शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

जुन्या रहिवाशांची एनओसी सक्तीची करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:51 IST

डोंबिवली : धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची फसवणूक करून चुकीच्या पद्धतीने पाडकाम करून त्यांच्या पुनर्वसनाची कोणतीही हमी न देता त्यांना ...

डोंबिवली : धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची फसवणूक करून चुकीच्या पद्धतीने पाडकाम करून त्यांच्या पुनर्वसनाची कोणतीही हमी न देता त्यांना रस्त्यावर आणले जात आहे. यापुढे त्या रहिवाशांना भोगवटा प्रमाणपत्र सोबतच त्या इमारतीचा पुनर्विकास करताना इमारतींत राहणाऱ्या जुन्या रहिवाशांची एनओसी असल्याशिवाय पुनर्विकास करण्यास परवानगी देता येणार नाही, अशी अट घालणे आवश्यक असल्याची मागणी भाजपच्या डोंबिवली ग्रामीण महिला अध्यक्षा मनीषा राणे यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना सोमवारी पत्राद्वारे केली आहे.

इमारतीत वर्षांनुवर्षे राहणाऱ्या नागरिकांनी पै पै म्हणून जमा केलेली पुंजी घालून घर घेतले होते. मालकांनी त्या इमारतींचे वेळोवेळी योग्य प्रकारे दुरुस्ती न केल्याने त्या इमारती लवकर धोकादायक होत आहेत. ३० वर्षांपेक्षा अधिक जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी, त्या इमारतीच्या मालकांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे आदेश दोन वर्षांपूर्वी महापालिकेने दिले होते. अनेकदा याबाबत इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना कोणतीही माहिती नसते. त्यामुळे त्यांच्या अज्ञानाचा फायदा इमारत मालक घेत आहेत. रहिवाशांना कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले जात आहे, याकडे राणे यांनी लक्ष वेधले.

काही वेळेस इमारत मालक रहिवाशांना पागडीचे घेतलेले डिपॉझिटही परत करीत नाहीत किंवा इमारत पुनर्विकास करताना तुमचा घराचा अधिकार कायम राहील, याबाबत कोणतीही लेखी हमीपत्र देत नाहीत. महापालिकेच्या कारवाईची भीती दाखवून त्यांची घरे बळजबरीने रिकामी करून त्यांना त्यांच्या घरातून हाकलले जात असल्याच्या अनेक घटना घडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा यापुढे राहिवाशांना बेघर व बेदखल करून धोकादायक इमारतीच्या पाडकामाला विरोध करण्यासाठी आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.