शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

ठाणे : शहर अस्वच्छ करणा-यांवर २४५ सफाई मार्शलचा वॉच : उपविधीला अखेर शासनाची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:15 IST

शहर अस्वच्छ करणा-यांवर दंड आकारून चाप बसवण्यासाठी ठाणे महापालिकेने २०१२ मध्ये तयार केलेल्या उपविधीला अखेर शासनाने मंजुरी दिली असून तिच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आता २४५ सफाई मार्शलची नियुक्ती करणार आहे.

ठाणे : शहर अस्वच्छ करणा-यांवर दंड आकारून चाप बसवण्यासाठी ठाणे महापालिकेने २०१२ मध्ये तयार केलेल्या उपविधीला अखेर शासनाने मंजुरी दिली असून तिच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आता २४५ सफाई मार्शलची नियुक्ती करणार आहे. हे सफाई मार्शल शहर अस्वच्छ करू पाहणाºया नागरिकांकडून दंड वसूल करणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या २० नोव्हेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला आहे.शहर अस्वच्छ करणाºया व्यक्तींकडून वसूल करण्यात येणाºया दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली असली, तरी या नवीन दरवाढीला शासनाची मंजुरी मिळाली नव्हती. परंतु, आता त्याला मंजुरी मिळाल्याची माहिती महापालिकेने दिली. शहरात दररोज ७०० मेट्रीक टन कचरा निर्माण होत असून तो गोळा करण्यासाठी पालिकेजवळ १५० घंटागाड्या आहेत. पाच वर्षांपूर्वी शहरात ५०० पेक्षा अधिक कचरा टाकण्याची ठिकाणे होती. हे प्रमाण १५० वर आले असले, तरी उघड्यावर कचरा टाकणाºयांची संख्या मात्र कमी झालेली नाही. केवळ उघड्यावर कचरा टाकणे इथपर्यंत हे प्रमाण मर्यादित नसून रस्त्यांवर थुंकणे, स्नान करणे, इमारतीची मलवाहिनी अथवा जलवाहिनी फुटणे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या कचºयाचे विभक्तीकरण करणे, अशा अनेक गोष्टींचे पालन न केल्यास पालिकेकडून २००५ पासून दंड वसूल करण्यात येत आहे. त्यानंतर, २०१२ मध्ये तयार केलेल्या उपविधीमध्ये नवीन दर निश्चित केले आहेत. यामध्ये १० रु पयांपासून १०० रु पयांपर्यंत वाढ केली आहे. काही प्रकारांमध्ये तर ती दुप्पट आहे. त्यामुळे १०० रु पयांपासून २० हजार रु पयांपर्यंत दंडाची रक्कम निश्चित केली आहे.दुसरीकडे शहरात फेरीवाला धोरण राबवण्यासंदर्भात डॉ. महेश बेडेकर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तीमध्ये हॉकर्स झोन नसल्यामुळे फेरीवाल्यांमुळे शहर अस्वच्छ होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. कचरापेटी असतानादेखील रस्त्यांवर नागरिक कचरा टाकत आहेत. तो रस्त्यांवर होऊ नये, यासाठी अर्बन वेस्ट डिस्पोजल पॉलिसी राबवून शहर अस्वच्छ करणाºयांकडून दंड वसूल करावा, अशी मागणी बेडेकर यांनी या याचिकेमध्ये होती.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका