शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पहिल्याच पावसात मीरा-भार्इंदर जलमय

By admin | Updated: June 26, 2017 01:27 IST

मीरा-भार्इंदर शहरातील बहुतांश भाग पहिल्याच मुसळधार पावसामुळे जलमय झाला. या भागातील नागरिकांना दिलासा देण्यासह समस्या जाणून घेण्यासाठी महापौर गीता

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : मीरा-भार्इंदर शहरातील बहुतांश भाग पहिल्याच मुसळधार पावसामुळे जलमय झाला. या भागातील नागरिकांना दिलासा देण्यासह समस्या जाणून घेण्यासाठी महापौर गीता जैन व आयुक्त डॉ. नरेश गीते, शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांच्यासह पालिकेचे इतर अधिकारी व नगरसेवक रस्त्यावर उतरले होते. झाडे व भिंत कोसळण्यासह शॉर्टसर्कीटच्या घटना घडल्या. दोन वाहनांचे नुकसान झाले. शहरातील बहुतांश भागात पूर्वी योग्य नियोजनाअभावी बांधण्यात आलेल्या इमारती रस्त्याच्या भरावामुळे खाली गेल्याने तेथे पाणी तुंबते. यंदा नालेसफाईही उशिराने सुरू झाल्याने ती वेळेत पूर्ण झाली नाही. तसेच सफाई योग्य न झाल्यानेच सखल भाग जलमय झाल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. या भागात साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी पालिकेने सक्शन पंप बसवून त्याद्वारे गटारे व नाल्यांत पाणी सोडले जात होते. तसेच अनेक इमारतीच्या आवारातही पाणी शिरल्याने तळमजल्यावरील घरांत पाणी आले. जलमय भागांची महापौर, आयुक्तांसह पालिकेचे अधिकारी, नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, कॅटलिन परेरा, डॉ. दिनेश जैन यांनी पाहणी केली. भार्इंदर पूर्वेकडील खारीगाव, तलावरोड व पश्चिमेकडील गीतानगरमध्ये झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यापैकी दोन ठिकाणी झाडे वाहनांवर पडल्याने त्यांचे नुकसान झाले. तसेच मॅक्सस मॉल रोडवर असलेल्या जोशी रूग्णालयाच्या भिंतीचा काही भाग जवळच्या आदित्य अपार्टमेंटमध्ये कोसळला. पूर्वेकडील जेसलपार्क परिसरात असलेल्या जनता सोसायटी इमारतीत पाणी साचल्याने तेथील मीटरबॉक्सला पाण्याचा स्पर्श होऊन शॉर्टसर्कीट झाल्याचा घटना घडली. शहर जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला.