शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

आगारांमधील कारभार हा रामभरोसे

By admin | Updated: July 18, 2016 03:20 IST

कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांकडे लक्ष देणारा सक्षम अधिकारी नसल्याने येथील कारभार हा रामभरोसे सुरू आहे

ठाणे- कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांकडे लक्ष देणारा सक्षम अधिकारी नसल्याने येथील कारभार हा रामभरोसे सुरू आहे. कार्यशाळा व्यवस्थापकाचे पद परिवहन सुरू झाल्यापासून भरलेच गेलेले नाही. तीच परिस्थिती उपव्यवस्थापकाची. सहायक कार्यशाळा अधिकारी-०२, सहायक कार्यशाळा अधीक्षकाची महासभेने १२ पदे मंजूर केली होती. परंतु, सरकारमान्य पदे ८ असून तीन पदे आजही रिक्त आहेत. प्रमुख मेकॅनिकची महासभेची १२ पदे मंजूर असून सरकारमान्य ९ पदे असून त्यातील ५ पदे रिक्त आहेत. वाहन तपासणीसच्या बाबतीतही १२ महासभेची, सरकारमान्य केवळ ३ असून त्यातील केवळ १ पद भरण्यात आले असून दोन पदे रिक्त आहेत. मेकॅनिक दर्जा-१ ची ६, आॅटो इलेक्ट्रिशिन १, असिस्टंट आॅटो इलेक्ट्रिशियन १, मदतनीस २५, अशी एकूण महासभेने मंजूर केलेल्या ३७० पदांपैकी २७५ पदे भरली असून केवळ कार्यशाळेतील ४६ पदे रिक्त आहेत. दुसरीकडे एकूणच परिवहनमध्ये अ आणि ब विभागात मोडणारी अन्य ४०० पदे रिक्त असून अ विभागातील परिवहन व्यवस्थापक वगळता, उपव्यवस्थापक, लेखापाल, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ लिपिक, मराठी लघुटंकलेखक, कनिष्ठ टंकलेखक, द्वारपाल, सुरक्षारक्षकांची १४ पदे अशी एकूण अ विभागात मोडणारी १४५ पैकी ४३ पदे रिक्त आहेत. तर, ब विभागात म्हणजेच वाहतूक विभागात आगार व्यवस्थापक १, वाहतूक निरीक्षक ३, सहायक वाहतूक निरीक्षक १२, वाहतूक नियंत्रक ३, चालक १८२ आणि वाहक १५५ अशा एकूण २१७७ पदांपैकी ३५७ पदे रिक्त आहेत.>कार्यशाळेला गळतीकार्यशाळेतील गिअर, युनिट, टायर विभागांसह इतर विभागांना सध्या गळती लागली आहे. कार्यशाळेच्या गिअर बॉक्स विभागाला जे प्लास्टिकचे छत टाकले आहे. त्याचे बाम्बू कमकुवत झाले आहेत. थोडा पाऊस झाला तरी पाणी तेथील साहित्यावर पडत असून या साहित्यालाही गंज पकडू लागला आहे. तसेच थ्री-फेजची लाइन येथून गेली असल्याने येथे शॉर्टसर्किटची शक्यताही नाकारता येत नाही. तरीसुद्धा आपला जीव मुठीत धरून हे कर्मचारी काम करीत आहेत. तसेच येथे महावितरणचा डीपी असून त्यावरील छपरालादेखील गळती लागली आहे. तसेच या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाचीही पडझड झाली असून येथील अनेक ठिकाणचे स्लॅब पडण्याच्या स्थितीत आहेत. कार्यशाळेबरोबर इतर कर्मचाऱ्यांना बढती नाहीकार्यशाळा आणि इतर विभागांत २२ वर्षांपासून कर्मचारी कार्यरत असून त्यांना अद्याप बढती दिलेली नाही. कार्यशाळेत १५० च्या आसपास कर्मचारी असून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमुळे येथे आजही ४५ कर्मचाऱ्यांची वानवा आहे. चालक, वाहकांची संख्या कमीपरिवहनचा गाडा रुळांवर आणण्यासाठी चालक आणि वाहकही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. परंतु, परिवहनची सध्याची परिस्थिती पाहता सध्या उपलब्ध असलेल्या चालक आणि वाहकांना पहाटेच्या वेळेस बससाठी १ ते २ तास वाट पाहावी लागते. चालक, वाहकांच्या भरतीसाठी १० वर्षांपूर्वी प्रयत्न झाला होता. परंतु, हे प्रकरण न्यायालयात गेल्याने परिवहनने पुन्हा नव्याने भरतीसाठी पावलेच उचलली नाही. -परिवहन सेवचा बट्ट्याबोळ हा प्रशासनानेच केला असून तेच परिवहन सेवा डबघाईत घालण्यास जबाबदार आहेत. त्यामुळे परिवहन नाही तर आता प्रशासनदेखील भंगारात टाकण्याची वेळ आली आहे.- राजेश मोरे, परिवहन समिती सदस्य >जीव धोक्यात घालून कर्तव्यपालनटीएमटीच्या आगारांतील दृश्य पाहिल्यास येथे माणसे काम करतात, याचा प्रशासनाला विसर पडला आहे. दुर्गंधी, डास, अस्वच्छता यांचा त्रास सहन करत कर्मचारी काम करत आहेत. इमारतीची झालेली दुरवस्था, ठिबक सिंचन यामुळे येथील कर्मचारी जीव मुठीत धरून आपले कर्तव्य बजावत आहेत.