शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Maharashtra Election 2019 : बंडापाठोपाठ आता शिवसैनिकांचे राजीनामास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 05:42 IST

भाजप उमेदवार गणपत गायकवाड यांच्याविरोधात शिवसेनेचे धनंजय बोडारे हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे ठाकले आहेत.

कल्याण : भाजप उमेदवाराविरोधात केलेली बंडखोरी शमवण्यासाठी वाढत असलेल्या पक्षश्रेष्ठींच्या दबावाला कंटाळून पूर्वेकडील आणि उल्हासनगरमधील शिवसेनेच्या २६ नगरसेवकांनी आणि सुमारे २०० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फॅक्सद्वारे पाठवल्याने पूर्व मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले आहे. बंडखोरी केल्यामुळे पक्ष अडचणीत येऊ नये, म्हणून राजीनामे दिल्याचा दावा या पदाधिकाऱ्यांकडून केला जात असून, आता आम्ही अपक्ष म्हणून काम करायला मोकळे झालो आहोत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.भाजप उमेदवार गणपत गायकवाड यांच्याविरोधात शिवसेनेचे धनंजय बोडारे हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे ठाकले आहेत. पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे नगरसेवक अधिक असल्याने हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, अशी मागणी नगरसेवक आणि पदाधिकाºयांकडून करण्यात आली होती. परंतु, तो भाजपच्या वाट्याला गेल्याने शिवसेनेचे उल्हासनगरचे गटनेते धनंजय बोडारे यांनी बंडखोरी करत, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी अर्ज माघारी घ्यावा, यासाठी पक्षाच्या नेत्यांकडून खूप प्रयत्न झाले. पण, अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत बोडारे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवला, तरी वरिष्ठांकडून बोडारे आणि स्थानिक नगरसेवक तसेच पक्ष पदाधिकाºयांवर दबावतंत्राचा वापर सुरूच राहिला. यासंदर्भात नगरसेवक आणि पदाधिकाºयांनी वरिष्ठांशी चर्चाही केली, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर, वाढता दबाव पाहता बुधवारी दुपारी सर्व नगरसेवक आणि पदाधिकाºयांची एका ठिकाणी विशेष बैठक पार पडली. यात सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेऊन तो तत्काळ अमलातही आणण्यात आला. त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविले असून यावर आता काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बंडखोरीपाठोपाठ शिवसैनिकांनी राजीनामास्त्र उगारल्याने पक्षसमोर पेच निर्माण झाला आहे. कल्याणमध्ये सेनेचे १८ आणि उल्हासनगरमध्ये आठ नगरसेवक आहेत. विधानसभा क्षेत्रप्रमुख, सहसंपर्कप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, शहरसंघटक, महिला व युवासेना आदी २०० पदाधिकाºयांनी राजीनामे दिले आहेत.पक्षाच्या दबावतंत्रामुळे घेतली भूमिकाशिवसेनेचे कल्याण पूर्व विधानसभा सहसंपर्कप्रमुख शरद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, वरिष्ठांकडून दबाव येत होता. पूर्वेतील पक्षाची ताकद पाहता याठिकाणी निवडणूक लढविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. याआधी वरिष्ठांशी चर्चा केली होती. परंतु, त्यांनी आमचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून सातत्याने दबावतंत्र सुरू असल्याने सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षप्रमुखांकडे राजीनामे पाठवले असून, आमच्या या निर्णयामुळे आता पक्षापुढे कोणतीही अडचण राहणार नाही आणि आम्हीदेखील निवडणूक लढवायला मोकळे झालो, असे पाटील यांनी सांगितले.स्टंटबाजीची चर्चानगरसेवकांनी पदांचे राजीनामे पक्षप्रमुखांना पाठविले आहेत. त्यांना खरोखरीच राजीनामे द्यायचे होते, तर ते आयुक्तांकडे द्यायला हवे होते. त्यामुळे त्यांची ही कृती म्हणजे प्रसिद्धी लाटण्यासाठी केलेली स्टंटबाजी असल्याची चर्चा राजीनामानाट्यानंतर सर्वत्र सुरू होती.राजीनाम्याबाबत माहिती नाही : यासंदर्भात शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सामूहिक राजीनाम्यांबाबत आपणास काहीहीमाहिती नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना