शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
3
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
4
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
5
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
6
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
7
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
8
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
9
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
10
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
11
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
12
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
13
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
14
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
15
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
16
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
17
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
18
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
19
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
20
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?

Maharashtra Election 2019: रिपाइंची बंडखोरी मोडण्यासाठी भाजपची व्यूहरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 05:39 IST

उल्हासनगर मतदारसंघात आयलानी विरुद्ध कलानी यांच्यात सामना रंगण्याची चिन्हे होती.

- सदानंद नाईकउल्हासनगर : रिपाइंची बंडखोरी मोडीत काढण्यासाठी भाजपने मुख्यमंत्र्यांच्या शुक्रवारच्या सभेत केंद्रीय मंत्री आठवले यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. त्यांनी सभेला येण्यास टाळले तर, रिपाइंच्या बंडखोर उमेदवाराला आठवले यांचा पाठिंबा असल्याचे उघड होणार आहे. त्यामुळे सत्तेत असूनही, रिपाइंने उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात केलेला बंडखोरीचा मुद्दा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला आहे.उल्हासनगर मतदारसंघात आयलानी विरुद्ध कलानी यांच्यात सामना रंगण्याची चिन्हे होती. यादरम्यान रिपाइं आठवले गटाचे शहराध्यक्ष व गटनेते भगवान भालेराव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली. रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश बारासिंगे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन भगवान भालेराव व अंबरनाथ मतदारसंघातील रामभाऊ तायडे हे रिपाइंचे अधिकृत उमेदवार असून काही तांत्रिक कारणामुळे एबी फॉर्म देता आले नसल्याचे सांगितले होते. पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले स्वत: प्रचारात उतरणार असल्याची माहितीही त्यांनी दिली होती. महायुतीमध्ये सहभागी असलेल्या रिपाइंच्या उमेदवाराने बंडखोरी केल्याने, भाजपचे कुमार आयलानी यांची डोकेदुखी वाढली. भालेराव यांचा पाठिंबा मिळावा, यासाठी त्यांची मनधरणी सुरू असली तरी, याबाबत पक्षाने तसा आदेश दिला नसल्याचे भालेराव यांचे म्हणणे आहे.रिपाइंचे प्रमुख रामदास आठवले यांच्या आदेशान्वये मी निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे उमेदवारी मागे घेण्याचा आदेश ते देणारच नाहीत. तसेच मुख्यमंत्र्यांच्या सभेलाही ते येणार नसल्याचे भगवान भालेराव यांनी सांगितले. यदाकदाचित, मुख्यमंत्र्यांच्या आग्रहाखातर ते सभेला आलेच, तरी रामभाऊ तायडे किंवा मला उमेदवारी अर्ज मागे घ्ोण्यास ते सांगणार नाहीत, असा दावाही भालेराव यांनी केला.दरम्यान, उल्हासनगरातील गोलमैदान येथे शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आदींसह युतीचे जिल्ह्यातील प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सभेच्या निमित्ताने रिपाइंची बंडखोरी मोडीत काढण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. त्यानुसार, रिपाइंचे सर्वेसर्वा रामदास आठवले हे सभेला यावेत आणि त्यांच्याकडूनच हा विषय मार्गी लावावा, यासाठी भाजपच्या नेत्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.उमेदवारांच्या सोयीसाठी आठवलेंकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ?मुख्यमंत्र्यांच्या बहुतांश सभांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची हजेरी असते. मग, उल्हासनगरमध्येच का नाही, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. उल्हासनगर मतदारसंघातील रिपाइंचे बंडखोर उमेदवार भगवान भालेराव व अंबरनाथ मतदारसंघातील रामभाऊ तायडे यांना अडसर नको, म्हणून रामदास आठवले हे मुख्यमंत्र्यांच्या सभेला येणे जाणीवपूर्वक टाळत असल्याचे बोलले जात आहे.मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे लक्षशहरात धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी व वाढीव चटईक्षेत्राचा प्रश्न उल्हासनगरात उभा ठाकला आहे. धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीला चार चटईक्षेत्र दिले. मात्र, शासन आदेशानुसार बेकायदा इमारती नियमित करण्यासाठी आकारला जाणारा दंड मोठा असल्याने, दंडाअभावी अध्यादेशाची प्रक्रिया पुन्हा ठप्प पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री काय घोषणा करतात, याकडे उल्हासनगरवासीयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :ulhasnagar-acउल्हासनगर