शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
4
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
5
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
6
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
7
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
8
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
9
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
10
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
11
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
12
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
13
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
14
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
15
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
16
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
17
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
18
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
19
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
20
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...

लॉकडाऊनच्या भीतीने अनेक कामगार गेले गावाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : लॉकडाऊनच्या विरोधात व्यापाऱ्यांनी दंड थोपटले असून, थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : लॉकडाऊनच्या विरोधात व्यापाऱ्यांनी दंड थोपटले असून, थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे, तर दुसरीकडे उपासमारीच्या भीतीने हजारो कामगार गावाला गेले असून, अनेकांवर बेरोजगाराची टांगती तलवार आहे. लॉकडाऊन काळात कामगारांना पगार देण्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्याची प्रतिक्रिया यूटीए व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक छतलानी यांनी दिली.

उल्हासनगरमध्ये फर्निचर मार्केट, जपानी व गजानन कापड मार्केट, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल मार्केट, जिन्स मार्केट, गाऊन मार्केट, बॅग मार्केटबाबत देशात आकर्षण आहे. या प्रसिद्ध मार्केटमधील दुकाने व कारखान्यांमध्ये लाखो कामगार काम करतात. कामगारांमध्ये मराठी, उत्तर प्रदेश व बिहारी कामगारांचा मोठा भरणा आहे. दोन वर्षांपूर्वी प्रदूषणाच्या नावाखाली शेकडो जिन्स वॉश कारखान्यांवर राज्य प्रदूषण मंडळाने कारवाई करून कारखाने सील केल्यावर ५० हजारांपेक्षा जास्त कामगार बेकार होऊन त्यातील अर्धेअधिक कामगार स्थलांतरित झाले. जिन्स वॉश कारखान्यावर गंडांतर आल्यावर शेकडो व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय व कारखाने अंबरनाथ, बदलापूर, कल्याण ग्रामीण, भिवंडी आदी ठिकाणी स्थलांतरित केले.

गेल्यावर्षीप्रमाणे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनी विरोध केला. यूटीए व्यापारी संघटनेच्या अंतर्गत शहरातील ५० पेक्षा जास्त लहान-मोठ्या व्यापारी संघटना एकवटल्या आहेत. संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी थेट निवेदनाद्वारे मुख्यमंत्री ठाकरे व फडणवीस यांच्याकडे साकडे घालून लॉकडाऊनला विरोध केला. लॉकडाऊनमुळे कामगारांवरच नव्हे तर असंख्य व्यापाऱ्यांवरही उपासमारीचे दिवस येणार आहेत. शहरातील मार्केटमध्ये एक लाखापेक्षा जास्त कामगार काम करीत आहेत. त्यापैकी हजारो जणांनी लॉकडाऊनच्या भीतीने गावाला जाणेच पसंत केले. तर इतरांना व्यापारी व दुकानदारांनी वेतन देण्याचे आश्वासन दिल्याने कामगार थांबले आहेत. मात्र एका महिन्यापेक्षा जास्त लॉकडाऊन झाल्यास व्यापाऱ्यांसह कामगारांवर उपासमारीची शक्यता निर्माण झाल्याची प्रतिक्रिया व्यापारी संघटनेने दिली.

व्यापारी व कामगारांना पॅकेजची मागणी

शेतकऱ्यांप्रमाणे व्यापारी व कामगारांना लॉकडाऊनच्या काळात पॅकेज देण्याची मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे. पॅकेज दिले तर, व्यापारी व कामगारांमध्ये उडालेला असंतोष कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नाका कामगारांची संख्याही घटल्याचे चित्र दिसत आहे. बांधकाम व्यवसाय सुरू असला तरी घरात कामे काढण्यास नागरिक धजावत नसल्याने कामगार येत नसल्याचे सांगण्यात आले.