शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

राज्यभरातील १३ हजार ५०० आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मराठा क्रांतीचा मोर्चा मंत्रालयावर धडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 22:09 IST

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून ५८ मोर्चे काढून दोन ठोक मोर्चे काढले होते. आंदोलन काळात आंदोलकांवर दाखल झालेले ३०७ आणि ३५३ या कलमांसह सर्व गुन्हे मागे घ्यावेत, अशा प्रमुख मागण्यांसाठी मराठा क्रांतीचा मोर्चा सोमवारी पुन्हा मंत्रालयावर धडकणार असल्याची माहिती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीचीही मागणी आश्वासन देऊनही अधिकाऱ्यांची चालढकलमराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी दिली माहिती

ठाणे : मराठा आंदोलन काळात राज्यभरातील १३ हजार ५०० आंदोलकांवर दाखल केलेल्या गंभीर गुन्ह्यांसह सरसकट सर्वच गुन्हे मागे घ्यावेत, तसेच अन्य प्रलंबित मागण्यांवर सरकारने तोडगा न काढल्यामुळे २६ आॅगस्ट रोजी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मुंंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंत्रालय असा पुन्हा निर्वाणीचा मोर्चा काढण्याचा इशारा मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी रविवारी ठाण्यात दिला.मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून ५८ मोर्चे काढून दोन ठोक मोर्चे काढले होते. आंदोलन काळात आंदोलकांवर भादंवि ३०७ आणि ३५३ (सरकारी कामात अडथळा आणि सरकारी कर्मचाºयांवर हल्ला करणे) या कलमांसह सर्व गुन्हे मागे घ्यावेत. यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. तरीही, मंत्रालयीन अधिकाºयांमुळे हे गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. अशा सामान्य विभागाच्या अधिकाºयांवर निलंबनाच्या कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या योजना तसेच आरक्षणाचा मराठा समाजाला कुठेही फायदा झालेला नाही. उलट, २०१४ पासून या समाजातील युवक हा शिक्षण आणि नोकरीतून हद्दपार झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारसोबत आतापर्यंत अनेक वेळा बैठका झाल्या. परंतु, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. यातूनच मराठा तरुणांवर मोठा अन्याय झाला आहे. विद्यार्थी आणि शेतकºयांच्या न्याय्य हक्कांसाठी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा समाजाने आता थेट मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. आदेश असूनही शासन निर्णय घेत नाही. यातूनच सरकार आणि शासन मिळून समाजाची दिशाभूल करीत आहे, अशी भावना मराठा समाजामध्ये निर्माण झाली आहे. २०१४ पासून २०१९ पर्यंतच्या मराठा विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये तत्काळ नियुक्त्या द्याव्यात. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सारथी प्रशिक्षण संस्था मराठा समाजासाठीच सीमित करावी. ७२ हजार मेगाभरतीतील विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्त्या द्याव्यात. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला तातडीने अनुदानासहित कर्ज द्यावे. अन्यथा, हे महामंडळ बंद करावे. महाराष्टÑ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्त्या द्याव्यात. पीकविमा तातडीने शेतकºयांच्या खात्यामध्ये जमा करावा, आदी मागण्यांसाठी २६ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे. समन्वयक आणि विद्यार्थ्यांना या आंदोलनात अडवल्यास ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस सुनील नागणे, राजेंद्र निकम, सूर्यकांत पोळ, तेजेंद्र पोटे, दीपक म्हापदी, तानाजी नांगरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा