शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

गुरुवारी निश्चित होणार ठाण्याचा महापौर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 01:09 IST

ठाण्याची महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होणार असली, तरी ते मिळविण्यासाठी शिवसेनेतील अनेक नगरसेवकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.

ठाणे : राज्यात उदयास येत असलेल्या नव्या राजकीय पॅटर्नमुळे ठाण्याची महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होणार असली, तरी ते मिळविण्यासाठी शिवसेनेतील अनेक नगरसेवकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. मात्र, दुसरीकडे उपमहापौरपदासाठी काहींना गळ घालूनही ते यासाठी तयार होत नसल्याचे समोर आले आहे. शोभेचे पद काय कामाचे, असा सवाल या मंडळींकडून केला जात असल्याने महापौरनिवडीपेक्षाही आता उपमहापौरपदाचा तिढा वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शनिवारी, उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी महापौर आणि उपमहापौरपदासाठी कोण अर्ज भरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. २१ नोव्हेंबरला ठाण्याचा महापौर निश्चित होणार आहे.राज्यातील बहुतांश महापालिकांच्या महापौरांची आरक्षण सोडत बुधवारी काढण्यात आली. त्यानंतर, आता ठाणे महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक २१ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. यासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यानुसार, महापौरपदासाठी शिवसेनेतील काही ज्येष्ठ मंडळींमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. पक्षश्रेष्ठींनी सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या नावाला पसंती दिली असली, तरी ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी महापौरपदाचे आश्वासन मिळाल्यानेच आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले आहे. विद्यमान महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही पुन्हा महापौर होण्याची आशा व्यक्त केली आहे. त्यात आता राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नवीन सत्तासमीकरण तयार होऊ घातल्याने त्याच धर्तीवर ठाणे महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक पार पडेल, असे चित्र आहे. राष्टÑवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल होणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच आपसूकपणे मिळणाऱ्या या पदासाठी अनेकांनी दावे केले आहेत.महापौरपदासाठी एकीकडे चुरस असताना दुसरीकडे उपमहापौरपदासाठी शिवसेनेचा एकही नगरसेवक पुढे येताना दिसत नाही. उपमहापौरपदासाठी निष्ठावान शिवसैनिक म्हणून सुधीर कोकाटे यांच्या नावाला पसंती दिली जात आहे. तर, कळव्यातून उमेश पाटील यांचेही नाव पुढे आले आहे. परंतु, शोभेचे पद कशासाठी, असा सवाल करत दोघांनीही काढता पाय घेतला आहे. उलट, या पदावर महिलेला संधी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. उपमहापौरपदासाठी अनेकांनी नकारघंटा वाजविल्याने आता महापौरपदापेक्षा उपमहापौरपदासाठी श्रेष्ठी कोणावर जबरदस्ती करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील नव्या राजकीय पॅटर्नमुळे राष्टÑवादी उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याचे चित्र सध्या आहे. भाजपनेसुद्धा या निवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपचे संख्याबळ अवघे २३ असल्याने त्यांनी यातून काढता पाय घेतला आहे. एकूणच आता ही निवडणूक बिनविरोध होणार असली, तरी शिवसेनेतील श्रेष्ठी महापौर पदासाठी कोणावर विश्वास टाकतात, हे पाहणेही महत्त्वाचे आहे.>..तर भाजपही उतरणार रिंगणातशिवसेना-काँगे्रस अन् राष्ट्रवादीच्या मनोमिलनाचे दर्शन ठाणे महापालिकेत झाले असले, तरी आता आपले अस्तित्व टिकविण्यासाठी राष्टÑवादी काँग्रेसकडून महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज भरले जाणार असल्याचे राष्टÑवादीच्या सूत्रांनी स्पष्ट केले. तर, मुंबई महापालिकेत भाजपच्या भूमिकेवर ठाण्यातील भाजपची भूमिका स्पष्ट होणार आहे. मुंबईत अर्ज भरला तर भाजपसुद्धा शनिवारी ठाण्यात दोन्ही पदांसाठी अर्ज भरेल, असे सांगितले जात आहे.