, गुजराथी, हिंदी आणि ऊर्दू भाषिक एक हजार ३३० शाळा आहेत. या शाळांत ७७ हजार ३८३ विद्यार्थी शिक्षण घेतात. २४९ शाळा मोडकळीस आलेल्या आहेत. बहुतांश शाळांनी वीजबिल न भरल्यामुळे त्यांचे वीज कनेक्शन खंडित केले होते. वीजबिल रखडलेल्या ४७८ शाळांचे ४४ लाखांचे बिल भरल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दिली.

आर्थिकदृष्ट्या कमकुवत ग्रामपंचायतींतील शाळांचे वीजबिल सेस फंडातून भरण्याचा निर्णय घेतला. चांगले उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतींना त्यांच्या गावातील शाळांचे वीजबिल भरण्याची जबाबदारी दिली. त्यामुळे सध्या शाळांचे वीजबिल रखडल्याच्या तक्रारी नाहीत; परंतु लोडशेडिंगच्या समस्येमुळे वीजपुरवठा सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांना स्मार्ट टीव्ही, संगणक यांचा वापर करता येत नाही.

शाळांच्या वीजबिलाची समस्या मिटली

उत्पन्न चांगले असलेल्या ग्रामपंचायतींनी त्यांच्या गावातील शाळांचे वीजबिल भरण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले. पण बहुतांशी ग्रामपंचायतींचे फारसे उत्पन्न नसल्यामुळे या गावातील शाळांचे वीजबिल सेस निधीतून भरण्याची तरतूद जिल्हा परिषदेने केली. त्यामुळे वीजबिल रखडण्याची समस्या मिटली आहे.

४७८ शाळांचे वीजबिल भरले

वीजबिल भरण्याची समस्या जिल्ह्यातील ४७८ शाळांना भेडसावत होती. येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. जिल्हा परिषदेने सेस निधीतून या शाळांचे ४४ लाखांचे बिल भरल्याचा दावा उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी केला आहे.

जिल्हा परिषदेने स्वत:ची योजना लागू करून शाळांचे वीजबिल भरण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शाळांना आता वीजबिल रखडल्याची समस्या नाही.

- डॉ. भाऊसाहेब कारेकर, शिक्षणाधिकारी

जिल्ह्यातील एकूण शाळा

जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात मराठी भाषिक एक हजार ३०९ शाळा आहेत. याशिवाय गुजराथी व हिंदी भाषिक प्रत्येकी एक शाळा आहे, तर उर्दू भाषिक १९ शाळा आहेत.

टॅग्स :electricityवीजthaneठाणे