शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

राज्यभरातील १३ हजार ५०० आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मराठा क्रांतीचा मोर्चा मंत्रालयावर धडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 22:09 IST

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून ५८ मोर्चे काढून दोन ठोक मोर्चे काढले होते. आंदोलन काळात आंदोलकांवर दाखल झालेले ३०७ आणि ३५३ या कलमांसह सर्व गुन्हे मागे घ्यावेत, अशा प्रमुख मागण्यांसाठी मराठा क्रांतीचा मोर्चा सोमवारी पुन्हा मंत्रालयावर धडकणार असल्याची माहिती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीचीही मागणी आश्वासन देऊनही अधिकाऱ्यांची चालढकलमराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी दिली माहिती

ठाणे : मराठा आंदोलन काळात राज्यभरातील १३ हजार ५०० आंदोलकांवर दाखल केलेल्या गंभीर गुन्ह्यांसह सरसकट सर्वच गुन्हे मागे घ्यावेत, तसेच अन्य प्रलंबित मागण्यांवर सरकारने तोडगा न काढल्यामुळे २६ आॅगस्ट रोजी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मुंंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंत्रालय असा पुन्हा निर्वाणीचा मोर्चा काढण्याचा इशारा मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी रविवारी ठाण्यात दिला.मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून ५८ मोर्चे काढून दोन ठोक मोर्चे काढले होते. आंदोलन काळात आंदोलकांवर भादंवि ३०७ आणि ३५३ (सरकारी कामात अडथळा आणि सरकारी कर्मचाºयांवर हल्ला करणे) या कलमांसह सर्व गुन्हे मागे घ्यावेत. यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. तरीही, मंत्रालयीन अधिकाºयांमुळे हे गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. अशा सामान्य विभागाच्या अधिकाºयांवर निलंबनाच्या कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या योजना तसेच आरक्षणाचा मराठा समाजाला कुठेही फायदा झालेला नाही. उलट, २०१४ पासून या समाजातील युवक हा शिक्षण आणि नोकरीतून हद्दपार झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारसोबत आतापर्यंत अनेक वेळा बैठका झाल्या. परंतु, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. यातूनच मराठा तरुणांवर मोठा अन्याय झाला आहे. विद्यार्थी आणि शेतकºयांच्या न्याय्य हक्कांसाठी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा समाजाने आता थेट मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. आदेश असूनही शासन निर्णय घेत नाही. यातूनच सरकार आणि शासन मिळून समाजाची दिशाभूल करीत आहे, अशी भावना मराठा समाजामध्ये निर्माण झाली आहे. २०१४ पासून २०१९ पर्यंतच्या मराठा विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये तत्काळ नियुक्त्या द्याव्यात. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सारथी प्रशिक्षण संस्था मराठा समाजासाठीच सीमित करावी. ७२ हजार मेगाभरतीतील विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्त्या द्याव्यात. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला तातडीने अनुदानासहित कर्ज द्यावे. अन्यथा, हे महामंडळ बंद करावे. महाराष्टÑ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्त्या द्याव्यात. पीकविमा तातडीने शेतकºयांच्या खात्यामध्ये जमा करावा, आदी मागण्यांसाठी २६ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे. समन्वयक आणि विद्यार्थ्यांना या आंदोलनात अडवल्यास ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस सुनील नागणे, राजेंद्र निकम, सूर्यकांत पोळ, तेजेंद्र पोटे, दीपक म्हापदी, तानाजी नांगरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा