शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

प्रवास करण्याआधीच मनसैनिकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:04 IST

पाच मिनिटे प्रवासाची मागणी फेटाळली : सर्वांची जामिनावर सुटका, जिल्ह्यात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : चाकरमान्यांसाठी रेल्वेसेवा सुरू व्हावी, यासाठी मनसेने सोमवारी सविनय कायदेभंग आंदोलन पुकारले होते. ठाणे रेल्वेस्थानकावर पोहोचताच पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतले. दरम्यान, पाच मिनिटे तरी प्रवास करू द्या, अशी विनंती ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली होती. ती पोलिसांनी फेटाळली. नंतर सर्र्वांची जामिनावर सुटका करण्यात आली.मनसैनिकांनी हे आंदोलन करू नये, यासाठी रविवारी पोलिसांनी त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. तरीही, सकाळी ८.३० वाजता मनसैनिक रेल्वेप्रवासासाठी ठाणे स्थानकावर पोहोचले. त्याआधीच मोठा पोलीस बंदोबस्त होता. पोलिसांनी हे आंदोलन करू नये, असे त्यांना बजावले.परंतु, जाधव यांनी पाच मिनिटे तरी प्रवास करू द्या, अशी विनंती पोलिसांना केली. त्यांनी ती विनंती नाकारून जाधव यांच्यासह रवींद्र मोरे, महेश कदम, आशीष डोके, पुष्कर विचारे, अरुण घोसाळकर, विशाल घाग, राजेंद्र कांबळे यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक करून नंतर सुटका केली.‘सरकार पडण्याच्या भीतीनेच लोक वेठीस’पोलिसांवर दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोप जाधव यांनी केला. बससेवा सुरू आहे तिथेही गर्दी असते, तिथे कोरोना पसरणार नाही का? रेल्वे सुरू झाल्यावरच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार का? सरकार घाबरले आहे. सरकारला पडण्याची भीती वाटत असल्यामुळे ते लोकांना वेठीस धरत असल्याचे जाधव पुढे म्हणाले.भार्इंदरमध्ये २१ मनसैनिकांवर गुन्हा दाखलमीरा रोड : लोकल सेवा नागरिकांसाठी सुरू करा या मागणीसाठी भार्इंदर रेल्वेस्थानकाबाहेर जमलेल्या मनसैनिकांना पोलिसांनी स्थानकात जाऊच दिले नाही. त्यांना नवघर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी मनसेच्या २१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे .मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग एकीकडे वेगाने वाढत असताना दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सामान्य नागरिकांसाठी सुरु करा अशी मागणी मनसेने केली. त्यासाठी मनसे कडून लोकल प्रवास करून सविनय कायदेभंग आंदोलन केले गेले. परंतु सोमवारी मीरा भार्इंदरमधील मनसेचे पदाधिकारी - कार्यकर्ते हे लोकलने प्रवास करण्यासाठी म्हणून भार्इंदर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर जमले असता नवघर पोलिस व रेल्वे पोलिसांनी मनसैनिकांना स्थानकात प्रवेशच करू दिला नाही. मनसैनिकांना ताब्यात घेऊन नवघर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.बंदोबस्त झुगारून यांनी केला प्रवासजाधव आणि इतर मनसैनिकांना पोलिसांनी अटक केली, तरी दुसरीकडे ठाणे शहर सचिव निलेश चव्हाण यांनी तिकीट काढून ठाणे ते मुलुंड असा प्रवास करून आंदोलन यशस्वी केले. यावेळी त्यांच्यासोबत प्रकाश हितापे, जनार्दन खरिवले, हमराज जोशी हे तीन कार्यकर्ते होते. आम्ही तिकीट काढून प्रवास केला. आम्हाला कोणी अडविले नाही. रेल्वेमध्ये गेल्यावर डबा भरलेला होता. कोणतेही सुरक्षित अंतर पाळले गेले नव्हते. रेल्वे ही चाकरमान्यांची गरज आहे, हे दिसून आले. आत असलेल्या सर्व लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला, असे चव्हाण म्हणाले.

टॅग्स :MNSमनसे