शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

शोषणावर आधारित यंत्रमाग व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:00 IST

कापड उद्योगात एकेकाळी मँचेस्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या यंत्रमाग उद्योगास संजीवनी देण्याची गरज असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर स्वत:ची पकड बसवण्यासाठी शासनाने सहकार्य करणे आवश्यक आहे.

पंढरीनाथ कुंभार

शहरात आठ लाखांपेक्षा जास्त यंत्रमाग असून ते जुन्या धाटणीचे आहेत. या यंत्रमागांची उत्पादनक्षमता कमी असल्याने त्यांच्यावर विणलेल्या कापडाचा सरासरी खर्च जास्त येत असल्याने कापडाची विक्रीकिंमत वाढते. तेवढा भाव मार्केटमध्ये मिळत नसल्याने नेहमी यंत्रमागमालक व कापड व्यापारी यांना नुकसान सोसून व्यवसाय करावा लागतो. कापडाला जास्त भाव मिळावा, म्हणून बरेच व्यापारी कापडाचा साठा करून योग्यवेळी मार्केटमध्ये कापड विकून आपले काही अंशी नुकसान टाळतात. कापडाचा भाव अस्थिर असतो, कारण त्यासाठी लागणाऱ्या धाग्याच्या भावावर शासनाचे नियंत्रण नाही. यार्न मार्केटमध्ये सट्टाबाजार सुरू असतो. परिणामी, शहरातील यंत्रमाग व्यवसायावर तेजीमंदीचे सावट नेहमीच पसरलेले असते. या सट्टाबाजारावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने दोन कोटी रुपयांची यार्नपेढी योजना आणली होती. परंतु, त्या सुविधेचा लाभ कोणी घेतला नाही.

भिवंडीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त यंत्रमाग मजुरीने कापड विणून देण्याचे काम करत आहेत. कापड व्यापारी हे शहरातील यंत्रमागमालकांकडून अथवा यंत्रमागधारकांकडून कापड विणून घेत आहेत. त्यांनी दिलेल्या मजुरीतच यंत्रमागधारकाला कापड विणणे परवडत नसल्याने काही यंत्रमागधारक वीजचोरी करणे अथवा इतर मार्गाने आपला फायदा करून घेतात. बºयाच वेळा कामगारांची पिळवणूक करून नफा मिळवत असतात. त्यामुळे कामगारांचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले आहे. या कमी मनुष्यबळाचा फटका बºयाचवेळा यंत्रमागास बसतो. कधी मार्केटमध्ये तेजी आली की, कामगारवर्ग जास्त रकमेची मागणी करतो. त्यामुळे कामगारांच्या तुटवड्याला मालकवर्गास सामोरे जावे लागते.

नोटाबंदी व जीएसटी लागू झाल्यानंतर शहरातील यंत्रमागांवर मोठा परिणाम झाला. शहरात असलेल्या यंत्रमागांची सरकारदप्तरी नोंद नाही. यंत्रमागास वीज लागते, म्हणून वीजपुरवठा घेताना त्याची नोंद केली जाते. यंत्रमाग मार्केटमध्ये मोठ्या संख्येने रोखीने व्यवहार होत आहेत. शासनाचा टॅक्स वाचवण्यासाठी अवलंबलेल्या रोखीच्या व्यवहारामुळे नोटाबंदी व जीएसटी लागू झाल्यानंतर बँकेत या आस्थापनांच्या नोंदी होऊ लागल्या. गुमास्ता कायद्याखाली नोंद होऊ लागली. मात्र, शासनाने औद्योगिक कायद्याखाली यंत्रमागांची नोंद करण्याचे आदेश दिले असताना प्रशासनाच्या उदासीनतेने यंत्रमागाच्या नोंदी शासनदरबारी होऊ शकल्या नाहीत. या सर्व प्रकरणाने काही काळ यंत्रमाग बंद झाले होते. कालांतराने हे मार्केट पूर्ववत सुरू झाले.

भिवंडीतील यंत्रमागावर विणलेल्या कापडास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ निर्माण झाल्यानंतर येथे नियमित वीजपुरवठा होत नसल्याने कापड उत्पादन कमी होऊ लागले होते. तसेच वीजचोरीचे प्रमाण वाढून शासनास नुकसान होऊ लागल्याने शासनाने टोरंट वीजकंपनीला शहरास वीजपुरवठा करून त्यांच्याकडून वीजवसुली करण्यासाठी फ्रेन्चायसी दिली. त्यामुळे वीजपुरवठ्यात सुधारणा होऊन कापडाचे उत्पादन वाढले. परंतु, शासनाने वेळोवेळी वीजदरात अपेक्षित सवलत न दिल्याने त्याचा परिणाम व्यावसायिकांना भोगावा लागला. त्यामुळे हा व्यवसाय डबघाईला आला.

शहरात लोकवस्ती व यंत्रमाग अशी मिश्र वस्ती असल्याने विशेषत: कॉटन (सुती) कापड विणणाºया यंत्रमागांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. त्या प्रदूषणाचा जनमानसावर परिणाम होत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही. भिवंडी परिसरात मोठ्या संख्येने विकासकामे होत असताना व नव्याने इमारती उभ्या राहत असताना यंत्रमागासाठी शासनाने राखीव क्षेत्र निर्माण करण्याची आवश्यकता असून या मिश्र वस्तीमधील प्रदूषणापासून लोकांची सुटका केली पाहिजे. तसेच जास्त उत्पादनासाठी आधुनिक शटललेस यंत्रमाग लावले, तर हा व्यवसाय तग धरू शकणार आहे. यंत्रमागांची शासनाने सक्तीने नोंदणी केली, तरच योग्य सुविधा निर्माण करता येणे शक्य आहे.

 

टॅग्स :bhiwandiभिवंडी