शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो येणार; ऑक्सिजनचे कोठार उद्ध्वस्त होणार

By संदीप प्रधान | Updated: March 31, 2025 13:20 IST

Thane News: महाराष्ट्रातील राज्यकर्ते आणि नियोजन मयांचा यापूर्वीही सूतराम संबंध नव्हता व भविष्यातही तो असण्याची शक्यता दिसत नाही. जगभरातील प्रगत देशांत सार्वजनिक आरोग्य, वाहतूक, शिक्षण व्यवस्थेवर भर दिला जातो. या सेवा तिकडे आपल्याकडील खासगी सेवांपेक्षा अधिक उच्च दर्जाच्या असतात.

- संदीप प्रधान(वरिष्ठ सहायक संपादक)

महाराष्ट्रातील राज्यकर्ते आणि नियोजन मयांचा यापूर्वीही सूतराम संबंध नव्हता व भविष्यातही तो असण्याची शक्यता दिसत नाही. जगभरातील प्रगत देशांत सार्वजनिक आरोग्य, वाहतूक, शिक्षण व्यवस्थेवर भर दिला जातो. या सेवा तिकडे आपल्याकडील खासगी सेवांपेक्षा अधिक उच्च दर्जाच्या असतात. मात्र, आपल्याकडे खासगी वाहने कशी वाढतील, यासाठी दोन दशकांत प्रयत्न केले. आता मेट्रोच्या उभारणीतून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे वाटचाल सुरू आहे. परंतु, दोन ते अडीच दशकांत बांधकाम व्यावसायिकांनी इंच इंच जमीन बांधायला घेतल्याने मेट्रो कारशेडसाठी जमीन उपलब्ध होत नाही. त्यामुळे अगोदर आरेचे व आता उत्तन येथील जंगल उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्यामुळे मेट्रो येणार; पण ऑक्सिजनचे कोठार उद्ध्वस्त होणार आहे. 

राज्य सरकारने १९८० व ९० च्या दशकात मेट्रोची उभारणी सुरू करायला हवी होती. त्याचवेळी मेट्रोचे जाळे उभे केले असते तर मध्य व पश्चिम रेल्वेला पर्याय उभा राहिला असता. मेट्रो एव्हाना दहिसर-बदलापूरपर्यंत गेली असती. मेट्रोच्या कारशेडवरून भाजप व उद्धवसेना यांच्यात मानापमान नाट्य रंगले. अखेर आरे कॉलनीतील २९०० झाडे तोडून कारशेड उभी केली जात आहे. पर्यायी झाडे लावतोय वगैरे खुलासे एमएमआरडीएचे अधिकारी करतील. परंतु, गेल्या पाच-पन्नास वर्षापासून उभी असलेली झाडे, त्याच्या आजूबाजूला असलेला पक्षी, प्राण्यांचा अधिवास संपुष्टात आणायचा व त्या बदल्यात कुठेतरी झाडे लावल्याचे अहवाल तोंडावर फेकायचे ही शुद्ध धूळफेक आहे.

भाईदरकडे येणाऱ्या मेट्रोचे शेवटचे स्थानक सुभाषचंद्र बोस मैदान हे असेल. या परिसरातील जमिनी अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी खरेदी केल्या आहेत. येथील फ्लॅटचे दर चौरस फुटाला १२ ते १५ हजार रुपये आहेत. येथील राई, मुर्धा, मोर्वा गावांत कारशेड प्रस्तावित होती. परंतु, येथील स्थानिकांच्या जमिनींना सोन्याचा भाव बांधकाम व्यावसायिक देत आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांच्या इशाऱ्यावरून गावकऱ्यांनी कारशेडला विरोध केल्याने या शेवटच्या स्थानकापासून सात ते आठ किमी दूर डोंगरावरील ६० हेक्टर जमिनीत ही कारशेड होणार आहे. एवढी प्रचंड जमीन कारशेडसाठी का हवी, हेही कोडे आहे. येथील १२ हजार ४०० झाडांचा बळी दिला जाणार आहे. यात अनेक औषधी व दैनंदिन वापरासाठी उपयुक्त झाडांचा समावेश आहे. दाट जंगलाच्या या परिसरात बिबटे, कोल्हे, रानडुक्कर व वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रजातींचे वास्तव्य आहे. हे जंगल आणि किनारपट्टीचे कांदळवन मीरा-भाईंदर व परिसराला ऑक्सिजनचा पुरवठा करणारी कोठारे आहेत. आरेसारखाच हाही निर्णय पूर्णत्वाला नेला जाईल व स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली जाईल.

टॅग्स :thaneठाणेMetroमेट्रोenvironmentपर्यावरण