शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

नीचांकी मतदानाची टक्केवारी पुसली जाणार?

By admin | Updated: January 23, 2017 05:17 IST

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत सर्वाेच्च ४२ टक्के मतदानाची नोंद आहे. यापूर्वी ती ३५ टक्क्यांच्या पुढे गेलेली नाही. २००९ च्या

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत सर्वाेच्च ४२ टक्के मतदानाची नोंद आहे. यापूर्वी ती ३५ टक्क्यांच्या पुढे गेलेली नाही. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ३९, तर २०१४ मध्ये ती ४३ टक्के होती. पाच लाख ६ हजार ९८ मतदारांपैकी फक्त ४३ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यापूर्वी विधानसभा व पालिकेतील मतदानाची टक्केवारी ३३ च्या पुढे गेलेली नाही. राज्यात सर्वाधिक नीचांकी मतदानाची नोंद उल्हासनगरात झाली. याची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेत महापालिका हद्दीतील सर्वच मतदारयाद्यांचे पुनर्सर्वेक्षण केले. यादीतील दुबारा-तिबारा नावे, स्थलांतरित झालेले, मृत व्यक्तींची नावे वगळली. पुनर्सर्वेक्षणात ८१ हजार मतदारसंख्या कमी झाली. त्यामुळे नवीन मतदारयादीत ४ लाख १५ हजार ८५६ मतदारांची नोंद झाली आहे.२००७ च्या महापालिका निवडणुकीत सरासरी ३४, तर २०१२ च्या निवडणुकीत ४१.२३ टक्के मतदान झाले होते. पालिका निवडणुकीत उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांना निवडणुकीसाठी बाहेर काढतात. तरीही, मतदानाची टक्केवारी वाढत नसल्याने बोगस नावे व दुबारा-तिबारा नावे असल्याची चर्चा झाली. निवडणूक आयोगाने मतदारयादीचे पुनर्सर्वेक्षण केल्याने ८१ हजार मतदार कमी झाले. या प्रकारामुळे मतदान टक्का वाढण्याची शक्यता राजकीय पक्षांनी व्यक्त केली. मतदानाचा टक्का ७० च्या पुढे नेण्यासाठी विविध उपाययोजना राबवणार असल्याचे सूतोवाच महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी केले. मतदानाबाबत जागृती करून विविध माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचणार असल्याचे सांगितले. उल्हासनगरात सिंधी समाजाचा एकछत्री अंमल होता. त्यानंतर मराठी, उत्तर भारतीय नागरिकांनी राजकारणात आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली. १९९६ मध्ये नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले. नगर परिषदेत फक्त सिंधी समाजाकडे नगराध्यक्षपद गेले. मात्र, महापालिका होताच महापौरपद सर्वाधिक काळ मराठी समाजाकडे गेले. सिंधीबहुल शहरात मराठी नगरसेवक जास्त निवडून येऊन मराठीराज सुरू झाले. त्यामुळे सिंधी समाज धोक्यात आला, अशी आवई उठवण्यात आली. महापालिकेला हरिदास माखिजा, ज्योती कलानी, कुमार आयलानी, आशा इदनानी यांच्या रूपाने सिंधी, तर यशस्विनी नाईक, लीलाबाई आशान, राजश्री चौधरी, विद्या निर्मले, अपेक्षा पाटील यांच्या रूपाने मराठी समाजाचे महापौर झाले. तसेच उत्तर भारतीय असलेल्या मालती करोतिया महापौरपदी विराजमान झाल्या होत्या.२०१२ च्या महापालिका निवडणुकीत पप्पू कलानी, ज्योती कलानी, भाजपाचे लाल पंजाबी, कुमार आयलानी, नरेंद्र राजानी, शिवसेनेचे चंद्रकांत बोडारे, राजेंद्र चौधरी, जीवन इदनानी, सचिन कदम, डॉ. जयराम लुल्ला आदी नेत्यांनी मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी स्वत: फिरले होते. मतदान कोणालाही करा, पण लोकशाहीवाढीसाठी मतदान करण्याची गळ घातली होती.