शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: तामिळनाडूच्या वळणावर राजकारण

By संदीप प्रधान | Updated: December 26, 2022 09:25 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील असून, त्यांचा व त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील संघर्ष गेल्या काही महिन्यांत तीव्र झालाय. 

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांना ३० जून २००१ च्या मध्यरात्री दीड वाजता गाढ झोपेतून पोलिसांनी उठवलं व अक्षरश: फरपटत पोलिसांच्या गाडीत कोंबून अटक करून नेले. १२ कोटी रुपयांच्या उड्डाणपूल घोटाळ्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी ही कारवाई केली होती. ठाण्याचे राजकारण तामिळनाडूच्या वळणावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील असून, त्यांचा व त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील संघर्ष गेल्या काही महिन्यांत तीव्र झालाय. 

नागपूर सुधार प्रन्यासच्या १६ भूखंडधारकांना त्यांचे भूखंड नियमित करून देण्याच्या शिंदे यांनी ८ जूनला मविआ सरकारच्या काळात नगरविकास मंत्री या नात्याने घेतलेल्या निर्णयावर न्यायालयाने आक्षेप घेतला. त्यामुळे विरोधकांना थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याची संधी मिळाली. या प्रकरणात ज्यांनी याचिका केल्या होत्या, त्यांची नागपूरमध्ये आव्हाड यांनी भेट घेतल्याचे समजते. त्यानंतर विरोधकांनी हे प्रकरण लावून धरले. 

काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाचा खेळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला, तेव्हा आव्हाड यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले गेले. त्यातून ते जामिनावर सुटतात न सुटतात तोच भाजपच्या एका कार्यकर्तीने त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आपल्यावर पाच गुन्हे दाखल करून महापालिका निवडणुकीपूर्वी ठाण्यातून तडीपार करण्याचे कटकारस्थान सत्ताधारी पक्ष करीत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता. त्यामुळे शिंदे यांच्या विरोधातील प्रकरण हाती लागताच हिशोब चुकता करण्याची संधी प्राप्त झाली, असा आनंद कदाचित त्यांना झाला असू शकतो.

महाराष्ट्रातील अनेक मुख्यमंत्री वेगवेगळ्या कारणांमुळे वादात सापडले व त्यांना पदे सोडावी लागली. बॅ. अंतुले हे सिमेंट घोटाळ्यामुळे संकटात सापडले. शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी हे त्यांच्या जावयाच्या पुण्यातील बेकायदा टॉवरमुळे अडचणीत आले होते. मुळात शिंदे यांचा हा कथित घोटाळा मविआ सरकारमधील असून, त्यावेळी उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड हे त्यांचे सहकारी होते. 

सरकार चालवणे ही जर सामूहिक जबाबदारी असेल, तर मविआ सरकारच्या काळात झालेल्या चुकीच्या निर्णयात ठाकरे, आव्हाड हेही वाटेकरी आहेत. उलटपक्षी भाजपच्या नेत्यांनी मविआ सरकारवर या निर्णयामुळे टीका केली होती. सरकार बदलल्यावर किंवा व्यक्तींनी पक्ष अथवा आघाड्या बदलल्यावर निर्णयाची जबाबदारी झटकता येत नाही.

सरकारचे घर असते काचेचे

सरकारचे घर हे काचेचे असते व मुख्यमंत्र्यांचे घर तर कचकड्याचे असते. त्यावर दगड फेकण्याचा प्रयत्न विरोधक करतात. शिंदे यांना अडचणीत आणण्याचे काम त्यांचे जुने सहकारी करीत आहेत की नवे? हेही त्यांनी तपासून घेतले पाहिजे. शिंदे याचे ठाण्यातील स्थानिक प्रतिस्पर्धी नेते जसे अस्वस्थ आहेत तसेच इतका मोठा राजकीय धमाका करणाऱ्या शिंदे यांना ताब्यात ठेवणे व त्यांचे परतीचे सर्व मार्ग बंद करणे, ही त्यांच्या नव्या मित्रांचीही गरज आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड