शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मीरा-भार्इंदरमध्ये आॅटोरिक्षांची बेकायदा २५ टक्के भाडेवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 03:10 IST

मीरा-भार्इंदरमध्ये रिक्षाचालकांनी दोन दिवसांपूर्वी परस्पर भाडेवाढ करून प्रवाशांची लूट सुरू केली आहे. ही भाडेवाढ तब्बल २५ टक्के इतकी आहे.

भार्इंदर : मीरा-भार्इंदरमध्ये रिक्षाचालकांनी दोन दिवसांपूर्वी परस्पर भाडेवाढ करून प्रवाशांची लूट सुरू केली आहे. ही भाडेवाढ तब्बल २५ टक्के इतकी आहे. इंधन दरवाढीमुळेच भाडेवाढ केल्याचे रिक्षाचालकांकडून सांगण्यात येत आहे. शहरात तीन हजारांहून अधिक रिक्षा आहेत. लांब अंतरावर जाणाऱ्या प्रवाशांकडून मीटरऐवजी अव्वाच्यासव्वा भाडे रिक्षाचालकांकडून बेकायदा वसूल केले जात आहे. हा प्रकार चार वर्षापूर्वी सुरू होता. त्याविरोधात अनेक तक्रारी प्रादेशिक परिवहन विभागाकडे केल्यानंतर शहरातील रिक्षांना मीटर बसविणे सक्तीचे केले. त्यालाही येथील रिक्षा चालकांनी केराची टोपली दाखवत मीटरऐवजी शेअर भाडे सुरूच ठेवले. त्यावेळी पाच रूपये किमान भाडे वसूल केले जात होते. त्यानंतर २७ डिसेंबर २०१४ मध्ये रिक्षाचालकांनी परस्पर २५ टक्के भाडेवाढ करत सात रूपये किमान भाडे निश्चित केले. काही महिन्यानंतर पुन्हा त्यात एक रूपयाची वाढ केली. त्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाची कोणतीही परवानगी घेतली नाही.

दोन दिवसांपासून पुन्हा त्यात सुमारे २५ टक्के परस्पर वाढ करून किमान भाडे आठ रुपयांवरुन १० रूपये केले. या परस्पर भाडेवाढीबाबत रिक्षाचालकांनी काही संघटनांच्या पदाधिकाºयांनाही विश्वासात घेतले नसल्याची बाब समोर आली आहे.मीटरऐवजी शेअर भाडे वसूल करत किमान एका रिक्षात तीनपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जातात. त्यावर स्थानिक वाहतूक कर्मचारी व पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याने येथील रिक्षाचालकांचा मनमानी कारभार सुरू आहे.रिक्षा भाडेवाढीबाबत आपल्याला कोणतीही माहिती दिलेली नाही. भाडेवाढ प्रादेशिक परिवहन विभागाच्या परवानगीनेच लागू करावी, यावर आम्ही ठाम असून परस्पर भाडेवाढ झाली असल्यास ती बेकायदा आहे.- देवेंद्र शेलेकर, अध्यक्ष, मीरा-भार्इंदर रिपाइं (अ) रिक्षा चालक-मालक संघटनाकाही वर्षांपूर्वी प्रादेशिक परिवहन विभागाने मीरा-भार्इंदर शहरातील काही मार्गांसाठी शेअर भाडे वसुलीला मान्यता देऊन त्याचे दर निश्चित केले होते. यंदाच्या भाडेवाढीबाबत मात्र कोणतीही माहिती नाही.- नंदकिशोर नाईकउपप्रादेशिक परिवहन अधिकारीबहुतांश रिक्षा सीएनजीवर चालविल्या जातात. त्यांचे दर वाढल्याने नाइलाजास्तव भाडेवाढ करावी लागली.- रामदास ईरवणे रिक्षाचालकसामान्य प्रवाशांसाठी करण्यात आलेली २५ टक्के भाडेवाढ अन्यायकारक असून ती रद्द करावी.- शालिनी अडसुळेप्रवासी

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाMira Bhayanderमीरा-भाईंदर