शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
7
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
8
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
9
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
10
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
11
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
12
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
13
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
14
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
15
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
16
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
17
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
18
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
19
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
20
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना

Maharashtra Election 2019: उमेदवारांमध्ये निकालाविषयी धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 06:21 IST

Maharashtra Election 2019: कल्याण पश्चिम व ग्रामीण मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी घसरली आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : कल्याण पश्चिम व ग्रामीण मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी घसरली आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये निकालाविषयी धास्ती आहे. निकाल काय लागणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मतदानाची घसरलेली टक्केवारी ही लोकशाहीसाठी चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

कल्याण पश्चिम मतदारसंघात यंदा ४१.७४ मतदान झाले. २०१४ मध्ये येथे ४४.९२ टक्के मतदान झाले होते. ते पाहता येथे ३.१८ टक्क्यांची घट झाल्याचे स्पष्ट होते. मागील पाच वर्षांत येथे मतदारांची संख्याही वाढली. मात्र, सोमवारी मतदार मतदानासाठी बाहेर न पडल्याने मतदानाचा टक्का वाढला नसल्याचे पाहायला मिळते.

मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक यंत्रणेसह कल्याण-डोंबिवली महापालिकेने जनजागृतीची मोहिम हाती घेतली होती. मात्र, तिला मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. तसेच जागृतीची मोहीम अनेक मतदारांपर्यंत पोहोचलीच नसल्याने मतदार बाहेर पडला नाही, असे कारण सांगितले जात आहे.

कल्याण पश्चिमेत आधारवाडी डम्पिंग ग्राउंड, वाहतूककोंडी, पत्रीपूल या प्रमुख समस्या होत्या. या समस्या सुटाव्यात, यासाठी मतदार मतदानाच्या दिवशी बाहेर पडून मतपेटीतून राग व्यक्त करतील, असा दावा केला जात होता. मात्र, मतदार बाहेर पडले नाहीत. मतपेटीतून त्यांना व्यक्त व्हावेसे वाटले नाही, ही बाब मतदानाची आकडेवारीच उघडपणे सांगत आहे.

त्याचबरोबर जनमानसात अशीही चर्चा निवडणुकीपूर्वी नेहमीच ऐकू येते ती म्हणजे मतदान कोणालाही करा, कोणीही निवडून येईल. तरी देखील समस्या तशाच राहील, त्यात काही फरक पडणार नाही. शहराच्या विकासात निवडणुकीमुळे कोणताच फरक पडत नाही, अशी एक प्रकारची हतबलताही मतदारांमध्ये घर करू लागली आहे. त्यामुळेच मतदानाविषयी मतदारांमध्ये अनास्था आहे, हे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. मतदानाची २१ आॅक्टोबर ही तारीख रविवारच्या सुटीला जोडून आली. त्यामुळे अनेकांनी शनिवार ते सोमवार असे सलग तीन दिवस अथवा सोमवारच्या सुटीचा फायदा घेत शहराबाहेर जाणे पसंत केले.

मी मतदान न करण्याने इतका मोठा फरक पडणार नाही, अशीही एक मानसिकता मोठ्या प्रमाणात उपनगरात वाढीस लागली आहे. तिचाही मोठा फटका मतदानाला बसला आहे. घटलेल्या मतदानाबरोबरच ‘नोटा’चे बटण दाबणाऱ्यांचे प्रमाणही अधिक असण्याची शक्यता आहे.बहिष्कार नसतानाही झाले कमी मतदान

कल्याण ग्रामीण मतदारसंघातही रस्ते, वाहतूककोंडी, नागरी सुविधा, पाणी तसेच २७ गावांचा प्रश्न, अशा अनेक समस्या आहेत. २७ गावांतील मतदार मतदानासाठी बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. परंतु, येथे मतांच्या टक्केवारीत एक टक्का घट झाली आहे.

कल्याण ग्रामीण मतदारसंघात २०१४ मध्ये ४७.९४ टक्के मतदान झाले होते. तर, यंदा येथे ४६.३७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यंदा मतदानावर कोणाचाही बहिष्कारही नव्हता, तरी देखील मतदान एक टक्क्याने घटले. त्यामुळे येथील मतदारालाही मतदारसंघात बदल घडविण्यासाठी बाहेर पडावेसे वाटले नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान