शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भाईंदरमध्ये रक्षाबंधन निमित्त कांदळवन स्वच्छता मोहिम; राखी बांधून निसर्ग रक्षणाचा संकल्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 16:02 IST

कांदळवनला राखी बांधून कांदळवनचे संरक्षण करण्याचा संकल्प पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केला

मीरारोड - रक्षाबंधन निमित्त भाईंदर पूर्वेच्या आरएनपी पार्क खाडी किनारी कांदळवन मधील कचरा, डेब्रिस काढून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी कांदळवनला राखी बांधून कांदळवनचे संरक्षण करण्याचा संकल्प पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केला. 

आज रविवारी सकाळी आरएनपी पार्क खाडी किनारी कांदळवन परिसर स्वच्छ करण्याची मोहीम राबविण्यात आली. शासनाच्या कांदळवन विभागासह फॉर फ्युचर इंडिया, खेलो मिरा भाईंदर खेलो, मॅन्ग्रोव्ह फॉउंडेशन, चाईल्ड हेल्प फॉउंडेशन संस्था, भाईंदर पश्चिम येथील व्हिन्सेंट डी-पॉल हायस्कूलचे विद्यार्थी, महापालिकेचा आरोग्य विभाग तसेच स्थानिक रहिवासी स्वछता मोहिमेत सहभागी झाले होते. 

कांदळवन मध्ये बेकायदा टाकलेले मोठ्या प्रमाणातील प्लास्टिक, कचरा, जुने फर्निचर , डेब्रिस, जाळी आदी काढण्यात आले.  तसेच परिसरात नव्याने कचरा - डेब्रिस टाकले जाणार नाही या साठी उपाययोजना व कारवाईची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. कारण या परिसरात सातत्याने कांदळवन कचरा - डेब्रिस टाकून तसेच बेकायदा बांधकामे करून नष्ट केले जात आहे.

येथील कांदळवन मधील महापालिकेची व खाजगी लोकांची बेकायदा बांधकामे तोडण्याची मागणी करण्यात आली. यावेळी वन विभागाच्या वतीने कांदळवन चे महत्व, कायदेशीर बाबी आदी बाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी स्थानिक महिला - मुलींसह पर्यावरण प्रेमी नागरिकांनी कांदळवनास राखी बांधुन कांदळवनाचे रक्षण करण्याचा संकल्प केला. प्रामुख्याने महापालिका, पोलीस व नगरसेवकांनी कांदळवन क्षेत्रात डेब्रिस, कचरा, दगड मातीचा भराव तसेच बेकायदेशीर बांधकामे केली जाणार नाहीत याची जबाबदारी उचलली पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.