शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र कल्याण जिल्हा करा, वाढत्या नागरीकरणामुळे नव्याने प्रस्ताव सादर; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 00:32 IST

बदलापूर : ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात येत असतानाच कल्याण जिल्हाही स्वतंत्र करावा अशी मागणी ...

बदलापूर : ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात येत असतानाच कल्याण जिल्हाही स्वतंत्र करावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यासाठी कोकण आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समितीही स्थापन करण्यात आली होती. मात्र हा प्रस्ताव अद्यापही निर्णयाच्या पटलावर आला नव्हता. या कल्याण जिल्ह्याच्या प्रस्तावाबाबत नव्याने मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. वाढते नागरीकरण पाहता कल्याण जिल्हा आणि स्वतंत्र आयुक्तालयाबाबतची मागणी करण्यात आली आहे.

पालघरपाठोपाठ कल्याण जिल्हा व्हावा अशी मागणी ठाणे जिल्ह्यातील काही आमदारांनी राज्यपालांकडे केली होती. मात्र या मागणीवर अद्याप कोणताच विचार झालेला नाही. मात्र कल्याण आणि परिसराचा वाढता विस्तार पाहता नव्याने ही मागणी पुढे केली जात आहे. आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कल्याण जिल्ह्याबाबतची नव्याने मागणी केली आहे. या आधीही सरकारी स्तरावर अशी मागणी करण्यात आली होती. त्या मागणीनुसार समिती तयार करून त्या समितीचा अहवाल तयार करण्यात आला आहे.या समितीचा अहवाल कल्याण जिल्हा निर्मितीला पूरक आहे. मात्र त्या समितीच्या अहवालावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आमदार कथोरे यांनी या समितीच्या अहवालानुसार कल्याण जिल्ह्याच्या निर्मितीचा निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

ठाणे जिल्ह्याचे पुन्हा एकदा विभाजन करून स्वतंत्र कल्याण जिल्ह्याची निर्मिती करावी लागणार आहे. तसे करताना रायगड जिल्ह्याचीही पुनर्रचना करून कर्जत तालुक्याचा समावेश कल्याण तालुक्यात करावा अशी मागणी आहे. ऐन निवडणुकीच्या आधी स्वतंत्र कल्याण जिल्ह्याची मागणी झाल्याने हा विषय निवडणुकीचा मुद्दा म्हणून पुढे येणार आहे, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे.कल्याण पोलीस आयुक्तालय हवेकल्याण जिल्ह्याप्रमाणेच आता या परिसरातील वाढते नागरीकरण लक्षात घेता कल्याणसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण करण्याची गरज आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, शहाड, आंबिवली, टिटवाळा आदी शहरे इतक्या झपाटयाने वाढत आहेत. त्यासाठी सध्या अस्तित्त्वात असलेली पोलीस ठाणी आणि पोलीस कर्मचारी अपुरे पडत आहेत. ठाणे शहर पोलीस

आयुक्तालयाकडून तडीपार झालेले अनेक गुन्हेगार हे पोलीस हद्दीचा फायदा घेत बदलापूरच्याजवळ वांगणी आणि अन्य तत्सम ग्रामीण पोलीस हद्दीत वास्तव्यास आलेले आहेत. त्यामुळे या गुन्हेगारांनी आपले हातपाय या परिसरात रोवायला सुरूवात केली आहे. त्यांचा बंदोबस्त करायचा असेल, तर कल्याण पोलीस आयुक्तालय करून त्याची हद्द वांगणी परिसरातील ग्रामीण भागापर्यंत वाढविणे आवश्यक आहे. त्या अनुषंगानेही मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :kalyanकल्याण