शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

मानपाडा स्मशानभूमीवरून शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 02:12 IST

प्रशासन आणि शिवसेनेतील वादावर पडदा पडण्याची चिन्हे असताना शिवसेनेच्या दोन गटातील वाद चव्हाट्यावर आहेत. घोडबंदर भागातील मानपाडा येथील नियोजित स्मशानभूमीवरून शिवसेनेतील

ठाणे : प्रशासन आणि शिवसेनेतील वादावर पडदा पडण्याची चिन्हे असताना शिवसेनेच्या दोन गटातील वाद चव्हाट्यावर आहेत. घोडबंदर भागातील मानपाडा येथील नियोजित स्मशानभूमीवरून शिवसेनेतील दोन गटातील कलह वाढला आहे. आमदार प्रताप सरनाईक हे या स्मशानभूमीसाठी आग्रही झाल्याने शिवसेनेतील दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.ठाणे पालिकेने २० वर्षांपूर्वी तयार केलेल्या विकास आराखड्यात स्मशानभूमीसाठी जागेचे आरक्षण नाही. त्यामुळे नव्या ठाण्यात हा प्रश्न गहन बनला असून घोडबंदरच्या एका टोकावर राहणाऱ्या कुटुंबांना अंत्यविधीसाठी थेट ठाणे शहरातील जव्हार बाग अथवा वागळे इस्टेट भागात यावे लागत असल्याकडे सरनाईक यांनी लक्ष वेधले. टिकुजीनीवाडीतील निसर्ग उद्यानाच्या सुविधा भूखंडावर स्माशानभूमी उभारावी, अशी माझी मागणी होती. मात्र, कल्पतरू बिल्डरचा विरोध असल्याने हा प्रस्ताव पालिकेतील काही अधिकाºयांनी पूर्णत्त्वास न नेता मुल्लाबाग येथे नवे आरक्षण टाकले. निसर्ग उद्याानाच्या मागच्या बाजूस संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असून हा भाग एकप्रकारे एका कोपºयात आहे. असे असताना केवळ बिल्डरच्या हितासाठी तेथे स्मशानभूमी होऊ न देण्यासाठी कोणी किती प्रयत्न केले हे मला माहीत आहे. ही नावे मी उघड केल्यास ठाण्यात खळबळ उडेल, असा इशाराही सरनाईक यांनी दिला. वन विभागाच्या जागेतील रामबाग स्मशानभूमीसाठी वनमंत्र्यांसोबत बैठका झाल्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे रामबाग स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता करणे शक्य नसल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले. त्यानंतर महापालिकेकडे दुसºया ठिकाणी स्मशानभूमीची मागणी केली.यासाठी कोणतीही जागा निश्चित करण्याची मागणी होती. मात्र, विशिष्ठ ठराविक जागांसाठी माझा कधीच आग्रह नव्हता. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. परंतु, तरीदेखील दोस्ती आणि रेप्टाकॉसच्या जागा मी सुचिवल्याचे चित्र उभे करण्यात आले. त्याचप्रमाणे कॉसमॉस लाऊंजच्या परिसरात मंजूर केलेल्या स्मशानभूमीच्या बाबतीतही घडत आहे, असेही त्यांनी सांगितले. टिकुजीनीवाडी भागात स्मशानभूमीसाठी आग्रही होतो. मात्र, तेथील खेळाच्या मैदानावर ती करणे शक्य नसल्याने पालिकेने त्यास नकार दिला. त्यामुळे मानपाडा येथे निसर्ग उद्याानासाठी प्रस्तावित जागेवर ती उभारण्याची मागणी केली होती. परंतु, या जागेजवळ कल्पतरू विकासकाचा गृहप्रकल्प सुरू असल्याने त्याचा त्यास विरोध होता. त्यामुळेच पालिकेने ही जागा बदलून त्याऐवजी कॉसमॉस लाऊंज परिसरातील जागेची निवड करून तसा प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव मंजूरही झाला आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.