शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

विशेष लेख: तामिळनाडूच्या वळणावर राजकारण

By संदीप प्रधान | Updated: December 26, 2022 09:25 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील असून, त्यांचा व त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील संघर्ष गेल्या काही महिन्यांत तीव्र झालाय. 

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांना ३० जून २००१ च्या मध्यरात्री दीड वाजता गाढ झोपेतून पोलिसांनी उठवलं व अक्षरश: फरपटत पोलिसांच्या गाडीत कोंबून अटक करून नेले. १२ कोटी रुपयांच्या उड्डाणपूल घोटाळ्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी ही कारवाई केली होती. ठाण्याचे राजकारण तामिळनाडूच्या वळणावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील असून, त्यांचा व त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील संघर्ष गेल्या काही महिन्यांत तीव्र झालाय. 

नागपूर सुधार प्रन्यासच्या १६ भूखंडधारकांना त्यांचे भूखंड नियमित करून देण्याच्या शिंदे यांनी ८ जूनला मविआ सरकारच्या काळात नगरविकास मंत्री या नात्याने घेतलेल्या निर्णयावर न्यायालयाने आक्षेप घेतला. त्यामुळे विरोधकांना थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याची संधी मिळाली. या प्रकरणात ज्यांनी याचिका केल्या होत्या, त्यांची नागपूरमध्ये आव्हाड यांनी भेट घेतल्याचे समजते. त्यानंतर विरोधकांनी हे प्रकरण लावून धरले. 

काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाचा खेळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला, तेव्हा आव्हाड यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले गेले. त्यातून ते जामिनावर सुटतात न सुटतात तोच भाजपच्या एका कार्यकर्तीने त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आपल्यावर पाच गुन्हे दाखल करून महापालिका निवडणुकीपूर्वी ठाण्यातून तडीपार करण्याचे कटकारस्थान सत्ताधारी पक्ष करीत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता. त्यामुळे शिंदे यांच्या विरोधातील प्रकरण हाती लागताच हिशोब चुकता करण्याची संधी प्राप्त झाली, असा आनंद कदाचित त्यांना झाला असू शकतो.

महाराष्ट्रातील अनेक मुख्यमंत्री वेगवेगळ्या कारणांमुळे वादात सापडले व त्यांना पदे सोडावी लागली. बॅ. अंतुले हे सिमेंट घोटाळ्यामुळे संकटात सापडले. शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी हे त्यांच्या जावयाच्या पुण्यातील बेकायदा टॉवरमुळे अडचणीत आले होते. मुळात शिंदे यांचा हा कथित घोटाळा मविआ सरकारमधील असून, त्यावेळी उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड हे त्यांचे सहकारी होते. 

सरकार चालवणे ही जर सामूहिक जबाबदारी असेल, तर मविआ सरकारच्या काळात झालेल्या चुकीच्या निर्णयात ठाकरे, आव्हाड हेही वाटेकरी आहेत. उलटपक्षी भाजपच्या नेत्यांनी मविआ सरकारवर या निर्णयामुळे टीका केली होती. सरकार बदलल्यावर किंवा व्यक्तींनी पक्ष अथवा आघाड्या बदलल्यावर निर्णयाची जबाबदारी झटकता येत नाही.

सरकारचे घर असते काचेचे

सरकारचे घर हे काचेचे असते व मुख्यमंत्र्यांचे घर तर कचकड्याचे असते. त्यावर दगड फेकण्याचा प्रयत्न विरोधक करतात. शिंदे यांना अडचणीत आणण्याचे काम त्यांचे जुने सहकारी करीत आहेत की नवे? हेही त्यांनी तपासून घेतले पाहिजे. शिंदे याचे ठाण्यातील स्थानिक प्रतिस्पर्धी नेते जसे अस्वस्थ आहेत तसेच इतका मोठा राजकीय धमाका करणाऱ्या शिंदे यांना ताब्यात ठेवणे व त्यांचे परतीचे सर्व मार्ग बंद करणे, ही त्यांच्या नव्या मित्रांचीही गरज आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड