शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मीरा रोडमधील म्हाळगी उद्यानाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 23:58 IST

पालिकेचे दुर्लक्ष : नागरिकांनी व्यक्त केला संताप, श्रेय लाटण्यासाठी नेत्यांकडून बेकायदा उद््घाटन

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेने काही कोटी खर्चून विकसित केलेल्या रामदेव पार्कमधील रामभाऊ म्हाळगी उद्यानाची अवघ्या दोन वर्षांतच दुरवस्था झाली आहे. उद्यानाचे श्रेय लाटण्यासाठी पालिका निवडणुकीआधी परस्पर उद्घाटनाचा खटाटोप करणाऱ्या राजकीय नेत्यांनी निवडणुकीनंतर उद्यानाकडे पाहिले नसल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे महापौरांच्या प्रभागातील उद्यान आहे.

पालिका निवडणुकीपूर्वी रामदेव पार्कमधील आरक्षणात काही कोटी रुपये खर्चून उद्यान विकसित करण्यात आले होते. मोठा गाजावाजा करत राजकीय श्रेय घेण्यासाठी परस्पर बेकायदा उद्घाटन केले होते. म्हाळगी उद्यानात लहान मुलांसाठी खेळणी, ओपन जिम, योगा करण्यासाठी शेड, मासे-कासव आदींकरिता तलाव, पिण्याच्या पाण्यासाठी कूलर, स्वच्छतागृह, गवत, बसण्यास बाकडे आदी सुविधा दिल्या होत्या.

महापालिका प्रशासनासह स्थानिक नगरसेवकांकडून मात्र उद्यानाच्या देखभालीकडे डोळेझाक झाल्याने दुरवस्था सुरू झाली आहे. आतील बहुतांश गवत सुकून गेले आहे. चालण्यासाठी बनवलेल्या जॉगर्स ट्रॅकच्या लाद्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे निखळल्या आहेत. त्यामुळे चालताना होणारा त्रास पाहता नागरिकांनी चालणे कमी केले आहे. उद्यानात कचरा वाढला असून स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. लावलेली रोपे सुकून गेली आहेत. झाडांनाही पाणी नियमित दिले जात नाही. तलावातील पाणी बदलणे व त्याचे शुद्धीकरण केले जात नसल्याने दुर्गंधी पसरण्याबरोबर मासे मरू लागले आहेत.महापौर डिम्पल मेहता यांच्या प्रभागातील हे उद्यान असून आठ महिन्यांपासून पालिकेकडे उद्यानातील दुरवस्थेबाबत तक्रार केली आहे. महापौरांसह गटनेता असे एकूण चार स्थानिक भाजप नगरसेवकांचेही लक्ष नही. महापालिकेने नागरिकांच्या करातून विकसित केलेल्या या उद्यानाच्या दुरवस्थेमुळे कोट्यवधी वाया गेले आहेत. त्याला जबाबदार कोण? श्रेय घेण्यासाठी चमकोगिरी करणारे नगरसेवक व त्यांचे नेते आता कुठे आहेत?- निलेश साहू , तक्र ारदार 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे