शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
5
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
6
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
7
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
8
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
9
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
10
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
11
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
12
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
13
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
14
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
15
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
16
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
17
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
18
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
19
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
20
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू

आमदारकीची परंपरा राखली, आता मंत्रीपदाची बारी?

By admin | Updated: February 17, 2016 01:45 IST

सत्ताधारी पक्षाचा आमदार निवडून देण्याची परंपरा पालघरवासियांनी अमित घोडा यांच्या रुपाने कायम ठेवली आहे. आता पहिल्यांदा निवडून आल्यानंतर राज्यमंत्री होण्याचा मान मनीषा

शशी करपे,  वसईसत्ताधारी पक्षाचा आमदार निवडून देण्याची परंपरा पालघरवासियांनी अमित घोडा यांच्या रुपाने कायम ठेवली आहे. आता पहिल्यांदा निवडून आल्यानंतर राज्यमंत्री होण्याचा मान मनीषा निमकर आणि राजेंद्र गावीत यांच्यानंतर घोडा यांना मिळतो की नाही ही उत्सुकता पालघरवासीयांना आहे. पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे राजेंद्र गावीत यांचा पराभव करून शिवसेना-भाजपा युतीचे अमित घोडा यांनी पालघरमध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्याची परंपरा कायम राखली आहे. १९९० पासून, मधला २००९ चा अपवाद वगळता शिवसेनेने पालघरमध्ये आपले वर्चस्व अबाधित राखले आहे. १९९० साली राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यावर शिवसेनेच्या तिकीटीवर पहिल्यांदाच निवडून आलेल्या मनीषा निमकर राणे सरकारमध्ये राज्यमंत्री बनल्या होत्या. त्यानंतर निमकर सलग तीनवेळा निवडून आल्या. २००९ साली विधानसभा मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर झालेल्या निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या मनीषा निमकर यांचा पराभव करून काँग्रेसचे राजेंद्र गावीत निवडून आले होते. गावीतांनी शिवसेनेची निवडून येण्याची परंपरा मोडीत काढली होती. यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते. गावीत पहिल्यांदाच निवडून आले आणि राज्यमंत्री बनले. राज्यमंत्रीपदाच्या शेवटच्या टप्यात पालघर जिल्हा निर्मिती झाली. या जिल्ह्याचा पहिला पालकमंत्री होण्याचे गावीतांचे स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण होऊ दिले नाही. नव्या पालघर जिल्ह्याचा पहिला पालकमंत्री होण्याचा मान त्यामुळे भाजपाचे विष्णू सवरा यांना मिळाला. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादीचे कृष्णा घोडा यांना उमेदवारी दिली. यानिवडणुकीत मोदी लाट होती. त्यामुळे भाजपाने उमेदवार दिला होता. तर बहुजन विकास आघाडीने शिवसेनेच्या मनीषा निमकर यांना आपल्याकडे खेचून त्यांना उमेदवारी दिली होती. मनसेचाही उमेदवार मैदानात होता. असे असतानाही घोडा यांनी सर्वांवर मात करीत गावीतांचा अवघ्या ५१५ मतांनी पराभव करीत विजय खेचून आणला होता. निवडणुकीनंतर काही महिन्यांतच घोडा यांचे निधन झाल्याने पालघरवासियांना पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागले.यावेळच्या निवडणुकीत भाजपा मैदानात नसली तरी बहुजन विकास आघाडीने मोठे आव्हान उभे करण्याचे काम केले. काँग्रेसने पुन्हा एकदा राजेंद्र गावीत यांना उमेदवारी दिली. निवडणुकीत वाढवण आणि जिंदाल बंदराचा विषय चर्चेला आणून शिवसेनेचे अमित घोडा यांना अडचणीत आणण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न झाले. बहुजन विकास आघाडीने हवा तयार केल्याने रंगत वाढली होती. एकीकडे, शिवसेनेचे ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची करून ताकद पणाला लावली होती.गेल्या दोन्ही निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने गावीतांना पराभवापासून दूर नेण्याचे काम केले. पहिल्यांदा निवडून आल्यानंतर गावीतांना राज्यमंत्रीपद मिळाले. तेव्हापासून गावीतांची राजकीय इच्छाशक्ती वाढली होती. पुढे पालघर लोकसभा मतदारसंघातून खासदार होण्याचे स्वप्न पहात गावीत वसईच्या राजकारणात सक्रीय झाले होते. वसईतील मते नेहमीच निर्णाय ठरत असल्याने गावीतांनी मोर्चेबांधणी सुुरु केली होती. आपल्या बालेकिल्ल्यात गावीतांचा राजकीय धोका त्याचवेळी हितेंद्र ठाकूर यांनी ओळखला होता. तेव्हापासून ठाकूर यांनी गावीतांना रोखण्याची व्यूहरचना आखली होती. अपेक्षेप्रमाणे गावीतांनी पालघर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिल्लीहून मिळवली होती. पण, ठाकूरांनी काँग्रेसचा पाठिंबा मिळवत गावीतांना माघार घेणे भाग पाडले होते. त्यानंतर गावीतांविरोधात दोन्ही निवडणुकांमध्ये उमेदवार देऊन ठाकूरांनी त्यांच्या पराभवात हातभार लावण्याचे काम केले. गावीतांना दोन्ही वेळा राष्ट्रवादी काँग्रेसची किती साथ मिळाली याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.