शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

मीरा रोड रेल्वेस्थानकास फेरीवाल्यांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:16 IST

पालिकेकडून कारवाईबाबत टाळाटाळ

भाईंदर : मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेस्थानकापासून दीडशे मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केली असताना मीरा रोड रेल्वेस्थानक व परिसरास फेरीवाल्यांचा विळखा कायम असल्याने प्रवासी त्रासले आहेत. तर, महापालिकेकडून या बेकायदा फेरीवाल्यांना पाठीशी घातले जात आहे. दरम्यान, फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे, मात्र तोही करत नसल्याचे दिसून येत आहे.एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर उच्च न्यायालयाने रेल्वेस्थानकापासून दीडशे मीटरपर्यंतच्या अंतरावर फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केली आहे. तसे असताना महापालिकेकडून सर्रास न्यायालयाच्या आदेशाचे धिंडवडे काढले जात आहेत. गर्दीचे स्थानक असलेल्या मीरा रोडबाहेर व परिसरात सर्रास फेरीवाल्यांच्या हातगाड्या, बाकडे, टपऱ्या लागत असताना पालिका कारवाईच करत नाही. यामुळे मीरा रोड रेल्वेस्थानक परिसर व मुख्य रस्त्यावर सर्रास फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे रेल्वेस्थानकात जाताना तसेच बाहेर आल्यावर खूपच त्रास सहन करावा लागतो. प्रवाशांना त्यातही महिला, वृद्ध, तरुणींना मार्ग काढताना वाईट अनुभवांना सामोरे जावे लागत आहे. फेरीवाल्यांची दादागिरी चालत असल्याने नागरिकही बोलायला घाबरतात. फेरीवाल्यांवर ठोस कारवाई करून प्रवाशांना येण्याजाण्याचे मार्ग मोकळे ठेवण्याची मागणी शिवसेना, मनसेने केली होती. काही दिवस पालिकेने कारवाई केली. पण, पुन्हा फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. काही लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याने नियमित ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.याप्रकरणी महापालिकेचे प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. तर, फेरीवाले हटवण्यासाठी नियुक्त कंत्राटदाराच्या कारवाईची पाहणी करण्यासाठी नियुक्त कर्मचारी महादेव बंदीछोडे यांच्याशी संपर्क साधला असता फेरीवाल्यांवर कारवाईची जबाबदारी कंत्राटदाराची असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :hawkersफेरीवालेmira roadमीरा रोड