शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भाईंदरच्या राई-मुर्धा येथील मेट्रो कारशेड उत्तनला जाणार, ४ ते ५ हजार कोटींनी खर्च वाढणार - आ. सरनाईक

By धीरज परब | Updated: December 21, 2022 17:03 IST

मेट्रो कारशेडही उत्तन येथील सरकारी जागेवर उभारले जाणार असल्याने मेट्रोचा लाभ उत्तन वासियांना सुद्धा होणार आहे. मात्र कारशेड पुढे नेल्याने ४ ते ५ हजार कोटींचा खर्च वाढणार आहे.

मीरारोड -  भाईंदरच्या राई-मुर्धा गावा दरम्यान होणारी मेट्रो कारशेडही उत्तन येथील सरकारी जागेवर उभारले जाणार असल्याने मेट्रोचा लाभ उत्तन वासियांना सुद्धा होणार आहे. मात्र कारशेड पुढे नेल्याने ४ ते ५ हजार कोटींचा खर्च वाढणार आहे.  तर मुर्धा-मोरवा येथील रस्ता ३० मीटर  इतकाच रुंद केला जाणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे झाला असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. 

भाईंदरच्या राई - मुर्धा दरम्यान विकास आराखड्यातील ३० मीटर रुंद रस्ता करण्यास बाधित लोकांनी विरोध चालवला होता. रस्त्याचे कामसुद्धा बंद पाडण्यात आल्याने रस्त्याची दुरावस्था झाली. नंतर राई - मुर्धा दरम्यान प्रस्तावित मेट्रो कारशेडला स्थानिकांच्या एका संघटनेमार्फत विरोध चालवला आहे. प्रस्तावित कारशेड आरक्षण विरोधात लोकांनी हरकती घेतल्या आहेत. 

आ. सरनाईक यांना संघटने मार्फत शिष्टमंडळ भेटल्यानंतर त्यांनीसुद्धा कारशेड हलवण्याची मागणी चालवली होती. नागपूर येथील सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी मेट्रो कारशेडचा मुद्दा उपस्थित केला होता. गोंधळsमुळे त्यावर चर्चा न झाल्याने आ. सरनाईकानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कारशेड उत्तन येथे हलवण्याची मागणी केली असता ती त्यांनी मान्य केली आहे. स्थानिकांचा विरोध असल्याने मेट्रो कारशेडचे आरक्षण रद्द केले जाणार आहे. आता उत्तन येथे कारशेड करण्याबाबत एमएमआरडीए नवीन प्रस्ताव तयार करेल व नगरविकास विभागाकडे पाठवेल. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले आहेत' अशी माहिती आ. सरनाईक यांनी दिली. भाईंदरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत येणारी मेट्रो आता उत्तनपर्यंत जाईल. परिसरातील ग्रामस्थांना मेट्रोचा फायदा होईल शिवाय पर्यटन वाढेल.  मेट्रो पुढे नेण्यासाठी व उत्तन येथे कारशेड करण्यासाठी सरकारवर अतिरिक्त ४ ते ५ हजार कोटींचा खर्च होणार आहे. उत्तन येथे शासकीय जमिनीवर डोंगर तोडून मेट्रो कारशेड बनेल.  मेट्रो उत्तनपर्यंत जाणार असल्याने मुख्य रस्ता ३० मीटर इतका रुंद करावा लागणार आहे. 

मेट्रो कारशेड बाबत भुमीपुत्रांच्या वेळोवेळी बैठका घेऊन त्यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला होता. कारशेड विरोधात सातत्याने शासना कडे मागणी चालवली होती. मुख्यमंत्र्यांनीही स्थानिक भुमीपुत्रांच्या बाजूनेच निर्णय द्यावा यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे आ. सरनाईक म्हणाले.  

टॅग्स :Metroमेट्रोpratap sarnaikप्रताप सरनाईक