शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
4
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
5
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
8
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
9
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
10
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
12
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
13
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
14
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
15
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
16
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
17
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
18
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
19
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

भारतात मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक रुग्णांत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 19:59 IST

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार भारतात दर पाच महिलांमागे एक महिला तर दर १२ पुरुषांमागे एक पुरुष मानसिक आजाराला बळी पडतोय. याचे मुख्य कारण म्हणजे मोबाईल फोन व त्याद्वारे सोशल मीडियाचा अतिवापर  असल्याची माहिती मीरारोड येथील मनोविकार तज्ञ डॉ. सोनल आनंद यांनी दिली आहे. 

- राजू काळे  

भार्इंदर - जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार भारतात दर पाच महिलांमागे एक महिला तर दर १२ पुरुषांमागे एक पुरुष मानसिक आजाराला बळी पडतोय. याचे मुख्य कारण म्हणजे मोबाईल फोन व त्याद्वारे सोशल मीडियाचा अतिवापर  असल्याची माहिती मीरारोड येथील मनोविकार तज्ञ डॉ. सोनल आनंद यांनी दिली आहे. 

मानसिक आजाराच्या बाबतीत महिलांचे प्रमाण चिंताजनक असुन मुंबई, दिल्ली, पुणे या शहरांतील तरुण पिढी २४  तासांपैकी ४ ते ५ पाच तास मोबाईलचा वापर करतात. मोबाईलचा वापर करताना त्यांचा मुख्य जगाशी संबंध तुटतो व ते एका आभासी जगामध्ये प्रवेश करतात. या आभासी जगामध्ये सर्वकाही आलबेल चालू असते व अचानक या आभासी जगामध्ये  माणसाच्या भावना अथवा अहंगार दुखावला गेल्यास ते मनोरुग्ण ठरण्याची दाट शक्यता असते. मोबाईलमुळे गेल्या १० वर्षांमध्ये कुटुंबातील माणसांचा एकमेकांशी संवाद तुटला आहे. लोकांना मोबाईलद्वारे सोशल मीडियाचे व्यसन जडले आहे. वयाच्या दहाव्या वर्षीच मुले मी कसा दिसतो अथवा मी कशी दिसते यावर सोशल मीडियात २ ते ३ हजार लोकांकडून अभिप्राय मागवितात. या अभिप्रायावर त्या मुलाचा अथवा त्या मुलीचा मूड  टिकून राहतो. जर या कोवळ्या वयातील सोशल मीडियाच्या वापरावर पालकांनी निर्बंध घातला नाही अथवा त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवले नाही तर त्या मुलांचे मानसिक रुग्णामध्ये रूपांतर होण्यास वेळ लागत नाही. एखाद्या व्यक्तीस मानसिक आजार झाला आहे, ही ओळखण्याची काही लक्षणे म्हणजे व्यक्तीची झोप बिघडणे, भूक कमी होणे, चिडचिड वाढणे, एकाकीपणा, दैनंदिन कामकाजात टाळाटाळ किंवा चूका करणे, वजन खूप कमी होणे किंवा वाढणे, खूप भिती वाटणे, आत्मविश्वास कमी होणे, जीव घाबरणे, कामाची इच्छा कमी होणे, आत्महत्येची धमकी देणे किंवा प्रयत्न करणे, मनात आत्महत्येचा विचार येणे इत्यादी होय. बालकांतील मनोविकारामध्ये प्रामुख्याने वर्तणूकीतील दोष किंवा विकृती, नैराश्य, अनामिक भिती इत्यादी लक्षणे दिसून येतात. हल्ली तीन  वर्षाच्या मुलाच्या हातातही आपण हौसेने मोबाईल देतो. मात्र त्याचा त्याच्या कोवळ्या डोळ्यावर आणि मेंदूवर काय परिणाम होतो, याची कल्पना आपल्याला नसते. कार्यालयांत संगणकाचा वापर अनिवार्य असला तरी सोशल मिडियाद्वारे व्हाट्सॅप, फेसबुक यावर तरुणांचा किती वेळ वाया जातो याची जाणीव त्यांना करून देणे महत्वाचे ठरु लागले आहे. ब्रिटिश जर्नल आॅफ सायकिएॅट्रीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरात दरवर्षी  ५० लाख लोकं मन:स्थितीतील बिघाड आणि चिंताग्रस्त  झाल्याने मृत्युमूखी पडतात. सध्या जगभरात ४५ कोटींपेक्षाही जास्त लोक मनोरुग्ण ठरले आहेत. तर पाच कोटी भारतीय अशा मानसिक आजारासोबत लढा देत आहेत. २०२२ पर्यंत जगात ‘नैराश्य’ हा दुसरा सर्वात मोठा आजार ठरण्याची शक्यता असुन मुंबई महापालिकेने  नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातुन ७३ लाख नागरिकांमध्ये ३१ टक्के मानसिक रुग्ण म्हणजेच २२ लाखाहून अधिक लोकं मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे स्पष्ट केल्याचे डॉ. सोनल यांनी सांगितले. त्यामुळे सोशल मिडीयाचा अतिवापर टाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

टॅग्स :MobileमोबाइलIndiaभारतHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स