शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

तुळशी विवाहाच्या माध्यमातून नेत्रदानाचा दिला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 00:51 IST

ठाण्यातील जांभळीनाका येथे बाळगोपाळ मित्र मंडळ, नारळवाला चाळ यांच्या वतीने नेत्रदानाचा संदेश देत तुळशीविवाह आयोजित करण्यात आला होता.

ठाणे : ठाण्यातील जांभळीनाका येथे बाळगोपाळ मित्र मंडळ, नारळवाला चाळ यांच्या वतीने नेत्रदानाचा संदेश देत तुळशीविवाह आयोजित करण्यात आला होता. यामध्ये दृष्टिहीन मुलांनी सहभाग घेतला होता. या तुळशीविवाहाच्या माध्यमातून एकाच दिवसात सुमारे १२६ नेत्रदानाचे अर्ज भरण्यात आले.ज्याच्याजवळ ज्या गरजेच्या गोष्टीची उणीव असते, त्या व्यक्तीला वस्तूचे महत्त्व विशेषत्वाने कळते, असा एक सिद्धान्त आहे. या सिद्धान्तावरूनच म्हटले जाते, की एका सेकंदाचे महत्त्व किती आहे, हे सेकंदाच्या फरकाने स्पर्धा हरलेल्या व्यक्तीला विचारा. तसेच दृष्टीचे महत्त्व किती आहे, याची जाणीव तुम्ही एखाद्या प्रज्ञाचक्षू बांधवाच्या दृष्टीने दुनिया समजून घ्यायचा प्रयत्न कराल तेव्हाच जास्त प्रकर्षाने होईल. यासाठी नेत्रदान केले तर आपण एखाद्याला दृष्टी देऊन शक्ती देण्यासाठी नेत्रदान करा, असा संदेश देण्यासाठी अवयवदान चळवळीचे प्रणेते विलास ढमाले यांच्या बाळगोपाळ मित्र मंडळाच्या वतीने तुळशीविवाह आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. संजय केळकर, जिव्हाळा महिला मंडळाच्या अध्यक्ष मंजिरी ढमाले, राहुल नवघणे, शाखाप्रमुख सचिन चव्हाण, शशिकांत गुरव, दीपक मानकामे, अमित टण्णू, अनिल हुसफर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यंदा या तुळशीविवाहाचे ७९ वे वर्ष असल्याने नेत्रदानाचा संदेश देण्यात आला.नेत्रदानाचा संकल्प सोडण्याअगोदर या विषयाची गरज आणि आपल्याला त्यात देता येऊ शकणारे योगदान या मुद्यांविषयी समाजाच्या तळागाळात संदेश पोहोचला, तरीही मोठ्या प्रमाणावर अंधत्व निवारणासाठी चालना मिळू शकते, तसेच मृत्यूनंतर नेत्रदान करणे सरकारने बंधनकारक केले, तर देशात कोणीच दृष्टिहीन राहणार नाहीत, असे ढमाले यांनी सांगितले.