शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

वरसावे पुलाच्या दुरुस्तीला उद्याचा मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 01:18 IST

मुंबई, ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वरसावे खाडीपूल दुरु स्तीचा मुहूर्त विविध कारणांमुळे अजून यंत्रणांना सापडलेला नाही.

मीरा रोड : मुंबई, ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वरसावे खाडीपूल दुरुस्तीचा मुहूर्त विविध कारणांमुळे अजून यंत्रणांना सापडलेला नाही. अवजड वाहनांना रोखण्यासाठी तीन नाक्यांवर तयार केलेले ओव्हरहेड गेटरिंग सदोष असल्याने त्यात सुधारणा करण्याच्या सूचनेमुळे दुरु स्तीच्या मुहूर्ताचा नारळ सोमवारी फुटण्याची माहिती सूत्रांनी दिली.वसई खाडीवरील मुंबई-ठाण्याच्या दिशेने येणारा नवीन पूलदुरुस्तीसाठी २६ नोव्हेंबरपासून एक महिन्यापर्यंत अवजड वाहनांसाठी बंद करण्याची अधिसूचना पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी जाहीर केली होती. शिवाय, पुलावर लहान वाहनांसाठी एकच मार्गिका सुरू ठेवून दुसºया मार्गिकेच्या ठिकाणी दुरुस्ती करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वास्तविक, या पुलाच्या जॉइंट प्लेट नादुरु स्त झाल्या असून त्यावर कामचलाऊ म्हणून डांबराचा थर टाकून भार वाढवल्याने पुलाची दुरु स्ती अत्यावश्यक बनली आहे.महामार्ग प्राधिकरण अनेक महिन्यांपासून या दुरुस्तीसाठी पालघर व ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तगादा लावत असले, तरी विविध कारणांनी दुरु स्तीसाठी चालढकल केली गेली. पण, दुरु स्तीसाठी चाललेली टोलवाटोलवी गंभीर असल्याने अखेर २६ नोव्हेंबरपासून अवजड वाहनांसाठी पूल बंद करणे व एका मार्गिकेतून लहान वाहने सुरू ठेवणे तसेच मोठी वाहने चिंचोटी, शिरसाड व मनोरनाक्यावरून भिवंडीमार्गे ठाणे-मुंबईकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला.महत्त्वाचा व प्रचंड वाहतूक असलेला पूल बंद होणार म्हणून वाहतूक व स्थानिक पोलिसांनी आपापल्या भागात वाहतुकीचे नियोजन व व्यवस्थेची तयारी चालवली. दुरु स्तीसाठी साहित्य व यंत्रणा यांची जमवाजमव झाली. त्यासाठी सुरुवातीचे दिवस वाया गेले. दुसरीकडे पोलिसांना ट्रॅफिक वॉर्डन मिळत नसल्याची बाब समोर आली.आता चिंचोटी, शिरसाड व मनोरनाक्यावर अवजड वाहनांना रोखण्यासाठी बनवलेले ओव्हरहेड गेटरिंग सदोष असल्याने महामार्ग पोलिसांनी त्यास आक्षेप घेतला. गेटरिंग असल्याचे चालकास अर्धा किलोमीटर लांबून दिसेल, असे त्यावर दिवे लावण्याची सूचना यात महत्त्वाची होती.>मुंंब्रा बायपास जड-अवजड वाहनांसाठी आज बंदमुंब्रा बायपासमार्गे ठाणे शहरात येणाºया जड-अवजड वाहनांसाठी २ डिसेंबर रोजी प्रवेश बंद केला असल्याचे पोलीस उपायुक्त वाहतूक सुनील लोखंडे यांनी सांगितले. कल्याण येथे शुक्रवारपासून सुरू असलेला आगरी कोळी महोत्सव तसेच २ डिसेंबर रोजी या महोत्सवाच्या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक २ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत कळंबोली, महापे येथून ऐरोलीमार्गे वळवण्यात आली आहे.>शनिवार, रविवारअधिक वाहतूकपोलिसांनी सुचवल्यानुसार गेटरिंग बनवण्यास घेण्यात आले आहे. त्यातच, शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी वाहतूक जास्त असल्याने सोमवारपासून पूलदुरु स्तीचा मुहूर्त निश्चित करण्यात आल्याचे पोलीस व महामार्ग प्राधिकरणातील सूत्रांनी सांगितले.