शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

उल्हासनगरातील पूरग्रस्त भागाचे पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:40 IST

उल्हासनगर : शहरातून वाहणाऱ्या वालधुनी व उल्हास नदीच्या पुराचा फटका नदीकिनाऱ्यावरील झोपडपट्टीला बसला आहे. त्यामुळे शेकडो जणांचे संसार उघड्यावर ...

उल्हासनगर : शहरातून वाहणाऱ्या वालधुनी व उल्हास नदीच्या पुराचा फटका नदीकिनाऱ्यावरील झोपडपट्टीला बसला आहे. त्यामुळे शेकडो जणांचे संसार उघड्यावर पडले. या पूरग्रस्त भागाचे पंचनामे करून, मदत देण्याची मागणी मनसेने प्रांत अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली.

उल्हासनगरात गेल्या आठवड्यात संततधार पावसाने वालधुनी आणि उल्हास नदीला पूर येऊन, नदीकिनाऱ्यावरील भारतनगर, सम्राट अशोकनगर, रेणुकानगर, मीनाताई ठाकरेनगर, करोतियानगर आदी परिसरात पुराचे पाणी घुसून शेकडो जणांचे संसार उघड्यावर आले. घरातील अन्नधान्य, कपडे, संसार उपयोगी वस्तू, टीव्ही, फ्रीज आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्या. यामुळे पुढे जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. एक आठवडा उलटूनही पूरग्रस्त भागाचे पंचनामे झाले नसल्याने, मनसेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, पक्ष पदाधिकारी प्रदीप गोडसे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन पूरग्रस्त घरांचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे, तसेच कॅम्प नं. ३ शांतीनगर येथे नदीच्या पाण्यात चार वर्षांचा मुलगा पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाला. त्याच्या नातेवाइकांना मदत करण्याची मागणी मनसे शिष्टमंडळाने केली.

याबाबत तहसीलदार विजय वाकोडे यांना पूरग्रस्त भागाच्या पंचनाम्यांसंदर्भात विचारले असता, जी घरे दोन दिवस पुराच्या पाण्यात होती. त्याच घरांचे पंचनामे करा, असा शासनाचा अध्यादेश असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली. असे असताना तलाठी यांना पूरग्रस्त भागांची पाहणी करण्याचे आदेश दिले असून, शासनाचे या संदर्भात आदेश आल्यास पूरग्रस्त भागाचे पंचनामे सुरू करण्यात येतील.