शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

२ ते १४ मे दरम्यान ठाणे शहरात आंबा महोत्सव; यंदा आंब्याचे २० टक्केच उत्पादन, आ. केळकर यांची खंत

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: April 25, 2023 15:31 IST

यंदादेखील अवघे २० टक्के आंबा पीक आले आहे अशी खंत संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. संजय केळकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

ठाणे: कोकणात १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकतो. यंदा अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान तसेच अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे आंब्याचे उत्पादन घटले आहे. २०२० साली ३ लाख २१ हजार मेट्रिक टन, २०२१ मध्ये २ लाख ५६ हजार मेट्रीक टन, २०२२ मध्ये १ लाख २८ हजार मेट्रीक टन आंबा उत्पादन झाले आहे. यंदादेखील अवघे २० टक्के आंबा पीक आले आहे अशी खंत संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. संजय केळकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.दरवर्षी आंब्याचे उत्पादन घटत आहे त्यामुळे कोकणातील शेतकऱ्याला पाठबळ देण्यासाठी अशाप्रकारचे आंबा महोत्सव आयोजीत केला आहे. या महोत्सवात एकुण ४० स्टॉल्स असणार आहेत, यापैकी पाच स्टॉल महिला बचत गटाकरीता असतील असे आ. केळकर यांनी सांगितले. आंबा महोत्सव यावर्षी देखील ठाण्यामध्ये रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच, संस्कार प्रतिष्ठान व कोकण विकास प्रतिष्ठानच्यावतीने २ मे ते १४ मे या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० वाजे पर्यंत गावदेवी मैदान येछे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे यंदाचे हे १६ वे वर्ष आहे. या आंबा महोत्सवाच्या माध्यमातून कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांची थेट भेट होऊन लाखोंची उलाढाल होत असते.

यात शेतकऱ्यांना फायदा होतोच शिवाय, ग्राहकांनाही कोकणातील अस्सल हापूस आंबा योग्य दरात मिळतो. गावदेवी मैदानात आंबा महोत्सवात प्रत्यक्ष विक्री सोबतच ऑनलाईन विक्रीची सुविधाही उपलब्ध ठेवल्याचे आमदार संजय केळकर यानी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेला कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर,ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठामपा परिवहन सदस्य विकास पाटील, पु.ल.देशपांडे कला अकादमीचे सदस्य मकरंद मुळे, संतोष साळुंखे आदी उपस्थित होते.

टॅग्स :MangoआंबाthaneठाणेFarmerशेतकरी