शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

एमआयडीसी, स्टेम पाठोपाठ आता भातसानेही लागू केली रोज १० टक्के पाणी कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 16:08 IST

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या दोन भागात केला जाणारा पाणी पुरवठा हा यापूर्वी १२ -१२ तास अशा फरकाने आठवड्यातून एकदा बंद राहत होता. परंतु आता भातसानेसुध्दा १० टक्के पाणी कपात लागू केल्याने या दोनही भागांचा पाणी पुरवठा यापुढे आठवड्यातून एक दिवस २४ तास बंद राहणार आहे.

ठळक मुद्देठाणेकरांना मात्र पालिका देणार दिलासावाढीव पाण्याची पालिकेची मागणी

ठाणे - एमआयडीसी, स्टेम यांनी १४ टक्के पाणी कपात लागू केल्यानंतर आता भातसावरुन उचलण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यावर सुध्दा दरदिवशी १० टक्के कपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे शहराची पाणी कपात वाढणार आहे. परंतु यावर उपाय म्हणून महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने लघु पाटबंधारे विभागाला पत्र लिहून दरदिवशी ही कपात करण्याऐवजी आठवड्यातून एकदाच २४ तासांचे शटडाऊन करु असे कळविले आहे. त्यानुसार या विभागाने सुध्दा महापालिकेची ही मागणी तुर्तास मान्य केली आहे. त्यामुळे मध्यवर्ती ठाण्यातील नागरीकांना रोजच्या रोज पाणी कपातीचा सामना करावा लागणार नसून आठवड्यातून एकदा २४ तासांच्या कपातीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे एकप्रकारे ठाणेकरांना दिलासा देण्याचे काम पालिकेने केले आहे.                      ठाणे शहराला ४८० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा हा विविध स्त्रोतांच्या माध्यमातून केला जात आहे. त्यानुसार एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठ्यात १४ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यानुसार यामुळे कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात आठवड्यातून एकदा म्हणजेच गुरुवारी रात्री ९ ते शुक्रवारी रात्री ९ वाजेपर्यंत पाणी कपात केली जात होती. तर स्टेमकडून होणाºया पाणी पुरवठ्यातही १४ टक्के कपात करण्यात आल्याने महापालिकेने याचेसुध्दा नियोजन दोन टप्यात केले होते. त्यानुसार शहरातील अर्ध्या भागाला १२ तास आणि उर्वरीत भागाला १२ तास असे पाणी कपातीचे नियोजन केले होते.                      परंतु आता भातसानेसुध्दा रोज १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्या आशयाचे पत्र पालिकेला प्राप्त झाले आहे. त्यामुळे मध्यवर्ती आणि उर्वरीत ठाण्याला याचा फटका बसणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. महापालिका सध्या भातसावरुन २०० दशलक्ष लीटर पाणी उचलत आहे. त्यामुळे रोज १० टक्के या प्रमाणे ठाणेकरांना २० दशलक्ष लीटर कमी पाणी मिळणार होते. भातसाने घेतलेल्या या निर्णयामुळे ठाणेकरांना रोज पाणी कपातीचा सामना करावा लागणार होता. त्यामुळे कदाचित अनेक भागांना या पाणी कपातीचा तीव्र सामना करावा लागण्याची शक्यताही होती. आता मात्र पालिकेने या संदर्भात लघु पाटबंधारे विभागाला पत्र लिहिले आहे. तसेच मंगळवारी या संदर्भात पालिका आणि विभागाच्या अधिकाºयांमध्ये चर्चा झाली आहे. या चर्चेच्या अनुषंगाने रोजच्या रोज १० टक्के पाणी कपात न करता, आठवड्यातून एकदा २४ तासांची कपात घेऊ असे पालिकेने संबधींत विभागाला सांगितले आहे. त्यामुळे ठाणेकरांचे होणारे हाल कमी होणार असून आठवड्यातून एकदाच २४ तासांची कपात घेतली जाणार आहे. याशिवाय २४ तासांची ही कपात घेत असतांना दुसरीकडे सध्या होणाºया २०० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा हा १० दशलक्ष लीटरने वाढवून मिळावा अशी मागणीसुध्दा केली आहे. त्यामुळे आठवड्याचे सहा दिवस ठाणेकरांना थोडा का होईना जास्तीचा पाणीपुरवठा होणार आहे. पालिकेने उचललेल्या या पावलामुळे ठाणेकरांना कपातीचे चटके कमी प्रमाणात सहन करावा लागणार आहे.

  • यापुढे या भागात होणार २४ तासाची पाणी कपात

ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतून ठाणे शहरात टप्याटप्याने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये बुधवारी सकाळी ९ पासून रात्री ९ पर्यंत शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, गांधीनगर आदी परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर या परिसराचा पाणी पुरवठा बुधवारी रात्री ९ वाजल्यापासून गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार होता. परंतु आता पालिकेने घेतलेल्या निर्णयामुळे या दोनही भागांचा पाणीपुरवठा यापुढे बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ असा सलग २४ तास बंद राहणार आहे.

  • एमआयडीसीची १४ टक्के पाणी कपात

एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठ्यातही १४ टक्के कपात लागू करण्यात आल्याने गुरुवारी रात्री ९ ते शुक्रवारी रात्री ९ या कालावधीत २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. त्यानुसार या कालावधीत शहरातील कळव्याचा काही भाग, विटावा, मुंब्रा कौसा, डायघर, देसाई इंदिरानगर, रूपादेवीपाडा, वागळे, फायरब्रिगेड, बाळकूम पाडा क्र .१ आदी भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाWaterपाणी