शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

भाईंदरमध्ये रक्षाबंधन निमित्त कांदळवन स्वच्छता मोहिम; राखी बांधून निसर्ग रक्षणाचा संकल्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 16:02 IST

कांदळवनला राखी बांधून कांदळवनचे संरक्षण करण्याचा संकल्प पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केला

मीरारोड - रक्षाबंधन निमित्त भाईंदर पूर्वेच्या आरएनपी पार्क खाडी किनारी कांदळवन मधील कचरा, डेब्रिस काढून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी कांदळवनला राखी बांधून कांदळवनचे संरक्षण करण्याचा संकल्प पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केला. 

आज रविवारी सकाळी आरएनपी पार्क खाडी किनारी कांदळवन परिसर स्वच्छ करण्याची मोहीम राबविण्यात आली. शासनाच्या कांदळवन विभागासह फॉर फ्युचर इंडिया, खेलो मिरा भाईंदर खेलो, मॅन्ग्रोव्ह फॉउंडेशन, चाईल्ड हेल्प फॉउंडेशन संस्था, भाईंदर पश्चिम येथील व्हिन्सेंट डी-पॉल हायस्कूलचे विद्यार्थी, महापालिकेचा आरोग्य विभाग तसेच स्थानिक रहिवासी स्वछता मोहिमेत सहभागी झाले होते. 

कांदळवन मध्ये बेकायदा टाकलेले मोठ्या प्रमाणातील प्लास्टिक, कचरा, जुने फर्निचर , डेब्रिस, जाळी आदी काढण्यात आले.  तसेच परिसरात नव्याने कचरा - डेब्रिस टाकले जाणार नाही या साठी उपाययोजना व कारवाईची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. कारण या परिसरात सातत्याने कांदळवन कचरा - डेब्रिस टाकून तसेच बेकायदा बांधकामे करून नष्ट केले जात आहे.

येथील कांदळवन मधील महापालिकेची व खाजगी लोकांची बेकायदा बांधकामे तोडण्याची मागणी करण्यात आली. यावेळी वन विभागाच्या वतीने कांदळवन चे महत्व, कायदेशीर बाबी आदी बाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी स्थानिक महिला - मुलींसह पर्यावरण प्रेमी नागरिकांनी कांदळवनास राखी बांधुन कांदळवनाचे रक्षण करण्याचा संकल्प केला. प्रामुख्याने महापालिका, पोलीस व नगरसेवकांनी कांदळवन क्षेत्रात डेब्रिस, कचरा, दगड मातीचा भराव तसेच बेकायदेशीर बांधकामे केली जाणार नाहीत याची जबाबदारी उचलली पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.