शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

गणित विषयाला सहा महिन्यांपासून शिक्षकच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:25 IST

- वसंत पानसरे किन्हवली : शहापूर तालुक्यातील टाकीपठार येथे आदिवासी प्रकल्पस्तरीय समितीच्या माध्यमातून आश्रमशाळा चालवण्यात येते. पाचशेहून अधिक पटसंख्या ...

- वसंत पानसरे

किन्हवली : शहापूर तालुक्यातील टाकीपठार येथे आदिवासी प्रकल्पस्तरीय समितीच्या माध्यमातून आश्रमशाळा चालवण्यात येते. पाचशेहून अधिक पटसंख्या असलेल्या या आदिवासी आश्रमशाळेत शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित विषय शिकवायला शिक्षकच नाहीत.

आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी याकडे कानाडोळा केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. सहा महिन्यांत गणित विषय शिकवला नसूनही चाचणी परीक्षेत गणिताचा पेपर घेण्यात आला आणि आता पेपरतपासणीसाठी शिक्षकच नसल्याने निकाल राखून ठेवला आहे. काही दिवसांवर सहामाही परीक्षा जवळ आली असताना आदिवासी विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शैक्षणिक टप्प्यात दहावीचे वर्ष महत्त्वाचे मानले जाते. पण, या शाळेत अजून गणित विषय न शिकवल्याने पेपरमध्ये काय लिहायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. यामुळे पालकही चिंतेत आहेत. मात्र, आदिवासी विकास प्रकल्प, मुख्याध्यापक तसेच प्रशासनाला याची काही चिंता नसल्याचे चित्र दिसते. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असून शाळेचा टक्काही घसरणार असल्याने याची जबाबदारी कोण घेईल, असा प्रश्न पालकांना पडला आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक