शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

इच्छापत्र केल्याने वारसदारांचे आयुष्य होते आनंदी; मृत्यूनंतरही संपत्तीचे हवे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 06:26 IST

इच्छापत्र कोणतीही सज्ञान व्यक्ती करू शकतो. नॉमिनेशन केले असले तरी इच्छापत्र केले पाहिजे

डोंबिवली : आपण आपल्या हयातीत संपत्तीचे नियोजन करतो त्याप्रमाणे मृत्यूनंतर आपली संपत्ती कोणत्या वारसदाराला द्यावी, याचे नियोजन केले पाहिजे. त्यामुळे वारसदारामध्ये कलह निर्माण होत नाहीत आणि आपल्या वारसदारांना आनंदी आयुष्य जगता येते. त्यामुळे प्रत्येकाने इच्छापत्र करणे ही काळाची मोठी गरज आहे, असे मत अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी व्यक्त केले.

डॉ. रघुवीर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे माधवाश्रम सभागृहात हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त ‘इच्छापत्र का व कसे करावे’ या विषयावर मार्गदर्शन व शंकानिरसन करणारा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अ‍ॅड. देशपांडे बोलत होते. फेसकॉम कोकण प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष श्यामसुंदर पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.

देशपांडे म्हणाले की, इच्छापत्र कोणतीही सज्ञान व्यक्ती करू शकतो. नॉमिनेशन केले असले तरी इच्छापत्र केले पाहिजे. इच्छापत्र केल्याने वारसांमध्ये कलह निर्माण होत नाहीत. आपल्या मुला-मुलींसोबतच पत्नीला देखील आनंदाने आयुष्य घालविता येऊ शकते. देशपांडे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून हा विषय समजून सांगितल्यामुळे नागरिकांना तो अधिक चांगल्या पद्धतीने समजला. इच्छापत्राविषयी सामाजिक, कायदेशीर व अर्थशास्त्रीय ज्ञान मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक तसेच सेवानिवृत्त मंडळींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश सिनकर व सूत्रसंचालन अमरेन्द्र पटवर्धन यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुहास टिल्लू, बिनेश नायर यांनी प्रयत्न केले.