शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

मीरा-भार्इंदरमध्ये आॅटोरिक्षांची बेकायदा २५ टक्के भाडेवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 03:10 IST

मीरा-भार्इंदरमध्ये रिक्षाचालकांनी दोन दिवसांपूर्वी परस्पर भाडेवाढ करून प्रवाशांची लूट सुरू केली आहे. ही भाडेवाढ तब्बल २५ टक्के इतकी आहे.

भार्इंदर : मीरा-भार्इंदरमध्ये रिक्षाचालकांनी दोन दिवसांपूर्वी परस्पर भाडेवाढ करून प्रवाशांची लूट सुरू केली आहे. ही भाडेवाढ तब्बल २५ टक्के इतकी आहे. इंधन दरवाढीमुळेच भाडेवाढ केल्याचे रिक्षाचालकांकडून सांगण्यात येत आहे. शहरात तीन हजारांहून अधिक रिक्षा आहेत. लांब अंतरावर जाणाऱ्या प्रवाशांकडून मीटरऐवजी अव्वाच्यासव्वा भाडे रिक्षाचालकांकडून बेकायदा वसूल केले जात आहे. हा प्रकार चार वर्षापूर्वी सुरू होता. त्याविरोधात अनेक तक्रारी प्रादेशिक परिवहन विभागाकडे केल्यानंतर शहरातील रिक्षांना मीटर बसविणे सक्तीचे केले. त्यालाही येथील रिक्षा चालकांनी केराची टोपली दाखवत मीटरऐवजी शेअर भाडे सुरूच ठेवले. त्यावेळी पाच रूपये किमान भाडे वसूल केले जात होते. त्यानंतर २७ डिसेंबर २०१४ मध्ये रिक्षाचालकांनी परस्पर २५ टक्के भाडेवाढ करत सात रूपये किमान भाडे निश्चित केले. काही महिन्यानंतर पुन्हा त्यात एक रूपयाची वाढ केली. त्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाची कोणतीही परवानगी घेतली नाही.

दोन दिवसांपासून पुन्हा त्यात सुमारे २५ टक्के परस्पर वाढ करून किमान भाडे आठ रुपयांवरुन १० रूपये केले. या परस्पर भाडेवाढीबाबत रिक्षाचालकांनी काही संघटनांच्या पदाधिकाºयांनाही विश्वासात घेतले नसल्याची बाब समोर आली आहे.मीटरऐवजी शेअर भाडे वसूल करत किमान एका रिक्षात तीनपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जातात. त्यावर स्थानिक वाहतूक कर्मचारी व पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याने येथील रिक्षाचालकांचा मनमानी कारभार सुरू आहे.रिक्षा भाडेवाढीबाबत आपल्याला कोणतीही माहिती दिलेली नाही. भाडेवाढ प्रादेशिक परिवहन विभागाच्या परवानगीनेच लागू करावी, यावर आम्ही ठाम असून परस्पर भाडेवाढ झाली असल्यास ती बेकायदा आहे.- देवेंद्र शेलेकर, अध्यक्ष, मीरा-भार्इंदर रिपाइं (अ) रिक्षा चालक-मालक संघटनाकाही वर्षांपूर्वी प्रादेशिक परिवहन विभागाने मीरा-भार्इंदर शहरातील काही मार्गांसाठी शेअर भाडे वसुलीला मान्यता देऊन त्याचे दर निश्चित केले होते. यंदाच्या भाडेवाढीबाबत मात्र कोणतीही माहिती नाही.- नंदकिशोर नाईकउपप्रादेशिक परिवहन अधिकारीबहुतांश रिक्षा सीएनजीवर चालविल्या जातात. त्यांचे दर वाढल्याने नाइलाजास्तव भाडेवाढ करावी लागली.- रामदास ईरवणे रिक्षाचालकसामान्य प्रवाशांसाठी करण्यात आलेली २५ टक्के भाडेवाढ अन्यायकारक असून ती रद्द करावी.- शालिनी अडसुळेप्रवासी

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाMira Bhayanderमीरा-भाईंदर