शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

उल्हासनगरातील पूरग्रस्त भागाचे पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:40 IST

उल्हासनगर : शहरातून वाहणाऱ्या वालधुनी व उल्हास नदीच्या पुराचा फटका नदीकिनाऱ्यावरील झोपडपट्टीला बसला आहे. त्यामुळे शेकडो जणांचे संसार उघड्यावर ...

उल्हासनगर : शहरातून वाहणाऱ्या वालधुनी व उल्हास नदीच्या पुराचा फटका नदीकिनाऱ्यावरील झोपडपट्टीला बसला आहे. त्यामुळे शेकडो जणांचे संसार उघड्यावर पडले. या पूरग्रस्त भागाचे पंचनामे करून, मदत देण्याची मागणी मनसेने प्रांत अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली.

उल्हासनगरात गेल्या आठवड्यात संततधार पावसाने वालधुनी आणि उल्हास नदीला पूर येऊन, नदीकिनाऱ्यावरील भारतनगर, सम्राट अशोकनगर, रेणुकानगर, मीनाताई ठाकरेनगर, करोतियानगर आदी परिसरात पुराचे पाणी घुसून शेकडो जणांचे संसार उघड्यावर आले. घरातील अन्नधान्य, कपडे, संसार उपयोगी वस्तू, टीव्ही, फ्रीज आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्या. यामुळे पुढे जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. एक आठवडा उलटूनही पूरग्रस्त भागाचे पंचनामे झाले नसल्याने, मनसेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, पक्ष पदाधिकारी प्रदीप गोडसे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन पूरग्रस्त घरांचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे, तसेच कॅम्प नं. ३ शांतीनगर येथे नदीच्या पाण्यात चार वर्षांचा मुलगा पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाला. त्याच्या नातेवाइकांना मदत करण्याची मागणी मनसे शिष्टमंडळाने केली.

याबाबत तहसीलदार विजय वाकोडे यांना पूरग्रस्त भागाच्या पंचनाम्यांसंदर्भात विचारले असता, जी घरे दोन दिवस पुराच्या पाण्यात होती. त्याच घरांचे पंचनामे करा, असा शासनाचा अध्यादेश असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली. असे असताना तलाठी यांना पूरग्रस्त भागांची पाहणी करण्याचे आदेश दिले असून, शासनाचे या संदर्भात आदेश आल्यास पूरग्रस्त भागाचे पंचनामे सुरू करण्यात येतील.