शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अंबरनाथ-बदलापुरात पुन्हा एक सदस्य प्रभागपद्धती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 22:52 IST

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.

बदलापूर / अंबरनाथ : महिनाभरापासून अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकांमधील निवडणुकीच्या प्रभागरचनेवरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. आता राज्य शासनाने नगर परिषदांमध्ये पुन्हा बहुसदस्यीय प्रभागपद्धती (पॅनल) रद्द करून एक सदस्य प्रभागपद्धती अवलंबली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाला शहरातील प्रभागरचना आणि आरक्षणाबाबत नव्याने आदेश काढावे लागणार आहेत.

महापालिकेतील पॅनलपद्धती रद्द झाल्यावर बदलापूर आणि अंबरनाथची प्रभागपद्धतीही रद्द होण्याची अपेक्षा होती. निवडणूक आयोगाने बहुसदस्यीय प्रभागपद्धतीनुसार प्रभागरचना करण्याचे आदेश दिले होते.

त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. निवडणूक आयोगाने जुन्याच पद्धतीनुसार म्हणजे बहुसदस्य प्रभागरचना अमलात आणून त्यानुसार प्रभाग पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, १७ जानेवारीला कामही सुरू होणार होते. आता राज्य शासनाने पुन्हा निवडणूक प्रक्रियेत बदल केला आहे. पूर्वीची बहुसदस्यीय प्रभागरचना रद्द करून एकसदस्यीय प्रभागरचना अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

आता दोन वॉर्डांचा एक पॅनल न करता एकाच वॉर्डाचा एक पॅनल तयार होणार आहे. याआधी २०१५ मध्ये ज्या पद्धतीने प्रभाग पाडले आणि निवडणुका झाल्या, त्याच पद्धतीने पुन्हा निवडणूक होणार आहे. २०१५ च्या निवडणुकीच्या नियमानुसारच या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता राजकीय पक्षांमध्ये असलेला गोंधळ काही प्रमाणात कमी झाला आहे. आता अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील राजकीय पुढाऱ्यांना वेध लागले आहेत, ते आरक्षण सोडतीचे. त्यासंदर्भात निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथbadlapurबदलापूर