शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

एमएमआरडीए, म्हाडासह एमआयडीसीला कोट्यवधींच्या व्याजावर सोडावे लागणार पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 04:11 IST

एमएसआरडीसीला दिलेल्या साडेपाच हजार कोटींच्या कर्जावरील व्याजाला आता सिडको, एमएमआरडीए, म्हाडा आणि एमआयडीसीला पाणी सोडावे लागणार आहे.

नारायण जाधव ठाणे : बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी एमएसआरडीसीला दिलेल्या साडेपाच हजार कोटींच्या कर्जावरील व्याजाला आता सिडको, एमएमआरडीए, म्हाडा आणि एमआयडीसीला पाणी सोडावे लागणार आहे. भूसंपादनामुळे विहीत मुदतीत या मार्गाचे बांधकाम पूर्ण न झाल्याने आणि कोविडमुळे ते आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यामुळे एसआरडीसीची पत घसरण्याची भीती लक्षात घेऊन शासनाने उपरोक्त महामंडळांनी दिलेल्या कर्जाचे अचानक एमएसआरडीसीच्या समभागात रुपांतर केले आहे.यात सिडको, एमएमआरडीए, म्हाडा, झोपु यांचे प्रत्येकी हजार कोटी तर एमआयडीसीने दिलेल्या दीड हजार कोटी रु पये कर्जाचा समावेश आहे.शासनाने जबरदस्ती करून त्यांना कर्ज देण्यास भाग पाडून व्याज देण्याचे अमिंष दाखिवले होते. परंतु, आता त्याचे १३ आॅगस्ट २०२० रोजी एमएसआरडीसीच्या समभागात रुपांतर केल्याने या कोटयावधींच्या व्याजास उपरोक्त महामंडळांना मुकावे लागणार आहे. आठ टक्केलाभांश देण्याचे प्रलोभन दाखिवले आहेसुमारे ७१० किमीचा महामार्ग १० जिल्ह्यांतील ३८१ गावांतून जाणार आहे. त्यावर ५५ हजार ५०० कोटी रु पये खर्च होणार असून त्यातील १२ ते १६ हजार कोटी रु पये भूसंपादनासाठी लागणार आहेत.>पाचही महामंडळांचे कोट्यवधींचे नुकसानसाडेपाच हजार कोटी कर्जाचे समभागात रु पांतर करतांना त्यांना आठ टक्केलाभांश देण्याचे प्रलोभन दाखिवले आहे. मात्र लाभांश हा निव्वळ नफ्यावर मिळतो. परंतु आधीच एमएसआरडीसी तोटयात आहे. त्यातच ७७ हजार कोटींच्या समृद्धी महामार्गासाठी त्यांनी बाजारातून कर्ज घेतली आहेत. शिवाय बांद्रा-वर्सोवा सी लिंक, मुंबई-पुणे मिसिंग लिंक, भिवंडी -शीळफाटा मार्ग, वाशी खाडी पूल -३ असे महागडे प्रकल्प एमएसआरडीसीने हाती घेतले आहेत. यामुळे या महामंडळास नफा होऊन लाभांश जाहिर होणे दुरापास्त आहे. यामुळे तेल ही गेले तुपही गेले हाती धुपाटणे आले अशी गत होऊन सिडको, एमएमआरडीए, म्हाडा, झोपुसह एमआयडीसी या पाचही महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.>बँकांकडूनही घेतले हजारो कोटींचे कर्जमुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी भारतीय स्टेट बँकेकडून चार हजार कोटींचे कर्जास विशेष हेतू कंपनीस राज्य शासनाने हमी दिली आहे. या शिवाय एलआयसी अर्थात भारतीय आर्युविमा महामंडळ, कॅनरा बँक, हुडको आणि पंजाब नॅशनल बँक अशा चार वित्त संस्थाकडूनही १३ हजार कोटी कर्ज घेण्यास मान्यता दिली आहे