शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

अंबरनाथ-बदलापुरात पुन्हा एक सदस्य प्रभागपद्धती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 22:52 IST

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.

बदलापूर / अंबरनाथ : महिनाभरापासून अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकांमधील निवडणुकीच्या प्रभागरचनेवरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. आता राज्य शासनाने नगर परिषदांमध्ये पुन्हा बहुसदस्यीय प्रभागपद्धती (पॅनल) रद्द करून एक सदस्य प्रभागपद्धती अवलंबली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाला शहरातील प्रभागरचना आणि आरक्षणाबाबत नव्याने आदेश काढावे लागणार आहेत.

महापालिकेतील पॅनलपद्धती रद्द झाल्यावर बदलापूर आणि अंबरनाथची प्रभागपद्धतीही रद्द होण्याची अपेक्षा होती. निवडणूक आयोगाने बहुसदस्यीय प्रभागपद्धतीनुसार प्रभागरचना करण्याचे आदेश दिले होते.

त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. निवडणूक आयोगाने जुन्याच पद्धतीनुसार म्हणजे बहुसदस्य प्रभागरचना अमलात आणून त्यानुसार प्रभाग पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, १७ जानेवारीला कामही सुरू होणार होते. आता राज्य शासनाने पुन्हा निवडणूक प्रक्रियेत बदल केला आहे. पूर्वीची बहुसदस्यीय प्रभागरचना रद्द करून एकसदस्यीय प्रभागरचना अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

आता दोन वॉर्डांचा एक पॅनल न करता एकाच वॉर्डाचा एक पॅनल तयार होणार आहे. याआधी २०१५ मध्ये ज्या पद्धतीने प्रभाग पाडले आणि निवडणुका झाल्या, त्याच पद्धतीने पुन्हा निवडणूक होणार आहे. २०१५ च्या निवडणुकीच्या नियमानुसारच या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता राजकीय पक्षांमध्ये असलेला गोंधळ काही प्रमाणात कमी झाला आहे. आता अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील राजकीय पुढाऱ्यांना वेध लागले आहेत, ते आरक्षण सोडतीचे. त्यासंदर्भात निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथbadlapurबदलापूर