शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

निष्ठावंत शिवसैनिकांना डावलले!

By admin | Updated: October 15, 2015 01:40 IST

शिवसेनेने सोमवारी रातोरात ए-बी फॉर्मचे वाटप केले. त्या सर्वांनी मंगळवारी तातडीने फॉर्म भरले. मात्र, त्यात डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिकांना डावलण्यात आल्याची भावना आहे

अनिकेत घमंडी, डोंबिवलीशिवसेनेने सोमवारी रातोरात ए-बी फॉर्मचे वाटप केले. त्या सर्वांनी मंगळवारी तातडीने फॉर्म भरले. मात्र, त्यात डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिकांना डावलण्यात आल्याची भावना आहे. त्यामुळे सैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून तिकीट मिळवण्याचा नेमका क्रायटेरिया काय असतो? पैसा, ओळख, वशिला की पक्षासाठी निष्ठेने झटणे, यापैकी काय कामाला येते, हे माहीत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना हे चालले असते का? तेव्हा असे नव्हते, अशी खंत करून या मावळ््यांनी आताच्या जिल्हास्तरावरील काही पदाधिकाऱ्यांच्या ‘अर्थ’पूर्ण कारभाराबाबत संताप व्यक्त केला आहे.रामनगरमधील निष्ठावंत शिवसैनिक आणि मध्यवर्ती शाखेचे २० वर्षांहून अधिक काळ शाखाप्रमुख म्हणून काम केलेल्या राम मिराशी यांचा विचार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि जिल्हा संपर्कप्रमुख, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. किती काळ आणि का सहन करायचे? नेहमीच का डावलले जाते? असे सवालही त्यांनी केले. शाखेवर केवळ निवडणूक एके निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कसे काही नेते येतात, हे जनतेलाही माहीत आहे. त्यामागची त्यांची उद्दिष्टे उघड करण्यासाठी प्रसिद्धिमाध्यमांनी पोलखोल करावी, म्हणजे पक्षात एकंदरीत काय सुरू आहे (डोंबिवली स्तरावर), हे श्रेष्ठींच्या निदर्शनास येईल, असेही ते म्हणाले. >> काय, कुठे, कसे घडले1मिराशींप्रमाणेच शिवमार्केटमधील पक्षाच्याच स्वीकृत नगरसेवकाने ए-बी फॉर्म मिळण्याआधीच फॉर्म भरला होता. त्यांनाही सोमवारी रात्री फोनाफोनी करत असे का केले, याची विचारणा झाली. तसेच तिकीट मागे घेण्याबाबत ‘आदेश’ देण्यात आले.2त्यावर, संबंधित उमेदवाराने उद्धवजींनी स्वीकृत नगरसेवक पद दिले होते, त्यामुळे एक तर त्यांनी अथवा पालकमंत्र्यांनी सांगितले तर विचार करू, असे स्पष्टपणे सांगितले. या संभाषणानंतर अद्याप तरी केतन दुर्वे यांनी फॉर्म मागे घेतलेला नाही. अशीच स्थिती सावरकर रोड येथेही आहे. 3टिळकनगरमध्येही एका जुन्या सैनिकाला डावलण्यात आले आहे. त्यामुळे एकंदरीतच कल्याणच्या तुलनेत डोंबिवलीच्या शिवसैनिकांमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे जाणवत आहे.रामनगर हा वॉर्ड ओपन रामनगर हा वॉर्ड ओपन असताना तसेच ब्राह्मण उमेदवार पक्षाकडे असतानाही का डावलण्यात आले? याची खंत त्यांनी व्यक्त केली. पक्षामध्ये काल आलेल्या सैनिकांनी विविध पदे भूषवली, त्याबद्दलही काही नाही. पक्षवाढीसाठी-बळकटीसाठी ते आवश्यकच असते, परंतु निर्णयप्रक्रियेत जुन्या जाणत्यांना विचारात का घेतले जात नाही, असे ते म्हणाले. निदान, यापुढे तरी संपर्कप्रमुख आणि पक्षप्रमुख याची नोंद घेतील आणि न्याय देतील, अशी सकारात्मक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.