शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
4
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
5
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
6
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
7
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
8
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
9
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
10
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
11
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
12
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
13
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
14
डाॅक्टरसाहेब, मधुमेह होऊच नये, यासाठी काय करावे? चाळिशीनंतर करा नियमित तपासणी
15
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
16
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
17
यंदाचा कुंभमेळा पाच पट अधिक मोठा, ५,६५८ कोटींच्या कामांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन
18
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
19
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
20
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
Daily Top 2Weekly Top 5

इच्छापत्र केल्याने वारसदारांचे आयुष्य होते आनंदी; मृत्यूनंतरही संपत्तीचे हवे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 06:26 IST

इच्छापत्र कोणतीही सज्ञान व्यक्ती करू शकतो. नॉमिनेशन केले असले तरी इच्छापत्र केले पाहिजे

डोंबिवली : आपण आपल्या हयातीत संपत्तीचे नियोजन करतो त्याप्रमाणे मृत्यूनंतर आपली संपत्ती कोणत्या वारसदाराला द्यावी, याचे नियोजन केले पाहिजे. त्यामुळे वारसदारामध्ये कलह निर्माण होत नाहीत आणि आपल्या वारसदारांना आनंदी आयुष्य जगता येते. त्यामुळे प्रत्येकाने इच्छापत्र करणे ही काळाची मोठी गरज आहे, असे मत अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी व्यक्त केले.

डॉ. रघुवीर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे माधवाश्रम सभागृहात हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त ‘इच्छापत्र का व कसे करावे’ या विषयावर मार्गदर्शन व शंकानिरसन करणारा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अ‍ॅड. देशपांडे बोलत होते. फेसकॉम कोकण प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष श्यामसुंदर पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.

देशपांडे म्हणाले की, इच्छापत्र कोणतीही सज्ञान व्यक्ती करू शकतो. नॉमिनेशन केले असले तरी इच्छापत्र केले पाहिजे. इच्छापत्र केल्याने वारसांमध्ये कलह निर्माण होत नाहीत. आपल्या मुला-मुलींसोबतच पत्नीला देखील आनंदाने आयुष्य घालविता येऊ शकते. देशपांडे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून हा विषय समजून सांगितल्यामुळे नागरिकांना तो अधिक चांगल्या पद्धतीने समजला. इच्छापत्राविषयी सामाजिक, कायदेशीर व अर्थशास्त्रीय ज्ञान मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक तसेच सेवानिवृत्त मंडळींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश सिनकर व सूत्रसंचालन अमरेन्द्र पटवर्धन यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुहास टिल्लू, बिनेश नायर यांनी प्रयत्न केले.