शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’च्या परीक्षार्थ्यांना मेगाब्लॉक, कोंडीचा फटका

By admin | Updated: May 8, 2017 06:05 IST

ठिकठिकाणची वाहतूककोंडी, मेगाब्लॉकचा फटका रविवारी ठाण्यातील नीट परीक्षेच्या केंद्रांवरील परीक्षार्थ्यांना बसला. त्यातील काहींना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठिकठिकाणची वाहतूककोंडी, मेगाब्लॉकचा फटका रविवारी ठाण्यातील नीट परीक्षेच्या केंद्रांवरील परीक्षार्थ्यांना बसला. त्यातील काहींना केंद्रांवर पोहोचण्यास दोन ते तीन मिनिटे उशीर झाल्यामुळे त्यांना केंद्र व्यवस्थापकांनी परीक्षेला बसू दिले नाही. नंतर, याप्रकरणी आमदार, स्थानिक नगरसेवकांनी तेथे पोहोचून परीक्षा केंद्र व्यवस्थापकांशी चर्चा केली. पण, आम्हाला वरिष्ठांकडून आदेश आल्यास त्यांच्या पुनर्परीक्षेचा विचार करू, असे त्यांनी सांगितले. मात्र, परीक्षार्थ्यांची तूर्त निराशा झाली. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय सामायिक पात्रता परीक्षा (नीट) रविवारी ठिकठिकाणी घेण्यात आली. सावरकरनगर येथील ज्ञानोदय विद्यामंदिरही या परीक्षेचे केंद्र होते. या केंद्रावर जिल्ह्यातील मुरबाड, माळशेज घाट परिसर, कल्याण, भिवंडी तसेच पनवेल या भागांतून विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते. मेगाब्लॉकमुळे, कोणाला शहरातील कोंडीमुळे; तर कोणाला केंद्राचा पत्ता शोधून परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास उशीर झाला. त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास केंद्र व्यवस्थापकांनी नकार दिला. याबाबतीत परीक्षा केंद्र व्यवस्थापकांशी संवाद साधण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांनी धक्काबुक्की करून बाहेर काढल्याचे आरोप करण्यात आले. या घटनेमुळे काही काळ परीक्षा केंद्रांवर तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक पूर्वेश सरनाईक, कांचन चिंदरकर आदींनी तेथे भेट दिली. त्यांनी केंद्र व्यवस्थापकांशी याबाबत चर्चा केली. मात्र, या नियमानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. मुंबईतही काही केंद्रांवर विविध कारणांमुळे परीक्षार्थ्यांना नीटच्या परीक्षेस मुकावे लागले. रविवारी ही परीक्षा न देऊ शकलेल्यांबाबत आमच्या वरिष्ठ मंडळाने पुनर्परीक्षेचा काही निर्णय घेतल्यास त्यांना परीक्षा देता येईल, असे केंद्र व्यवस्थापकांनी स्पष्ट केल्याचे युवासेनेने सांगितले.मेगाब्लॉकमुळे, कोणाला शहरातील वाहतूक कोंडीमुळे; तर कोणाला केंद्राचा पत्ता शोधून परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास उशीर झाला. त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास केंद्र व्यवस्थापकांनी नकार दिला. याबाबतीत परीक्षा केंद्र व्यवस्थापकांशी संवाद साधण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना धक्काबुक्की करून बाहेर काढल्याचे आरोप करण्यात आले.