शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
5
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
6
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
7
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
8
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
9
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
10
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
11
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
12
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
13
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
14
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
15
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
16
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
17
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
18
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
19
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
20
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान

‘नीट’च्या परीक्षार्थ्यांना मेगाब्लॉक, कोंडीचा फटका

By admin | Updated: May 8, 2017 06:05 IST

ठिकठिकाणची वाहतूककोंडी, मेगाब्लॉकचा फटका रविवारी ठाण्यातील नीट परीक्षेच्या केंद्रांवरील परीक्षार्थ्यांना बसला. त्यातील काहींना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठिकठिकाणची वाहतूककोंडी, मेगाब्लॉकचा फटका रविवारी ठाण्यातील नीट परीक्षेच्या केंद्रांवरील परीक्षार्थ्यांना बसला. त्यातील काहींना केंद्रांवर पोहोचण्यास दोन ते तीन मिनिटे उशीर झाल्यामुळे त्यांना केंद्र व्यवस्थापकांनी परीक्षेला बसू दिले नाही. नंतर, याप्रकरणी आमदार, स्थानिक नगरसेवकांनी तेथे पोहोचून परीक्षा केंद्र व्यवस्थापकांशी चर्चा केली. पण, आम्हाला वरिष्ठांकडून आदेश आल्यास त्यांच्या पुनर्परीक्षेचा विचार करू, असे त्यांनी सांगितले. मात्र, परीक्षार्थ्यांची तूर्त निराशा झाली. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय सामायिक पात्रता परीक्षा (नीट) रविवारी ठिकठिकाणी घेण्यात आली. सावरकरनगर येथील ज्ञानोदय विद्यामंदिरही या परीक्षेचे केंद्र होते. या केंद्रावर जिल्ह्यातील मुरबाड, माळशेज घाट परिसर, कल्याण, भिवंडी तसेच पनवेल या भागांतून विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते. मेगाब्लॉकमुळे, कोणाला शहरातील कोंडीमुळे; तर कोणाला केंद्राचा पत्ता शोधून परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास उशीर झाला. त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास केंद्र व्यवस्थापकांनी नकार दिला. याबाबतीत परीक्षा केंद्र व्यवस्थापकांशी संवाद साधण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांनी धक्काबुक्की करून बाहेर काढल्याचे आरोप करण्यात आले. या घटनेमुळे काही काळ परीक्षा केंद्रांवर तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक पूर्वेश सरनाईक, कांचन चिंदरकर आदींनी तेथे भेट दिली. त्यांनी केंद्र व्यवस्थापकांशी याबाबत चर्चा केली. मात्र, या नियमानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. मुंबईतही काही केंद्रांवर विविध कारणांमुळे परीक्षार्थ्यांना नीटच्या परीक्षेस मुकावे लागले. रविवारी ही परीक्षा न देऊ शकलेल्यांबाबत आमच्या वरिष्ठ मंडळाने पुनर्परीक्षेचा काही निर्णय घेतल्यास त्यांना परीक्षा देता येईल, असे केंद्र व्यवस्थापकांनी स्पष्ट केल्याचे युवासेनेने सांगितले.मेगाब्लॉकमुळे, कोणाला शहरातील वाहतूक कोंडीमुळे; तर कोणाला केंद्राचा पत्ता शोधून परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास उशीर झाला. त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास केंद्र व्यवस्थापकांनी नकार दिला. याबाबतीत परीक्षा केंद्र व्यवस्थापकांशी संवाद साधण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना धक्काबुक्की करून बाहेर काढल्याचे आरोप करण्यात आले.