शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

विरारमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना; विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 06:29 IST

महाराष्ट्रासह देशभरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.

नालासोपारा (मंगेश कराळे) :-

महाराष्ट्रासह देशभरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त ठिकठिकाणी भीमसैनिकांकडून जल्लोष साजरात केला जातोय. अशातच विरामधून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकी दरम्यान विजेचा धक्का लागून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. 

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विरारच्या कारगिल नगर परिसरात गुरूवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. रुपेश सुर्वे (३०) आणि सुमित सुत (२३) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येलाच ही दुर्देवी घटना घडल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

नेमके काय घडले ?विरारच्या कारगिल नगर येथील बौध्दजन पंचायत समितीतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री ९ वाजता निघालेली ही मिरवणूक साडेदहा वाजता संपली. कारगिल चौकातून मिरवणूक संपवून कार्यकर्ते घरी परतत होते.

त्यावेळी मिरवणूक ट्रॉलीवर ६ जण उभे होते. त्यावेळी वाहनावरील लोखंडी रॉड जवळील रोहित्राला लागला. त्या वीजप्रवाहामुळे वाहनावरील ६ जण होरपळले. त्यातील रुपेश सुर्वे (३०) आणि सुमित सुत (२३) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण जखमी झाले. उमेश कनोजिया (१८), राहुल जगताप (१८), सत्यनारायण (२३) आणि अस्मित खांबे (३२) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. जखमींपैकी अस्मित खांबे याची प्रकृती स्थिर असून उमेश, राहुल आणि सत्यनारायण यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

तिघांनाही मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मिरवणुकीतून परताना ट्रॉलीवरील लोखंडी रॉडचा ट्रान्सफॉर्मरला धक्का लागल्याने वीजेचा झटका लागून ही दुर्घटना घडल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त रामचंद्र देशमुख यांनी दिली. या दुर्घटनेमुळे शहरावर शोककळा पसरली आहे.