शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वरसावे पुलाच्या दुरुस्तीला उद्याचा मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 01:18 IST

मुंबई, ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वरसावे खाडीपूल दुरु स्तीचा मुहूर्त विविध कारणांमुळे अजून यंत्रणांना सापडलेला नाही.

मीरा रोड : मुंबई, ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वरसावे खाडीपूल दुरुस्तीचा मुहूर्त विविध कारणांमुळे अजून यंत्रणांना सापडलेला नाही. अवजड वाहनांना रोखण्यासाठी तीन नाक्यांवर तयार केलेले ओव्हरहेड गेटरिंग सदोष असल्याने त्यात सुधारणा करण्याच्या सूचनेमुळे दुरु स्तीच्या मुहूर्ताचा नारळ सोमवारी फुटण्याची माहिती सूत्रांनी दिली.वसई खाडीवरील मुंबई-ठाण्याच्या दिशेने येणारा नवीन पूलदुरुस्तीसाठी २६ नोव्हेंबरपासून एक महिन्यापर्यंत अवजड वाहनांसाठी बंद करण्याची अधिसूचना पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी जाहीर केली होती. शिवाय, पुलावर लहान वाहनांसाठी एकच मार्गिका सुरू ठेवून दुसºया मार्गिकेच्या ठिकाणी दुरुस्ती करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वास्तविक, या पुलाच्या जॉइंट प्लेट नादुरु स्त झाल्या असून त्यावर कामचलाऊ म्हणून डांबराचा थर टाकून भार वाढवल्याने पुलाची दुरु स्ती अत्यावश्यक बनली आहे.महामार्ग प्राधिकरण अनेक महिन्यांपासून या दुरुस्तीसाठी पालघर व ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तगादा लावत असले, तरी विविध कारणांनी दुरु स्तीसाठी चालढकल केली गेली. पण, दुरु स्तीसाठी चाललेली टोलवाटोलवी गंभीर असल्याने अखेर २६ नोव्हेंबरपासून अवजड वाहनांसाठी पूल बंद करणे व एका मार्गिकेतून लहान वाहने सुरू ठेवणे तसेच मोठी वाहने चिंचोटी, शिरसाड व मनोरनाक्यावरून भिवंडीमार्गे ठाणे-मुंबईकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला.महत्त्वाचा व प्रचंड वाहतूक असलेला पूल बंद होणार म्हणून वाहतूक व स्थानिक पोलिसांनी आपापल्या भागात वाहतुकीचे नियोजन व व्यवस्थेची तयारी चालवली. दुरु स्तीसाठी साहित्य व यंत्रणा यांची जमवाजमव झाली. त्यासाठी सुरुवातीचे दिवस वाया गेले. दुसरीकडे पोलिसांना ट्रॅफिक वॉर्डन मिळत नसल्याची बाब समोर आली.आता चिंचोटी, शिरसाड व मनोरनाक्यावर अवजड वाहनांना रोखण्यासाठी बनवलेले ओव्हरहेड गेटरिंग सदोष असल्याने महामार्ग पोलिसांनी त्यास आक्षेप घेतला. गेटरिंग असल्याचे चालकास अर्धा किलोमीटर लांबून दिसेल, असे त्यावर दिवे लावण्याची सूचना यात महत्त्वाची होती.>मुंंब्रा बायपास जड-अवजड वाहनांसाठी आज बंदमुंब्रा बायपासमार्गे ठाणे शहरात येणाºया जड-अवजड वाहनांसाठी २ डिसेंबर रोजी प्रवेश बंद केला असल्याचे पोलीस उपायुक्त वाहतूक सुनील लोखंडे यांनी सांगितले. कल्याण येथे शुक्रवारपासून सुरू असलेला आगरी कोळी महोत्सव तसेच २ डिसेंबर रोजी या महोत्सवाच्या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक २ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत कळंबोली, महापे येथून ऐरोलीमार्गे वळवण्यात आली आहे.>शनिवार, रविवारअधिक वाहतूकपोलिसांनी सुचवल्यानुसार गेटरिंग बनवण्यास घेण्यात आले आहे. त्यातच, शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी वाहतूक जास्त असल्याने सोमवारपासून पूलदुरु स्तीचा मुहूर्त निश्चित करण्यात आल्याचे पोलीस व महामार्ग प्राधिकरणातील सूत्रांनी सांगितले.