शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

स्वतंत्र कल्याण जिल्हा करा, वाढत्या नागरीकरणामुळे नव्याने प्रस्ताव सादर; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 00:32 IST

बदलापूर : ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात येत असतानाच कल्याण जिल्हाही स्वतंत्र करावा अशी मागणी ...

बदलापूर : ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात येत असतानाच कल्याण जिल्हाही स्वतंत्र करावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यासाठी कोकण आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समितीही स्थापन करण्यात आली होती. मात्र हा प्रस्ताव अद्यापही निर्णयाच्या पटलावर आला नव्हता. या कल्याण जिल्ह्याच्या प्रस्तावाबाबत नव्याने मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. वाढते नागरीकरण पाहता कल्याण जिल्हा आणि स्वतंत्र आयुक्तालयाबाबतची मागणी करण्यात आली आहे.

पालघरपाठोपाठ कल्याण जिल्हा व्हावा अशी मागणी ठाणे जिल्ह्यातील काही आमदारांनी राज्यपालांकडे केली होती. मात्र या मागणीवर अद्याप कोणताच विचार झालेला नाही. मात्र कल्याण आणि परिसराचा वाढता विस्तार पाहता नव्याने ही मागणी पुढे केली जात आहे. आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कल्याण जिल्ह्याबाबतची नव्याने मागणी केली आहे. या आधीही सरकारी स्तरावर अशी मागणी करण्यात आली होती. त्या मागणीनुसार समिती तयार करून त्या समितीचा अहवाल तयार करण्यात आला आहे.या समितीचा अहवाल कल्याण जिल्हा निर्मितीला पूरक आहे. मात्र त्या समितीच्या अहवालावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आमदार कथोरे यांनी या समितीच्या अहवालानुसार कल्याण जिल्ह्याच्या निर्मितीचा निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

ठाणे जिल्ह्याचे पुन्हा एकदा विभाजन करून स्वतंत्र कल्याण जिल्ह्याची निर्मिती करावी लागणार आहे. तसे करताना रायगड जिल्ह्याचीही पुनर्रचना करून कर्जत तालुक्याचा समावेश कल्याण तालुक्यात करावा अशी मागणी आहे. ऐन निवडणुकीच्या आधी स्वतंत्र कल्याण जिल्ह्याची मागणी झाल्याने हा विषय निवडणुकीचा मुद्दा म्हणून पुढे येणार आहे, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे.कल्याण पोलीस आयुक्तालय हवेकल्याण जिल्ह्याप्रमाणेच आता या परिसरातील वाढते नागरीकरण लक्षात घेता कल्याणसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण करण्याची गरज आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, शहाड, आंबिवली, टिटवाळा आदी शहरे इतक्या झपाटयाने वाढत आहेत. त्यासाठी सध्या अस्तित्त्वात असलेली पोलीस ठाणी आणि पोलीस कर्मचारी अपुरे पडत आहेत. ठाणे शहर पोलीस

आयुक्तालयाकडून तडीपार झालेले अनेक गुन्हेगार हे पोलीस हद्दीचा फायदा घेत बदलापूरच्याजवळ वांगणी आणि अन्य तत्सम ग्रामीण पोलीस हद्दीत वास्तव्यास आलेले आहेत. त्यामुळे या गुन्हेगारांनी आपले हातपाय या परिसरात रोवायला सुरूवात केली आहे. त्यांचा बंदोबस्त करायचा असेल, तर कल्याण पोलीस आयुक्तालय करून त्याची हद्द वांगणी परिसरातील ग्रामीण भागापर्यंत वाढविणे आवश्यक आहे. त्या अनुषंगानेही मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :kalyanकल्याण