शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: उमेदवारांमध्ये निकालाविषयी धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 06:21 IST

Maharashtra Election 2019: कल्याण पश्चिम व ग्रामीण मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी घसरली आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : कल्याण पश्चिम व ग्रामीण मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी घसरली आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये निकालाविषयी धास्ती आहे. निकाल काय लागणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मतदानाची घसरलेली टक्केवारी ही लोकशाहीसाठी चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

कल्याण पश्चिम मतदारसंघात यंदा ४१.७४ मतदान झाले. २०१४ मध्ये येथे ४४.९२ टक्के मतदान झाले होते. ते पाहता येथे ३.१८ टक्क्यांची घट झाल्याचे स्पष्ट होते. मागील पाच वर्षांत येथे मतदारांची संख्याही वाढली. मात्र, सोमवारी मतदार मतदानासाठी बाहेर न पडल्याने मतदानाचा टक्का वाढला नसल्याचे पाहायला मिळते.

मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक यंत्रणेसह कल्याण-डोंबिवली महापालिकेने जनजागृतीची मोहिम हाती घेतली होती. मात्र, तिला मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. तसेच जागृतीची मोहीम अनेक मतदारांपर्यंत पोहोचलीच नसल्याने मतदार बाहेर पडला नाही, असे कारण सांगितले जात आहे.

कल्याण पश्चिमेत आधारवाडी डम्पिंग ग्राउंड, वाहतूककोंडी, पत्रीपूल या प्रमुख समस्या होत्या. या समस्या सुटाव्यात, यासाठी मतदार मतदानाच्या दिवशी बाहेर पडून मतपेटीतून राग व्यक्त करतील, असा दावा केला जात होता. मात्र, मतदार बाहेर पडले नाहीत. मतपेटीतून त्यांना व्यक्त व्हावेसे वाटले नाही, ही बाब मतदानाची आकडेवारीच उघडपणे सांगत आहे.

त्याचबरोबर जनमानसात अशीही चर्चा निवडणुकीपूर्वी नेहमीच ऐकू येते ती म्हणजे मतदान कोणालाही करा, कोणीही निवडून येईल. तरी देखील समस्या तशाच राहील, त्यात काही फरक पडणार नाही. शहराच्या विकासात निवडणुकीमुळे कोणताच फरक पडत नाही, अशी एक प्रकारची हतबलताही मतदारांमध्ये घर करू लागली आहे. त्यामुळेच मतदानाविषयी मतदारांमध्ये अनास्था आहे, हे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. मतदानाची २१ आॅक्टोबर ही तारीख रविवारच्या सुटीला जोडून आली. त्यामुळे अनेकांनी शनिवार ते सोमवार असे सलग तीन दिवस अथवा सोमवारच्या सुटीचा फायदा घेत शहराबाहेर जाणे पसंत केले.

मी मतदान न करण्याने इतका मोठा फरक पडणार नाही, अशीही एक मानसिकता मोठ्या प्रमाणात उपनगरात वाढीस लागली आहे. तिचाही मोठा फटका मतदानाला बसला आहे. घटलेल्या मतदानाबरोबरच ‘नोटा’चे बटण दाबणाऱ्यांचे प्रमाणही अधिक असण्याची शक्यता आहे.बहिष्कार नसतानाही झाले कमी मतदान

कल्याण ग्रामीण मतदारसंघातही रस्ते, वाहतूककोंडी, नागरी सुविधा, पाणी तसेच २७ गावांचा प्रश्न, अशा अनेक समस्या आहेत. २७ गावांतील मतदार मतदानासाठी बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. परंतु, येथे मतांच्या टक्केवारीत एक टक्का घट झाली आहे.

कल्याण ग्रामीण मतदारसंघात २०१४ मध्ये ४७.९४ टक्के मतदान झाले होते. तर, यंदा येथे ४६.३७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यंदा मतदानावर कोणाचाही बहिष्कारही नव्हता, तरी देखील मतदान एक टक्क्याने घटले. त्यामुळे येथील मतदारालाही मतदारसंघात बदल घडविण्यासाठी बाहेर पडावेसे वाटले नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान