शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

पर्यायाअभावी अर्धे मतदार घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 03:11 IST

Maharashtra Election 2019: मेट्रो, क्लस्टर, स्मार्ट सिटी, काळू धरणाचाही पडला नाही मोह

ठाणे : मेट्रो, क्लस्टर, काळू धरण, स्मार्ट सिटीतील कामे अशी अनेक प्रलोभने राज्य सरकारने दाखवली असतानाही ठाणे जिल्ह्यातील निम्मे मतदार सोमवारी मतदानाला फिरकले नाहीत. मागीलवेळी केवळ ५० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यावेळीही जवळपास तेवढेच मतदार मतदानाला घराबाहेर पडले. उर्वरित मतदारांनी घरी बसणे, फिरायला जाणे किंवा दिवाळी खरेदी करणे पसंत केले. यावरून, सुशिक्षितता व दरडोई उत्पन्नात अग्रेसर असलेला ठाणे जिल्ह्यातील मतदार आपल्या राष्ट्रीय कर्तव्याबाबत किती बेफिकीर आहे, याचेच प्रत्यंतर पुन्हा आले.

केंद्रात व राज्यात गेली पाच वर्षे एकाच पक्षाची सत्ता असून ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, मीरा-भार्इंदर आदी शहरांना वेगवेगळ्या प्रकल्पांकरिता निधी दिल्याचे दावे सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी केले होते. त्याचबरोबर मेट्रोसारख्या प्रकल्पातून ही शहरे जोडण्याचे आश्वासन दिले होते. ठाण्यासारख्या शहराची पाणीसमस्या सोडवण्याकरिता काळू धरणाचे आश्वासन दिले होते. गेल्या काही वर्षांत या वेगवेगळ्या शहरांत उड्डाणपूल व अन्य कामे केल्याचे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र, तरीही निम्म्या मतदारांना या कामाची सत्ताधाºयांना पोचपावती म्हणून मतदानाला बाहेर पडावे, असे वाटले नाही किंवा विद्यमान सत्ताधाºयांच्या विरोधात कौल देण्याकरिता पर्याय म्हणून रिंगणात उतरवलेले उमेदवार हेही आश्वासक वाटले नाहीत, असाच ५० टक्के मतदारांच्या पाठ फिरवण्याचा अर्थ आहे.

५० टक्के मतदारांनी मतदान केले असले तरी त्यामधील ‘नोटा’ केलेल्या मतदारांची संख्या ही एक ते दोन टक्के जरी असली तरी त्याचा अर्थ या मतदारांनाही विद्यमान सत्ताधारी व विरोधक यापैकी कुणीही लायक वाटत नाही. याचा अर्थ ५० टक्क्यांपेक्षा जास्त ठाणेकरांना विद्यमान सत्ताधारी व विरोधक दोघेही अमान्य आहेत. फरक एवढाच की, त्यापैकी केवळ एक ते दोन टक्के लोकांनी हे दोघेही नापसंत असल्याचे ‘नोटा’द्वारे जाहीर केले. उर्वरित मतदारांनी तेवढीही तसदी घेतली नाही.

ठाणे जिल्ह्यातील बहुतांश मतदार सुशिक्षित आहेत. राजकीय पक्षांनी उमेदवारी दिलेले बहुतांश उमेदवार हे अल्पशिक्षित आहेत. अनेकांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. शिवाय, जे पुन्हा रिंगणात उतरले आहेत, त्यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा सर्व बाबींमुळेही मतदार मतदानाला बाहेर पडला नसेल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. या संपूर्ण उदासीनतेचा अर्थ स्पष्ट आहे की, ठाणे जिल्ह्यातील मतदारांना पर्याय हवा आहे. मात्र, सक्षम पर्याय नसल्याने ठाणेकर लोकशाही प्रक्रियेबाबत कमालीचे उदासीन आहेत, असेही राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान