शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

वरसावे पुलाच्या दुरुस्तीला उद्याचा मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 01:18 IST

मुंबई, ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वरसावे खाडीपूल दुरु स्तीचा मुहूर्त विविध कारणांमुळे अजून यंत्रणांना सापडलेला नाही.

मीरा रोड : मुंबई, ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वरसावे खाडीपूल दुरुस्तीचा मुहूर्त विविध कारणांमुळे अजून यंत्रणांना सापडलेला नाही. अवजड वाहनांना रोखण्यासाठी तीन नाक्यांवर तयार केलेले ओव्हरहेड गेटरिंग सदोष असल्याने त्यात सुधारणा करण्याच्या सूचनेमुळे दुरु स्तीच्या मुहूर्ताचा नारळ सोमवारी फुटण्याची माहिती सूत्रांनी दिली.वसई खाडीवरील मुंबई-ठाण्याच्या दिशेने येणारा नवीन पूलदुरुस्तीसाठी २६ नोव्हेंबरपासून एक महिन्यापर्यंत अवजड वाहनांसाठी बंद करण्याची अधिसूचना पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी जाहीर केली होती. शिवाय, पुलावर लहान वाहनांसाठी एकच मार्गिका सुरू ठेवून दुसºया मार्गिकेच्या ठिकाणी दुरुस्ती करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वास्तविक, या पुलाच्या जॉइंट प्लेट नादुरु स्त झाल्या असून त्यावर कामचलाऊ म्हणून डांबराचा थर टाकून भार वाढवल्याने पुलाची दुरु स्ती अत्यावश्यक बनली आहे.महामार्ग प्राधिकरण अनेक महिन्यांपासून या दुरुस्तीसाठी पालघर व ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तगादा लावत असले, तरी विविध कारणांनी दुरु स्तीसाठी चालढकल केली गेली. पण, दुरु स्तीसाठी चाललेली टोलवाटोलवी गंभीर असल्याने अखेर २६ नोव्हेंबरपासून अवजड वाहनांसाठी पूल बंद करणे व एका मार्गिकेतून लहान वाहने सुरू ठेवणे तसेच मोठी वाहने चिंचोटी, शिरसाड व मनोरनाक्यावरून भिवंडीमार्गे ठाणे-मुंबईकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला.महत्त्वाचा व प्रचंड वाहतूक असलेला पूल बंद होणार म्हणून वाहतूक व स्थानिक पोलिसांनी आपापल्या भागात वाहतुकीचे नियोजन व व्यवस्थेची तयारी चालवली. दुरु स्तीसाठी साहित्य व यंत्रणा यांची जमवाजमव झाली. त्यासाठी सुरुवातीचे दिवस वाया गेले. दुसरीकडे पोलिसांना ट्रॅफिक वॉर्डन मिळत नसल्याची बाब समोर आली.आता चिंचोटी, शिरसाड व मनोरनाक्यावर अवजड वाहनांना रोखण्यासाठी बनवलेले ओव्हरहेड गेटरिंग सदोष असल्याने महामार्ग पोलिसांनी त्यास आक्षेप घेतला. गेटरिंग असल्याचे चालकास अर्धा किलोमीटर लांबून दिसेल, असे त्यावर दिवे लावण्याची सूचना यात महत्त्वाची होती.>मुंंब्रा बायपास जड-अवजड वाहनांसाठी आज बंदमुंब्रा बायपासमार्गे ठाणे शहरात येणाºया जड-अवजड वाहनांसाठी २ डिसेंबर रोजी प्रवेश बंद केला असल्याचे पोलीस उपायुक्त वाहतूक सुनील लोखंडे यांनी सांगितले. कल्याण येथे शुक्रवारपासून सुरू असलेला आगरी कोळी महोत्सव तसेच २ डिसेंबर रोजी या महोत्सवाच्या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक २ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत कळंबोली, महापे येथून ऐरोलीमार्गे वळवण्यात आली आहे.>शनिवार, रविवारअधिक वाहतूकपोलिसांनी सुचवल्यानुसार गेटरिंग बनवण्यास घेण्यात आले आहे. त्यातच, शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी वाहतूक जास्त असल्याने सोमवारपासून पूलदुरु स्तीचा मुहूर्त निश्चित करण्यात आल्याचे पोलीस व महामार्ग प्राधिकरणातील सूत्रांनी सांगितले.