शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महाराष्ट्रातील महिषासुराचे मर्दन होणारच - अंबादास दानवे

By अजित मांडके | Updated: October 16, 2023 22:44 IST

आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेभी नाक्यावरील नवरात्रोउत्सवाला दानवे यांनी हजेरी लावली.

ठाणे : सामान्य शिवसैनिक म्हणून मी ठाण्यात येऊन टेभी नाक्याच्या देवीचे दर्शन घेतले. देवी ही शक्तीची आणि ऊर्जेची देवी आहे, महिषासुराचे मर्दन  करणारी आहे आणि मला वाटतं  महाराष्ट्रात जे जे महिषासुर निर्माण झाले आहेत त्याचे मर्दन केल्याशिवाय देवी राहणार नाही. असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नाव न घेता राज्यातील सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.          आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेभी नाक्यावरील नवरात्रोउत्सवाला दानवे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यामध्ये त्यांनी आशिष शेलारांवर देखील टीका केली. आशिष शेलारांना इतिहास कमी माहिती असेल, आज एनडीएमध्ये कोणते कोणते पक्ष कोणत्या विचारांचे पक्ष सामील आहे हे सुद्धा त्यांनी जाहीर करावे. अटलजींनी जेव्हा सरकार स्थापन केले तेव्हा मुलायम सिंग होते, फर्नांडिस होते हे कोणत्या विचारांचे होते, मधू दंडवते होते ते कोणत्या विचारांचे होते . हे सर्व समाजवादी विचारांचे होते , आणि म्हणून आशिष शेलारांनी इतिहास तपासावा, भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येतील असतील तर शेलारांच्या वक्तव्याचा फार विचार करण्याची गरज नसल्याचे दानवे म्हणाले. 

मागील वर्षी वातावरण वेगळे होते. मात्र यावेळी दसरा मेळावा ऐतिहासिक होणार आहे. वाजत गाजत गुलाल उधळत शिवसैनिक येणार आहेत. आमच्यात कोणत्याही प्रकारचे गट नाहीत. खरी शिवसेना आमचीच असून बाकी ड्युब्लिकेट शिवसेना असल्याचा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला. आमचा एक नेता, एक झेंडा एक मैदान असल्याचेही दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

आरक्षणाची आम्हीही वाट बघत आहोतमराठ्यांना आरक्षण देण्याचे आश्वासन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना दिले आहे. मी सुद्धा  मराठवाड्यातील आहे.  मला या आश्वासनांची चांगली माहिती आहे . आम्ही मराठवाड्यातील लोक  या आश्वासनाच्या पूर्ततेची वाट बघत असल्याचे दानवे यावेळी म्हणाले. आझाद मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होत असल्याचे प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी अंबादास दानवे यांच्या निदर्शनास आणून देताच ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच ओरिजनल आहे. आझाद मैदानावर जमणारे ते डुप्लिकेट लोक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवे