शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

ठाण्यातील वाचक कट्ट्यावर रंगल्या 'पत्रसंवादु' च्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 16:29 IST

ठाण्यातील वाचक कट्ट्यावर  'पत्रसंवादु' च्या आठवणी रामदास खरे यांनी उलगडल्या. 

ठळक मुद्देवाचक कट्ट्यावर रंगल्या 'पत्रसंवादु' च्या आठवणी पत्र स्वरूपात लाभलेला हा त्यांचा जणू महाप्रसाद आहे : रामदास खरे ठाण्यातील साहित्यिकांची उपस्थिती वाचक कट्ट्याची उद्देशपूर्ती करीत आहे : किरण नाकती

ठाणे : हस्ताक्षर पत्रांच्या माध्यमातून मी अनेक लेखक, कवी, समीक्षक, संगीतकरांशी, त्यांनी साकारलेल्या अनेक कलाकृतींशी, पुस्तकांशी आणि सुरांशी नकळत जोडला गेलो. २०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या 'कॅलिडोस्कोप' आणि दोन महिन्यापूर्वी प्रकाशित झालेल्या 'पत्रसंवादु' या दोन्ही पुस्तकास वाचक-रसिकांचा उदंड असा प्रतिसाद लाभला. अनेक वृत्तपत्रांनी, संस्थांनी या पुस्तकाची दखल घेतली यामध्ये माझे कोणतेही कर्तृत्व नसून पुस्तकात साकारलेल्या अनेक प्रतिभावंतांची, लेखक, कवींची ही पुण्याई आहे. पत्र स्वरूपात लाभलेला हा त्यांचा जणू महाप्रसाद आहे असे मत कवी, लेखक, चित्रकार रामदास खरे यांनी वाचक कट्ट्यावर व्यक्त केले. 

 कवी, लेखक, चित्रकार रामदास खरे यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'पत्रसंवादु' या पुस्तकाच्या निमित्ताने ठाण्याच्या वाचक कट्ट्यावर गप्पांचा, कविता वाचन, अभिवाचनाचा अभिनव कार्यक्रम आयोजित केला होता. लेखिका, ग्रंथप्रेमी यामिनी पानगावकर यांनी रामदास खरे यांच्याशी सुसंवाद साधला आणि त्यांना बोलते केले. रामदास खरे यांनी पत्रसंस्कृतीबद्दलची आपली भूमिका मांडून काही प्रतिभावंतांच्या खुमासदार, दुर्मिळ आठवणी कट्ट्यावर जागवल्या. या आठवणींच्या प्रवासात रामदास खरे यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, दुर्गाबाई भागवत, म. पां. भावे, जगदीश खेबुडकर, गो. नी. दांडेकर, सुहास शिरवळकर, स्नेहलता दसनूरकर, विद्याधर करंदीकर, डॉ. आनंद यादव, बाळ राणे, अरविंद ताटके, शिरीष पै, या लेखक कवींच्या बरोबरच संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, पं. यशवंत देव, श्रीनिवास खळे, दत्ता डावजेकर यांच्या आठवणी जागवल्या, काही किस्से सांगितले. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला, बहरत गेला. रामदास खरे यांनी आपल्या स्वतःच्या काही कविता देखील पेश केल्या. कार्यक्रमास अनेक मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. ज्येष्ठ समीक्षक डॉ.अनंत देशमुख, दिघे, कवी विकास भावे, कवी प्रकाश पोळ, तसेच अभिनय कट्ट्याचे अनेक कलाकार सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमास तरुणांची उपस्थिती ही सुखावून गेली. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या 'सर्वात्मका सर्वेश्वरा' या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. तरुणाईला वाचनाची गोडी निर्माण व्हावी व वाचन संस्कृती जिवंत रहावी याकरिताच वाचक कट्ट्याची निर्मिती करण्यात आली व ठाण्यातील साहित्यिकांची उपस्थिती वाचक कट्ट्याची उद्देशपूर्ती करीत आहे असे मत वाचक कट्ट्याचे प्रमुख किरण नाकती यांनी व्यक्त केले. वाचक कट्ट्याचे सूत्रसंचालन राजन मयेकर यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई