शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

ठाण्यातील वाचक कट्ट्यावर रंगल्या 'पत्रसंवादु' च्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 16:29 IST

ठाण्यातील वाचक कट्ट्यावर  'पत्रसंवादु' च्या आठवणी रामदास खरे यांनी उलगडल्या. 

ठळक मुद्देवाचक कट्ट्यावर रंगल्या 'पत्रसंवादु' च्या आठवणी पत्र स्वरूपात लाभलेला हा त्यांचा जणू महाप्रसाद आहे : रामदास खरे ठाण्यातील साहित्यिकांची उपस्थिती वाचक कट्ट्याची उद्देशपूर्ती करीत आहे : किरण नाकती

ठाणे : हस्ताक्षर पत्रांच्या माध्यमातून मी अनेक लेखक, कवी, समीक्षक, संगीतकरांशी, त्यांनी साकारलेल्या अनेक कलाकृतींशी, पुस्तकांशी आणि सुरांशी नकळत जोडला गेलो. २०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या 'कॅलिडोस्कोप' आणि दोन महिन्यापूर्वी प्रकाशित झालेल्या 'पत्रसंवादु' या दोन्ही पुस्तकास वाचक-रसिकांचा उदंड असा प्रतिसाद लाभला. अनेक वृत्तपत्रांनी, संस्थांनी या पुस्तकाची दखल घेतली यामध्ये माझे कोणतेही कर्तृत्व नसून पुस्तकात साकारलेल्या अनेक प्रतिभावंतांची, लेखक, कवींची ही पुण्याई आहे. पत्र स्वरूपात लाभलेला हा त्यांचा जणू महाप्रसाद आहे असे मत कवी, लेखक, चित्रकार रामदास खरे यांनी वाचक कट्ट्यावर व्यक्त केले. 

 कवी, लेखक, चित्रकार रामदास खरे यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'पत्रसंवादु' या पुस्तकाच्या निमित्ताने ठाण्याच्या वाचक कट्ट्यावर गप्पांचा, कविता वाचन, अभिवाचनाचा अभिनव कार्यक्रम आयोजित केला होता. लेखिका, ग्रंथप्रेमी यामिनी पानगावकर यांनी रामदास खरे यांच्याशी सुसंवाद साधला आणि त्यांना बोलते केले. रामदास खरे यांनी पत्रसंस्कृतीबद्दलची आपली भूमिका मांडून काही प्रतिभावंतांच्या खुमासदार, दुर्मिळ आठवणी कट्ट्यावर जागवल्या. या आठवणींच्या प्रवासात रामदास खरे यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, दुर्गाबाई भागवत, म. पां. भावे, जगदीश खेबुडकर, गो. नी. दांडेकर, सुहास शिरवळकर, स्नेहलता दसनूरकर, विद्याधर करंदीकर, डॉ. आनंद यादव, बाळ राणे, अरविंद ताटके, शिरीष पै, या लेखक कवींच्या बरोबरच संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, पं. यशवंत देव, श्रीनिवास खळे, दत्ता डावजेकर यांच्या आठवणी जागवल्या, काही किस्से सांगितले. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला, बहरत गेला. रामदास खरे यांनी आपल्या स्वतःच्या काही कविता देखील पेश केल्या. कार्यक्रमास अनेक मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. ज्येष्ठ समीक्षक डॉ.अनंत देशमुख, दिघे, कवी विकास भावे, कवी प्रकाश पोळ, तसेच अभिनय कट्ट्याचे अनेक कलाकार सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमास तरुणांची उपस्थिती ही सुखावून गेली. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या 'सर्वात्मका सर्वेश्वरा' या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. तरुणाईला वाचनाची गोडी निर्माण व्हावी व वाचन संस्कृती जिवंत रहावी याकरिताच वाचक कट्ट्याची निर्मिती करण्यात आली व ठाण्यातील साहित्यिकांची उपस्थिती वाचक कट्ट्याची उद्देशपूर्ती करीत आहे असे मत वाचक कट्ट्याचे प्रमुख किरण नाकती यांनी व्यक्त केले. वाचक कट्ट्याचे सूत्रसंचालन राजन मयेकर यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई