शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नीचांकी मतदानाची टक्केवारी पुसली जाणार?

By admin | Updated: January 23, 2017 05:17 IST

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत सर्वाेच्च ४२ टक्के मतदानाची नोंद आहे. यापूर्वी ती ३५ टक्क्यांच्या पुढे गेलेली नाही. २००९ च्या

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत सर्वाेच्च ४२ टक्के मतदानाची नोंद आहे. यापूर्वी ती ३५ टक्क्यांच्या पुढे गेलेली नाही. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ३९, तर २०१४ मध्ये ती ४३ टक्के होती. पाच लाख ६ हजार ९८ मतदारांपैकी फक्त ४३ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यापूर्वी विधानसभा व पालिकेतील मतदानाची टक्केवारी ३३ च्या पुढे गेलेली नाही. राज्यात सर्वाधिक नीचांकी मतदानाची नोंद उल्हासनगरात झाली. याची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेत महापालिका हद्दीतील सर्वच मतदारयाद्यांचे पुनर्सर्वेक्षण केले. यादीतील दुबारा-तिबारा नावे, स्थलांतरित झालेले, मृत व्यक्तींची नावे वगळली. पुनर्सर्वेक्षणात ८१ हजार मतदारसंख्या कमी झाली. त्यामुळे नवीन मतदारयादीत ४ लाख १५ हजार ८५६ मतदारांची नोंद झाली आहे.२००७ च्या महापालिका निवडणुकीत सरासरी ३४, तर २०१२ च्या निवडणुकीत ४१.२३ टक्के मतदान झाले होते. पालिका निवडणुकीत उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांना निवडणुकीसाठी बाहेर काढतात. तरीही, मतदानाची टक्केवारी वाढत नसल्याने बोगस नावे व दुबारा-तिबारा नावे असल्याची चर्चा झाली. निवडणूक आयोगाने मतदारयादीचे पुनर्सर्वेक्षण केल्याने ८१ हजार मतदार कमी झाले. या प्रकारामुळे मतदान टक्का वाढण्याची शक्यता राजकीय पक्षांनी व्यक्त केली. मतदानाचा टक्का ७० च्या पुढे नेण्यासाठी विविध उपाययोजना राबवणार असल्याचे सूतोवाच महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी केले. मतदानाबाबत जागृती करून विविध माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचणार असल्याचे सांगितले. उल्हासनगरात सिंधी समाजाचा एकछत्री अंमल होता. त्यानंतर मराठी, उत्तर भारतीय नागरिकांनी राजकारणात आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली. १९९६ मध्ये नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले. नगर परिषदेत फक्त सिंधी समाजाकडे नगराध्यक्षपद गेले. मात्र, महापालिका होताच महापौरपद सर्वाधिक काळ मराठी समाजाकडे गेले. सिंधीबहुल शहरात मराठी नगरसेवक जास्त निवडून येऊन मराठीराज सुरू झाले. त्यामुळे सिंधी समाज धोक्यात आला, अशी आवई उठवण्यात आली. महापालिकेला हरिदास माखिजा, ज्योती कलानी, कुमार आयलानी, आशा इदनानी यांच्या रूपाने सिंधी, तर यशस्विनी नाईक, लीलाबाई आशान, राजश्री चौधरी, विद्या निर्मले, अपेक्षा पाटील यांच्या रूपाने मराठी समाजाचे महापौर झाले. तसेच उत्तर भारतीय असलेल्या मालती करोतिया महापौरपदी विराजमान झाल्या होत्या.२०१२ च्या महापालिका निवडणुकीत पप्पू कलानी, ज्योती कलानी, भाजपाचे लाल पंजाबी, कुमार आयलानी, नरेंद्र राजानी, शिवसेनेचे चंद्रकांत बोडारे, राजेंद्र चौधरी, जीवन इदनानी, सचिन कदम, डॉ. जयराम लुल्ला आदी नेत्यांनी मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी स्वत: फिरले होते. मतदान कोणालाही करा, पण लोकशाहीवाढीसाठी मतदान करण्याची गळ घातली होती.