शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

तुळशी विवाहाच्या माध्यमातून नेत्रदानाचा दिला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 00:51 IST

ठाण्यातील जांभळीनाका येथे बाळगोपाळ मित्र मंडळ, नारळवाला चाळ यांच्या वतीने नेत्रदानाचा संदेश देत तुळशीविवाह आयोजित करण्यात आला होता.

ठाणे : ठाण्यातील जांभळीनाका येथे बाळगोपाळ मित्र मंडळ, नारळवाला चाळ यांच्या वतीने नेत्रदानाचा संदेश देत तुळशीविवाह आयोजित करण्यात आला होता. यामध्ये दृष्टिहीन मुलांनी सहभाग घेतला होता. या तुळशीविवाहाच्या माध्यमातून एकाच दिवसात सुमारे १२६ नेत्रदानाचे अर्ज भरण्यात आले.ज्याच्याजवळ ज्या गरजेच्या गोष्टीची उणीव असते, त्या व्यक्तीला वस्तूचे महत्त्व विशेषत्वाने कळते, असा एक सिद्धान्त आहे. या सिद्धान्तावरूनच म्हटले जाते, की एका सेकंदाचे महत्त्व किती आहे, हे सेकंदाच्या फरकाने स्पर्धा हरलेल्या व्यक्तीला विचारा. तसेच दृष्टीचे महत्त्व किती आहे, याची जाणीव तुम्ही एखाद्या प्रज्ञाचक्षू बांधवाच्या दृष्टीने दुनिया समजून घ्यायचा प्रयत्न कराल तेव्हाच जास्त प्रकर्षाने होईल. यासाठी नेत्रदान केले तर आपण एखाद्याला दृष्टी देऊन शक्ती देण्यासाठी नेत्रदान करा, असा संदेश देण्यासाठी अवयवदान चळवळीचे प्रणेते विलास ढमाले यांच्या बाळगोपाळ मित्र मंडळाच्या वतीने तुळशीविवाह आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. संजय केळकर, जिव्हाळा महिला मंडळाच्या अध्यक्ष मंजिरी ढमाले, राहुल नवघणे, शाखाप्रमुख सचिन चव्हाण, शशिकांत गुरव, दीपक मानकामे, अमित टण्णू, अनिल हुसफर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यंदा या तुळशीविवाहाचे ७९ वे वर्ष असल्याने नेत्रदानाचा संदेश देण्यात आला.नेत्रदानाचा संकल्प सोडण्याअगोदर या विषयाची गरज आणि आपल्याला त्यात देता येऊ शकणारे योगदान या मुद्यांविषयी समाजाच्या तळागाळात संदेश पोहोचला, तरीही मोठ्या प्रमाणावर अंधत्व निवारणासाठी चालना मिळू शकते, तसेच मृत्यूनंतर नेत्रदान करणे सरकारने बंधनकारक केले, तर देशात कोणीच दृष्टिहीन राहणार नाहीत, असे ढमाले यांनी सांगितले.