शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

माळशेजचे रुपडे पालटणार

By admin | Updated: April 1, 2017 05:26 IST

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरातील पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या माळशेज घाटात ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी

ठाणे : मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरातील पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या माळशेज घाटात ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विवेक भीमनवार यांनी खास भटकंती केली. यादरम्यान त्यांनी नाणेघाट, वाल्हीवरे, सावर्णे, थितबी इत्यादी ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. या ठिकाणच्या पर्यटनस्थळांच्या विकासासह ट्रेकिंग पॉइंट्स विकसित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून सुमारेआठ कोटी रुपये खर्च करून माळशेजचा साजशृंगार होणार आहे. अ‍ॅडव्हेंचर ट्रेकिंग पाँइंटसाठी सुविधा उपलब्ध करून गावकऱ्यांच्या सहभागातून त्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची योजना त्यांनी आखली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबरमध्ये शहापूर येथील कुणबी महोत्सवात मुरबाड-शहापूर भागांत उत्तम टुरिझम सर्किट तयार करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार, भीमनवार यांनी रु जू होताच माळशेज घाटाची भटकंती करून पर्यटन विकासाच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. या भटकंती दौऱ्यात भीमनवार यांच्यासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, गटविकास अधिकारी ऐस्ताज हाश्मी, तहसीलदार सर्जेराव म्हस्के-पाटील, सहायक वनसंरक्षक कुंभार, सहायक गटविकास अधिकारी अविनाश मोहिते, परिक्षेत्र वनअधिकारी चन्ने, हिरवे आदींचा समावेश होता.या पर्यटनस्थळांचा विकास कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत करण्याचे निश्चित केले आहे. या सर्व ठिकाणी विशेषत: महिलांसाठी स्वच्छतागृहे, चेंजिंग रूम, टेंट्स, डॉरमेंटरी, जोडरस्ते, अ‍ॅडव्हेंचर ट्रेकिंगसाठी सुविधा, माहिती केंद्र इत्यादींसारख्या आवश्यक सुविधा देण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी सुमारे साडेआठ कोटी रु पये निधी ग्रामविकास विभागाने उपलब्ध करून दिल्याचे भीमनवार यांनी स्पष्ट केले.विशेष म्हणजे पर्यटकांना आवश्यकतेनुसार योग्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक महिला बचत गट, ग्रामसंघ, युवक मंडळे आदींचा सहभाग घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्याचा सर्वंकष पर्यटन आराखडाबचत गट, युवक मंडळे यांना पायाभूत व कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्थानिक वस्तू व उत्पादने विक्रीसाठी बचत गटांना स्टॉल्ससुद्धा उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय, ठाणे जिल्ह्याचा सर्वंकष पर्यटन विकास आराखडा करण्यात येणार असल्याचे भीमनवार यांनी सांगितले.