शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

अंबरनाथ-बदलापुरात पुन्हा एक सदस्य प्रभागपद्धती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 22:52 IST

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.

बदलापूर / अंबरनाथ : महिनाभरापासून अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकांमधील निवडणुकीच्या प्रभागरचनेवरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. आता राज्य शासनाने नगर परिषदांमध्ये पुन्हा बहुसदस्यीय प्रभागपद्धती (पॅनल) रद्द करून एक सदस्य प्रभागपद्धती अवलंबली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाला शहरातील प्रभागरचना आणि आरक्षणाबाबत नव्याने आदेश काढावे लागणार आहेत.

महापालिकेतील पॅनलपद्धती रद्द झाल्यावर बदलापूर आणि अंबरनाथची प्रभागपद्धतीही रद्द होण्याची अपेक्षा होती. निवडणूक आयोगाने बहुसदस्यीय प्रभागपद्धतीनुसार प्रभागरचना करण्याचे आदेश दिले होते.

त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. निवडणूक आयोगाने जुन्याच पद्धतीनुसार म्हणजे बहुसदस्य प्रभागरचना अमलात आणून त्यानुसार प्रभाग पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, १७ जानेवारीला कामही सुरू होणार होते. आता राज्य शासनाने पुन्हा निवडणूक प्रक्रियेत बदल केला आहे. पूर्वीची बहुसदस्यीय प्रभागरचना रद्द करून एकसदस्यीय प्रभागरचना अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

आता दोन वॉर्डांचा एक पॅनल न करता एकाच वॉर्डाचा एक पॅनल तयार होणार आहे. याआधी २०१५ मध्ये ज्या पद्धतीने प्रभाग पाडले आणि निवडणुका झाल्या, त्याच पद्धतीने पुन्हा निवडणूक होणार आहे. २०१५ च्या निवडणुकीच्या नियमानुसारच या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता राजकीय पक्षांमध्ये असलेला गोंधळ काही प्रमाणात कमी झाला आहे. आता अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील राजकीय पुढाऱ्यांना वेध लागले आहेत, ते आरक्षण सोडतीचे. त्यासंदर्भात निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथbadlapurबदलापूर