शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या भीतीने अनेक कामगार गेले गावाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : लॉकडाऊनच्या विरोधात व्यापाऱ्यांनी दंड थोपटले असून, थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : लॉकडाऊनच्या विरोधात व्यापाऱ्यांनी दंड थोपटले असून, थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे, तर दुसरीकडे उपासमारीच्या भीतीने हजारो कामगार गावाला गेले असून, अनेकांवर बेरोजगाराची टांगती तलवार आहे. लॉकडाऊन काळात कामगारांना पगार देण्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्याची प्रतिक्रिया यूटीए व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक छतलानी यांनी दिली.

उल्हासनगरमध्ये फर्निचर मार्केट, जपानी व गजानन कापड मार्केट, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल मार्केट, जिन्स मार्केट, गाऊन मार्केट, बॅग मार्केटबाबत देशात आकर्षण आहे. या प्रसिद्ध मार्केटमधील दुकाने व कारखान्यांमध्ये लाखो कामगार काम करतात. कामगारांमध्ये मराठी, उत्तर प्रदेश व बिहारी कामगारांचा मोठा भरणा आहे. दोन वर्षांपूर्वी प्रदूषणाच्या नावाखाली शेकडो जिन्स वॉश कारखान्यांवर राज्य प्रदूषण मंडळाने कारवाई करून कारखाने सील केल्यावर ५० हजारांपेक्षा जास्त कामगार बेकार होऊन त्यातील अर्धेअधिक कामगार स्थलांतरित झाले. जिन्स वॉश कारखान्यावर गंडांतर आल्यावर शेकडो व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय व कारखाने अंबरनाथ, बदलापूर, कल्याण ग्रामीण, भिवंडी आदी ठिकाणी स्थलांतरित केले.

गेल्यावर्षीप्रमाणे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनी विरोध केला. यूटीए व्यापारी संघटनेच्या अंतर्गत शहरातील ५० पेक्षा जास्त लहान-मोठ्या व्यापारी संघटना एकवटल्या आहेत. संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी थेट निवेदनाद्वारे मुख्यमंत्री ठाकरे व फडणवीस यांच्याकडे साकडे घालून लॉकडाऊनला विरोध केला. लॉकडाऊनमुळे कामगारांवरच नव्हे तर असंख्य व्यापाऱ्यांवरही उपासमारीचे दिवस येणार आहेत. शहरातील मार्केटमध्ये एक लाखापेक्षा जास्त कामगार काम करीत आहेत. त्यापैकी हजारो जणांनी लॉकडाऊनच्या भीतीने गावाला जाणेच पसंत केले. तर इतरांना व्यापारी व दुकानदारांनी वेतन देण्याचे आश्वासन दिल्याने कामगार थांबले आहेत. मात्र एका महिन्यापेक्षा जास्त लॉकडाऊन झाल्यास व्यापाऱ्यांसह कामगारांवर उपासमारीची शक्यता निर्माण झाल्याची प्रतिक्रिया व्यापारी संघटनेने दिली.

व्यापारी व कामगारांना पॅकेजची मागणी

शेतकऱ्यांप्रमाणे व्यापारी व कामगारांना लॉकडाऊनच्या काळात पॅकेज देण्याची मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे. पॅकेज दिले तर, व्यापारी व कामगारांमध्ये उडालेला असंतोष कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नाका कामगारांची संख्याही घटल्याचे चित्र दिसत आहे. बांधकाम व्यवसाय सुरू असला तरी घरात कामे काढण्यास नागरिक धजावत नसल्याने कामगार येत नसल्याचे सांगण्यात आले.