शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र कल्याण जिल्हा करा, वाढत्या नागरीकरणामुळे नव्याने प्रस्ताव सादर; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 00:32 IST

बदलापूर : ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात येत असतानाच कल्याण जिल्हाही स्वतंत्र करावा अशी मागणी ...

बदलापूर : ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात येत असतानाच कल्याण जिल्हाही स्वतंत्र करावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यासाठी कोकण आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समितीही स्थापन करण्यात आली होती. मात्र हा प्रस्ताव अद्यापही निर्णयाच्या पटलावर आला नव्हता. या कल्याण जिल्ह्याच्या प्रस्तावाबाबत नव्याने मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. वाढते नागरीकरण पाहता कल्याण जिल्हा आणि स्वतंत्र आयुक्तालयाबाबतची मागणी करण्यात आली आहे.

पालघरपाठोपाठ कल्याण जिल्हा व्हावा अशी मागणी ठाणे जिल्ह्यातील काही आमदारांनी राज्यपालांकडे केली होती. मात्र या मागणीवर अद्याप कोणताच विचार झालेला नाही. मात्र कल्याण आणि परिसराचा वाढता विस्तार पाहता नव्याने ही मागणी पुढे केली जात आहे. आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कल्याण जिल्ह्याबाबतची नव्याने मागणी केली आहे. या आधीही सरकारी स्तरावर अशी मागणी करण्यात आली होती. त्या मागणीनुसार समिती तयार करून त्या समितीचा अहवाल तयार करण्यात आला आहे.या समितीचा अहवाल कल्याण जिल्हा निर्मितीला पूरक आहे. मात्र त्या समितीच्या अहवालावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आमदार कथोरे यांनी या समितीच्या अहवालानुसार कल्याण जिल्ह्याच्या निर्मितीचा निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

ठाणे जिल्ह्याचे पुन्हा एकदा विभाजन करून स्वतंत्र कल्याण जिल्ह्याची निर्मिती करावी लागणार आहे. तसे करताना रायगड जिल्ह्याचीही पुनर्रचना करून कर्जत तालुक्याचा समावेश कल्याण तालुक्यात करावा अशी मागणी आहे. ऐन निवडणुकीच्या आधी स्वतंत्र कल्याण जिल्ह्याची मागणी झाल्याने हा विषय निवडणुकीचा मुद्दा म्हणून पुढे येणार आहे, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे.कल्याण पोलीस आयुक्तालय हवेकल्याण जिल्ह्याप्रमाणेच आता या परिसरातील वाढते नागरीकरण लक्षात घेता कल्याणसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण करण्याची गरज आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, शहाड, आंबिवली, टिटवाळा आदी शहरे इतक्या झपाटयाने वाढत आहेत. त्यासाठी सध्या अस्तित्त्वात असलेली पोलीस ठाणी आणि पोलीस कर्मचारी अपुरे पडत आहेत. ठाणे शहर पोलीस

आयुक्तालयाकडून तडीपार झालेले अनेक गुन्हेगार हे पोलीस हद्दीचा फायदा घेत बदलापूरच्याजवळ वांगणी आणि अन्य तत्सम ग्रामीण पोलीस हद्दीत वास्तव्यास आलेले आहेत. त्यामुळे या गुन्हेगारांनी आपले हातपाय या परिसरात रोवायला सुरूवात केली आहे. त्यांचा बंदोबस्त करायचा असेल, तर कल्याण पोलीस आयुक्तालय करून त्याची हद्द वांगणी परिसरातील ग्रामीण भागापर्यंत वाढविणे आवश्यक आहे. त्या अनुषंगानेही मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :kalyanकल्याण