शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

प्रवास करण्याआधीच मनसैनिकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:04 IST

पाच मिनिटे प्रवासाची मागणी फेटाळली : सर्वांची जामिनावर सुटका, जिल्ह्यात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : चाकरमान्यांसाठी रेल्वेसेवा सुरू व्हावी, यासाठी मनसेने सोमवारी सविनय कायदेभंग आंदोलन पुकारले होते. ठाणे रेल्वेस्थानकावर पोहोचताच पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतले. दरम्यान, पाच मिनिटे तरी प्रवास करू द्या, अशी विनंती ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली होती. ती पोलिसांनी फेटाळली. नंतर सर्र्वांची जामिनावर सुटका करण्यात आली.मनसैनिकांनी हे आंदोलन करू नये, यासाठी रविवारी पोलिसांनी त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. तरीही, सकाळी ८.३० वाजता मनसैनिक रेल्वेप्रवासासाठी ठाणे स्थानकावर पोहोचले. त्याआधीच मोठा पोलीस बंदोबस्त होता. पोलिसांनी हे आंदोलन करू नये, असे त्यांना बजावले.परंतु, जाधव यांनी पाच मिनिटे तरी प्रवास करू द्या, अशी विनंती पोलिसांना केली. त्यांनी ती विनंती नाकारून जाधव यांच्यासह रवींद्र मोरे, महेश कदम, आशीष डोके, पुष्कर विचारे, अरुण घोसाळकर, विशाल घाग, राजेंद्र कांबळे यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक करून नंतर सुटका केली.‘सरकार पडण्याच्या भीतीनेच लोक वेठीस’पोलिसांवर दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोप जाधव यांनी केला. बससेवा सुरू आहे तिथेही गर्दी असते, तिथे कोरोना पसरणार नाही का? रेल्वे सुरू झाल्यावरच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार का? सरकार घाबरले आहे. सरकारला पडण्याची भीती वाटत असल्यामुळे ते लोकांना वेठीस धरत असल्याचे जाधव पुढे म्हणाले.भार्इंदरमध्ये २१ मनसैनिकांवर गुन्हा दाखलमीरा रोड : लोकल सेवा नागरिकांसाठी सुरू करा या मागणीसाठी भार्इंदर रेल्वेस्थानकाबाहेर जमलेल्या मनसैनिकांना पोलिसांनी स्थानकात जाऊच दिले नाही. त्यांना नवघर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी मनसेच्या २१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे .मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग एकीकडे वेगाने वाढत असताना दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सामान्य नागरिकांसाठी सुरु करा अशी मागणी मनसेने केली. त्यासाठी मनसे कडून लोकल प्रवास करून सविनय कायदेभंग आंदोलन केले गेले. परंतु सोमवारी मीरा भार्इंदरमधील मनसेचे पदाधिकारी - कार्यकर्ते हे लोकलने प्रवास करण्यासाठी म्हणून भार्इंदर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर जमले असता नवघर पोलिस व रेल्वे पोलिसांनी मनसैनिकांना स्थानकात प्रवेशच करू दिला नाही. मनसैनिकांना ताब्यात घेऊन नवघर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.बंदोबस्त झुगारून यांनी केला प्रवासजाधव आणि इतर मनसैनिकांना पोलिसांनी अटक केली, तरी दुसरीकडे ठाणे शहर सचिव निलेश चव्हाण यांनी तिकीट काढून ठाणे ते मुलुंड असा प्रवास करून आंदोलन यशस्वी केले. यावेळी त्यांच्यासोबत प्रकाश हितापे, जनार्दन खरिवले, हमराज जोशी हे तीन कार्यकर्ते होते. आम्ही तिकीट काढून प्रवास केला. आम्हाला कोणी अडविले नाही. रेल्वेमध्ये गेल्यावर डबा भरलेला होता. कोणतेही सुरक्षित अंतर पाळले गेले नव्हते. रेल्वे ही चाकरमान्यांची गरज आहे, हे दिसून आले. आत असलेल्या सर्व लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला, असे चव्हाण म्हणाले.

टॅग्स :MNSमनसे