शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

जीन्स कारखान्यांचे अंबरनाथमध्ये स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 06:26 IST

उल्हासनगर हद्दीतील जीन्स कारखान्यांवर कारवाई होत असल्याने आता काही कारखानदारांनी उल्हासनगरमधून काढता पाय घेत अंबरनाथमध्ये आपले प्रस्थ निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

 अंबरनाथ : उल्हासनगर हद्दीतील जीन्स कारखान्यांवर कारवाई होत असल्याने आता काही कारखानदारांनी उल्हासनगरमधून काढता पाय घेत अंबरनाथमध्ये आपले प्रस्थ निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. एमआयडीसीला लागून असलेल्या रस्त्याच्या शेजारी काही कारखाने सुरू करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर जीन्स धुण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन खड्डे करून जमिनीत मुरवण्याचे काम सुरू केले आहे. या बेकायदा कारखान्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.अंबरनाथमधील काकोळे गावाला जाणाºया रस्त्यावर काही कारखाने उभारण्यात आले आहेत. या कारखान्यांत जीन्स तयार करण्यात येतात. जीन्सला रंगवण्यासाठी वापरण्यात येणारे रासायनिक पाणी नष्ट करण्यासाठी कारखान्यांच्या शेजारी मोठे खड्डे खोदण्यात आले आहे. त्या खड्ड्यांमध्ये रासायनिक पाणी टाकण्यात येते. उल्हासनगरमध्ये वालधुनी नदी प्रदूषणाच्या मुद्यावर कारखान्यांवर कारवाई करण्यात येत आहे.उल्हासनगरमधील कंपन्या अडचणीत आल्याने अनेक कारखाने आता अंबरनाथमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. पाले गाव परिसरात काही कारखाने आलेआहेत. तर, काकाळे गावाजवळ काही कारखाने स्थलांतरित झाले आहे.या ठिकाणी प्रदूषित पाणी उघड्यावर सोडण्यात येत आहे. हे कारखाने उभारताना कोणतीच परवानगी घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. तर, प्रदूषित पाणी हे थेट उघड्यावर कसे टाकले जाते, याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :thaneठाणे