शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

महापारेषणने बोलावलेली बैठक ठरली निष्फळ, मनोरे उभारणार, शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 00:16 IST

Palghar : वाडा, वसई व पालघर या तालुक्यातील गावे यामध्ये बाधित होणार आहेत. त्यासाठी ३० मीटर जागा संपादित करण्यात आली आहे.

वाडा : तालुक्यातील डाकिवली परिसरातून उच्च दाबाची विद्युतवाहिनी जात असून या वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम महापारेषणने हाती घेतले आहे. मात्र या वाहिनीमुळे अनेक शेतकरी देशोधडीला लागणार असून त्याचे नुकसान होणार आहे. त्यामुळे वाहिनीस तीव्र विरोध दर्शवला असून जागा न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केल्याने मंगळवारी डाकिवली ग्रामपंचायत कार्यालयात महापारेषणने बोलावलेली बैठक निष्फळ ठरली.२२० के.व्ही. तारापूर-बोरीवली आणि बोईसर घोडबंदर लीलो कुडूस अशी उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात आहे. वाडा, वसई व पालघर या तालुक्यातील गावे यामध्ये बाधित होणार आहेत. त्यासाठी ३० मीटर जागा संपादित करण्यात आली आहे. मात्र हे करताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेता किंवा पूर्वकल्पना न देता या वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातच सन २०१६ साली बनवलेल्या नकाशाप्रमाणे हे काम न करता महापारेषणने मनमानी कारभार करत आपल्या मर्जीप्रमाणे काम सुरू केले आहे. यात डाकिवली गावातील अनेक शेतकरी बाधित झाले असून येथील बहुतांशी शेतकरी अल्पभूधारक असल्याने त्यांच्या लागवडी क्षेत्रातून जात असल्याने बाधित शेतकऱ्यांचे लागवडी क्षेत्र संपुष्टात येणार आहे. या मार्गाने वाहिनी गेल्यास बहुतांशी शेतकरी यामधून वगळले जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र महापारेषणला हे मान्य नसल्याने शेतकऱ्यांनी आमच्या जागेतून वाहिनी नेऊ नका, अशा स्षप्ट शब्दांत नकार दर्शविला. 

वाहिनी वनजमिनीतून न्या ज्या जमिनीतून ही वाहिनी जात आहे, ती जमीन मातीमोल होणार असल्याने शेतकरी प्रचंड संतापले आहेत.  महापारेषणने गावात असलेल्या दगडखाणी व लागवडी क्षेत्र वगळून यामधून वाहिनी न नेता लोहोपे गावापासून पुढे वनविभागाच्या जागेतून ही वाहिनी न्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

टॅग्स :palgharपालघर