शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

एमआयडीसी, स्टेम पाठोपाठ आता भातसानेही लागू केली रोज १० टक्के पाणी कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 16:08 IST

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या दोन भागात केला जाणारा पाणी पुरवठा हा यापूर्वी १२ -१२ तास अशा फरकाने आठवड्यातून एकदा बंद राहत होता. परंतु आता भातसानेसुध्दा १० टक्के पाणी कपात लागू केल्याने या दोनही भागांचा पाणी पुरवठा यापुढे आठवड्यातून एक दिवस २४ तास बंद राहणार आहे.

ठळक मुद्देठाणेकरांना मात्र पालिका देणार दिलासावाढीव पाण्याची पालिकेची मागणी

ठाणे - एमआयडीसी, स्टेम यांनी १४ टक्के पाणी कपात लागू केल्यानंतर आता भातसावरुन उचलण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यावर सुध्दा दरदिवशी १० टक्के कपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे शहराची पाणी कपात वाढणार आहे. परंतु यावर उपाय म्हणून महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने लघु पाटबंधारे विभागाला पत्र लिहून दरदिवशी ही कपात करण्याऐवजी आठवड्यातून एकदाच २४ तासांचे शटडाऊन करु असे कळविले आहे. त्यानुसार या विभागाने सुध्दा महापालिकेची ही मागणी तुर्तास मान्य केली आहे. त्यामुळे मध्यवर्ती ठाण्यातील नागरीकांना रोजच्या रोज पाणी कपातीचा सामना करावा लागणार नसून आठवड्यातून एकदा २४ तासांच्या कपातीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे एकप्रकारे ठाणेकरांना दिलासा देण्याचे काम पालिकेने केले आहे.                      ठाणे शहराला ४८० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा हा विविध स्त्रोतांच्या माध्यमातून केला जात आहे. त्यानुसार एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठ्यात १४ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यानुसार यामुळे कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात आठवड्यातून एकदा म्हणजेच गुरुवारी रात्री ९ ते शुक्रवारी रात्री ९ वाजेपर्यंत पाणी कपात केली जात होती. तर स्टेमकडून होणाºया पाणी पुरवठ्यातही १४ टक्के कपात करण्यात आल्याने महापालिकेने याचेसुध्दा नियोजन दोन टप्यात केले होते. त्यानुसार शहरातील अर्ध्या भागाला १२ तास आणि उर्वरीत भागाला १२ तास असे पाणी कपातीचे नियोजन केले होते.                      परंतु आता भातसानेसुध्दा रोज १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्या आशयाचे पत्र पालिकेला प्राप्त झाले आहे. त्यामुळे मध्यवर्ती आणि उर्वरीत ठाण्याला याचा फटका बसणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. महापालिका सध्या भातसावरुन २०० दशलक्ष लीटर पाणी उचलत आहे. त्यामुळे रोज १० टक्के या प्रमाणे ठाणेकरांना २० दशलक्ष लीटर कमी पाणी मिळणार होते. भातसाने घेतलेल्या या निर्णयामुळे ठाणेकरांना रोज पाणी कपातीचा सामना करावा लागणार होता. त्यामुळे कदाचित अनेक भागांना या पाणी कपातीचा तीव्र सामना करावा लागण्याची शक्यताही होती. आता मात्र पालिकेने या संदर्भात लघु पाटबंधारे विभागाला पत्र लिहिले आहे. तसेच मंगळवारी या संदर्भात पालिका आणि विभागाच्या अधिकाºयांमध्ये चर्चा झाली आहे. या चर्चेच्या अनुषंगाने रोजच्या रोज १० टक्के पाणी कपात न करता, आठवड्यातून एकदा २४ तासांची कपात घेऊ असे पालिकेने संबधींत विभागाला सांगितले आहे. त्यामुळे ठाणेकरांचे होणारे हाल कमी होणार असून आठवड्यातून एकदाच २४ तासांची कपात घेतली जाणार आहे. याशिवाय २४ तासांची ही कपात घेत असतांना दुसरीकडे सध्या होणाºया २०० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा हा १० दशलक्ष लीटरने वाढवून मिळावा अशी मागणीसुध्दा केली आहे. त्यामुळे आठवड्याचे सहा दिवस ठाणेकरांना थोडा का होईना जास्तीचा पाणीपुरवठा होणार आहे. पालिकेने उचललेल्या या पावलामुळे ठाणेकरांना कपातीचे चटके कमी प्रमाणात सहन करावा लागणार आहे.

  • यापुढे या भागात होणार २४ तासाची पाणी कपात

ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतून ठाणे शहरात टप्याटप्याने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये बुधवारी सकाळी ९ पासून रात्री ९ पर्यंत शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, गांधीनगर आदी परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर या परिसराचा पाणी पुरवठा बुधवारी रात्री ९ वाजल्यापासून गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार होता. परंतु आता पालिकेने घेतलेल्या निर्णयामुळे या दोनही भागांचा पाणीपुरवठा यापुढे बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ असा सलग २४ तास बंद राहणार आहे.

  • एमआयडीसीची १४ टक्के पाणी कपात

एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठ्यातही १४ टक्के कपात लागू करण्यात आल्याने गुरुवारी रात्री ९ ते शुक्रवारी रात्री ९ या कालावधीत २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. त्यानुसार या कालावधीत शहरातील कळव्याचा काही भाग, विटावा, मुंब्रा कौसा, डायघर, देसाई इंदिरानगर, रूपादेवीपाडा, वागळे, फायरब्रिगेड, बाळकूम पाडा क्र .१ आदी भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाWaterपाणी