शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

निष्ठावंत शिवसैनिकांना डावलले!

By admin | Updated: October 15, 2015 01:40 IST

शिवसेनेने सोमवारी रातोरात ए-बी फॉर्मचे वाटप केले. त्या सर्वांनी मंगळवारी तातडीने फॉर्म भरले. मात्र, त्यात डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिकांना डावलण्यात आल्याची भावना आहे

अनिकेत घमंडी, डोंबिवलीशिवसेनेने सोमवारी रातोरात ए-बी फॉर्मचे वाटप केले. त्या सर्वांनी मंगळवारी तातडीने फॉर्म भरले. मात्र, त्यात डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिकांना डावलण्यात आल्याची भावना आहे. त्यामुळे सैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून तिकीट मिळवण्याचा नेमका क्रायटेरिया काय असतो? पैसा, ओळख, वशिला की पक्षासाठी निष्ठेने झटणे, यापैकी काय कामाला येते, हे माहीत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना हे चालले असते का? तेव्हा असे नव्हते, अशी खंत करून या मावळ््यांनी आताच्या जिल्हास्तरावरील काही पदाधिकाऱ्यांच्या ‘अर्थ’पूर्ण कारभाराबाबत संताप व्यक्त केला आहे.रामनगरमधील निष्ठावंत शिवसैनिक आणि मध्यवर्ती शाखेचे २० वर्षांहून अधिक काळ शाखाप्रमुख म्हणून काम केलेल्या राम मिराशी यांचा विचार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि जिल्हा संपर्कप्रमुख, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. किती काळ आणि का सहन करायचे? नेहमीच का डावलले जाते? असे सवालही त्यांनी केले. शाखेवर केवळ निवडणूक एके निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कसे काही नेते येतात, हे जनतेलाही माहीत आहे. त्यामागची त्यांची उद्दिष्टे उघड करण्यासाठी प्रसिद्धिमाध्यमांनी पोलखोल करावी, म्हणजे पक्षात एकंदरीत काय सुरू आहे (डोंबिवली स्तरावर), हे श्रेष्ठींच्या निदर्शनास येईल, असेही ते म्हणाले. >> काय, कुठे, कसे घडले1मिराशींप्रमाणेच शिवमार्केटमधील पक्षाच्याच स्वीकृत नगरसेवकाने ए-बी फॉर्म मिळण्याआधीच फॉर्म भरला होता. त्यांनाही सोमवारी रात्री फोनाफोनी करत असे का केले, याची विचारणा झाली. तसेच तिकीट मागे घेण्याबाबत ‘आदेश’ देण्यात आले.2त्यावर, संबंधित उमेदवाराने उद्धवजींनी स्वीकृत नगरसेवक पद दिले होते, त्यामुळे एक तर त्यांनी अथवा पालकमंत्र्यांनी सांगितले तर विचार करू, असे स्पष्टपणे सांगितले. या संभाषणानंतर अद्याप तरी केतन दुर्वे यांनी फॉर्म मागे घेतलेला नाही. अशीच स्थिती सावरकर रोड येथेही आहे. 3टिळकनगरमध्येही एका जुन्या सैनिकाला डावलण्यात आले आहे. त्यामुळे एकंदरीतच कल्याणच्या तुलनेत डोंबिवलीच्या शिवसैनिकांमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे जाणवत आहे.रामनगर हा वॉर्ड ओपन रामनगर हा वॉर्ड ओपन असताना तसेच ब्राह्मण उमेदवार पक्षाकडे असतानाही का डावलण्यात आले? याची खंत त्यांनी व्यक्त केली. पक्षामध्ये काल आलेल्या सैनिकांनी विविध पदे भूषवली, त्याबद्दलही काही नाही. पक्षवाढीसाठी-बळकटीसाठी ते आवश्यकच असते, परंतु निर्णयप्रक्रियेत जुन्या जाणत्यांना विचारात का घेतले जात नाही, असे ते म्हणाले. निदान, यापुढे तरी संपर्कप्रमुख आणि पक्षप्रमुख याची नोंद घेतील आणि न्याय देतील, अशी सकारात्मक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.