शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

इच्छापत्र केल्याने वारसदारांचे आयुष्य होते आनंदी; मृत्यूनंतरही संपत्तीचे हवे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 06:26 IST

इच्छापत्र कोणतीही सज्ञान व्यक्ती करू शकतो. नॉमिनेशन केले असले तरी इच्छापत्र केले पाहिजे

डोंबिवली : आपण आपल्या हयातीत संपत्तीचे नियोजन करतो त्याप्रमाणे मृत्यूनंतर आपली संपत्ती कोणत्या वारसदाराला द्यावी, याचे नियोजन केले पाहिजे. त्यामुळे वारसदारामध्ये कलह निर्माण होत नाहीत आणि आपल्या वारसदारांना आनंदी आयुष्य जगता येते. त्यामुळे प्रत्येकाने इच्छापत्र करणे ही काळाची मोठी गरज आहे, असे मत अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी व्यक्त केले.

डॉ. रघुवीर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे माधवाश्रम सभागृहात हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त ‘इच्छापत्र का व कसे करावे’ या विषयावर मार्गदर्शन व शंकानिरसन करणारा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अ‍ॅड. देशपांडे बोलत होते. फेसकॉम कोकण प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष श्यामसुंदर पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.

देशपांडे म्हणाले की, इच्छापत्र कोणतीही सज्ञान व्यक्ती करू शकतो. नॉमिनेशन केले असले तरी इच्छापत्र केले पाहिजे. इच्छापत्र केल्याने वारसांमध्ये कलह निर्माण होत नाहीत. आपल्या मुला-मुलींसोबतच पत्नीला देखील आनंदाने आयुष्य घालविता येऊ शकते. देशपांडे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून हा विषय समजून सांगितल्यामुळे नागरिकांना तो अधिक चांगल्या पद्धतीने समजला. इच्छापत्राविषयी सामाजिक, कायदेशीर व अर्थशास्त्रीय ज्ञान मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक तसेच सेवानिवृत्त मंडळींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश सिनकर व सूत्रसंचालन अमरेन्द्र पटवर्धन यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुहास टिल्लू, बिनेश नायर यांनी प्रयत्न केले.