शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
2
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
3
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
4
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
5
सोनं, चांदी, रोख रक्कम नाही तर हुंड्यात मागितली किडनी, नकार दिला तेव्हा...
6
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!
7
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
8
Austria Shooting: बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा मृत्यू, स्वतःलाही संपवलं
9
ICICI आणि HDFC बँकेचा ग्राहकांना धक्का! एका निर्णयामुळे होणार लाखो रुपयांचे नुकसान?
10
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
11
Inspirational: 'या' तीन गोष्टी आजपासून फॉलो करा, पाच वर्षांनी लोक तुम्हाला फॉलो करतील!
12
भारतीयांनी ज्या देशाला 'बॉयकॉट' केलं, त्याचीच ग्लोबल ब्रँड अँबेसिडर बनली कतरिना कैफ
13
अनिल अंबानींच्या कंपनीनं तोडला १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, एकाच महिन्यात कमावले हजारो कोटी
14
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
15
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
16
सोनम रघुवंशीनेच राजाला दरीत ढकललं, आरोपींचा नवा धक्कादायक खुलासा!
17
सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली...
18
SIP मध्ये गुंतवणूक करुन १० लाख रुपये जमवायचेत? महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक, 'या' गोष्टींचीही घ्या काळजी
19
Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?

मेट्रो येणार; ऑक्सिजनचे कोठार उद्ध्वस्त होणार

By संदीप प्रधान | Updated: March 31, 2025 13:20 IST

Thane News: महाराष्ट्रातील राज्यकर्ते आणि नियोजन मयांचा यापूर्वीही सूतराम संबंध नव्हता व भविष्यातही तो असण्याची शक्यता दिसत नाही. जगभरातील प्रगत देशांत सार्वजनिक आरोग्य, वाहतूक, शिक्षण व्यवस्थेवर भर दिला जातो. या सेवा तिकडे आपल्याकडील खासगी सेवांपेक्षा अधिक उच्च दर्जाच्या असतात.

- संदीप प्रधान(वरिष्ठ सहायक संपादक)

महाराष्ट्रातील राज्यकर्ते आणि नियोजन मयांचा यापूर्वीही सूतराम संबंध नव्हता व भविष्यातही तो असण्याची शक्यता दिसत नाही. जगभरातील प्रगत देशांत सार्वजनिक आरोग्य, वाहतूक, शिक्षण व्यवस्थेवर भर दिला जातो. या सेवा तिकडे आपल्याकडील खासगी सेवांपेक्षा अधिक उच्च दर्जाच्या असतात. मात्र, आपल्याकडे खासगी वाहने कशी वाढतील, यासाठी दोन दशकांत प्रयत्न केले. आता मेट्रोच्या उभारणीतून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे वाटचाल सुरू आहे. परंतु, दोन ते अडीच दशकांत बांधकाम व्यावसायिकांनी इंच इंच जमीन बांधायला घेतल्याने मेट्रो कारशेडसाठी जमीन उपलब्ध होत नाही. त्यामुळे अगोदर आरेचे व आता उत्तन येथील जंगल उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्यामुळे मेट्रो येणार; पण ऑक्सिजनचे कोठार उद्ध्वस्त होणार आहे. 

राज्य सरकारने १९८० व ९० च्या दशकात मेट्रोची उभारणी सुरू करायला हवी होती. त्याचवेळी मेट्रोचे जाळे उभे केले असते तर मध्य व पश्चिम रेल्वेला पर्याय उभा राहिला असता. मेट्रो एव्हाना दहिसर-बदलापूरपर्यंत गेली असती. मेट्रोच्या कारशेडवरून भाजप व उद्धवसेना यांच्यात मानापमान नाट्य रंगले. अखेर आरे कॉलनीतील २९०० झाडे तोडून कारशेड उभी केली जात आहे. पर्यायी झाडे लावतोय वगैरे खुलासे एमएमआरडीएचे अधिकारी करतील. परंतु, गेल्या पाच-पन्नास वर्षापासून उभी असलेली झाडे, त्याच्या आजूबाजूला असलेला पक्षी, प्राण्यांचा अधिवास संपुष्टात आणायचा व त्या बदल्यात कुठेतरी झाडे लावल्याचे अहवाल तोंडावर फेकायचे ही शुद्ध धूळफेक आहे.

भाईदरकडे येणाऱ्या मेट्रोचे शेवटचे स्थानक सुभाषचंद्र बोस मैदान हे असेल. या परिसरातील जमिनी अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी खरेदी केल्या आहेत. येथील फ्लॅटचे दर चौरस फुटाला १२ ते १५ हजार रुपये आहेत. येथील राई, मुर्धा, मोर्वा गावांत कारशेड प्रस्तावित होती. परंतु, येथील स्थानिकांच्या जमिनींना सोन्याचा भाव बांधकाम व्यावसायिक देत आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांच्या इशाऱ्यावरून गावकऱ्यांनी कारशेडला विरोध केल्याने या शेवटच्या स्थानकापासून सात ते आठ किमी दूर डोंगरावरील ६० हेक्टर जमिनीत ही कारशेड होणार आहे. एवढी प्रचंड जमीन कारशेडसाठी का हवी, हेही कोडे आहे. येथील १२ हजार ४०० झाडांचा बळी दिला जाणार आहे. यात अनेक औषधी व दैनंदिन वापरासाठी उपयुक्त झाडांचा समावेश आहे. दाट जंगलाच्या या परिसरात बिबटे, कोल्हे, रानडुक्कर व वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रजातींचे वास्तव्य आहे. हे जंगल आणि किनारपट्टीचे कांदळवन मीरा-भाईंदर व परिसराला ऑक्सिजनचा पुरवठा करणारी कोठारे आहेत. आरेसारखाच हाही निर्णय पूर्णत्वाला नेला जाईल व स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली जाईल.

टॅग्स :thaneठाणेMetroमेट्रोenvironmentपर्यावरण