शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

खाजगीकरणा विरोधात महावितरणच्या वीज कर्मचारी, अधिकाऱ्यांचा आज रात्रीपासून संप! भव्य मोर्चाद्वारे एकमताने निर्णय 

By सुरेश लोखंडे | Updated: January 2, 2023 17:37 IST

महावितरणचे अधिकारी, अभियंते आणि वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन खाजगी करणाविरोधात विविध मार्गांनी १५ दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहेत.

ठाणे: महावितरण कंपनीच्या खाजगीकरणासंदर्भात सरकार व प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप करत, महाराष्ट्र राज्य कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली वीज कर्मचाऱ्यांनी आज भव्य मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले. जिल्हाधिकारी कार्यालयास येण्यासाठी विरोध करण्यात आल्याने हा मोर्चा मुलुंड चेक नाका येथे कामगार न्यायालयाजवळ अडवण्यात आला. या मोर्चेकरांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेऊन त्यांचा निवेदन दिले. तसेच, ३ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ५ जानेवारपर्यंतच्या ७२ तासांच्या संपाचा इशारा दिला आहे. 

महावितरणचे अधिकारी, अभियंते आणि वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन खाजगी करणाविरोधात विविध मार्गांनी १५ दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहेत. या नियोजनानुसार आज मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर येणाऱ्या या मोर्चाला सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या वागळे ईस्टेट येथील कार्यालयावरून निघालेला हा पाच हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा मोर्चा मुलुंड चेक नाका येथे आढवण्यात आला. तेथे या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. त्यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करीत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नियोजीत कार्यक्रमानुसार मंगळवारी मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा एकमताने निर्णय घेतला. या मोर्चात वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंत्यांच्या तब्बल सात संघटनांचा समावेश होता.

या नवीन वर्षाच्या प्रारंभीच वीज कर्मचारी, अधिकाऱ्यांनी हा मोर्चा काढून ४ जानेवारीपासून पुढील ७२ तासांचा संप पुकारला आहे. अदाणी इलेक्ट्रिकल या कंपनीने राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रातील वीज कंपनीला समांतर नवीन लायसंसी स्थापित कुरुन गडगंज एक हजार कोटींपेक्षा जास्त महसूल मिळवण्याचा खटाटोप केल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे. 

नवीमुंबई ,पनवेल,उरण, ठाणे,मुलुंड,भांडूप,तळोजा क्षेत्रातील तब्बल पाच लाख वीज ग्राहकांचे क्षेत्र महावितरण कंपनी ऐवजी अदानी इलेक्ट्रिकल कंपनीला हस्तांतरीत करण्याचा अर्ज महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे करून परवाना मागितल्याचे या आंदोलनकर्त्यांचा दावा आहे. या खाजगी कापोर्रेट घराण्याने पुर्णत: औद्योगिक विकास झालेल्या व भविष्यात होणाऱ्या विभागावर जास्तीत जास्त नफा कमावण्याच्या उद्देशाने समांतर लायसंकीची मान्यता मिळावी म्हणून अर्ज केला. त्यामुळे या वीज क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, अभियंत्यांनी रस्त्यावर उतरून या खाजगीकरणाला विरोध केला आहे. त्यातून हा ७२ तासाचा संप पुकारण्यात येत आहे.   

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजthaneठाणे